सर्व वेदवेत्या गुरजनांना वंदन करुन एक विषय मांडतोय.सप्तपदी या लेखमालेला प्रचंड प्रतिसाद मिऴाला व त्यानंतर सतत अनेक व्यक्तिंनी फोन व मेसेज या माध्यमातुन संपर्क करुन या विषयी अधिक माहिती द्या असा आग्रह केला.एका भगिनींची प्रतिक्रिया फार भयानक होती " हिंदु धर्मात महिलांना गौण मानलय व अत्यंत हीन दर्जा दिला आहे अस सदैव ऐकल होत पण आपण संदर्भा सह लेख दिल्याने हा गैरसमज निरसन झाला तेव्हा या विषयाला अनुसरुन अधीक संदर्भ द्यावेत हि विनंती केली.
या सर्वांचा मान ठेवुन काहि अन्य संदर्भ देत आहे.
महाभारत हे एक अलौकिक दिव्य असे महाकाव्य व इतिहास ग्रंथ म्हणुन प्रसिध्द आहे.त्यात काहि हितोपदेश आलेत ते पाहु.
शकुंतले ने दुष्यंताला भार्येचे महत्व सांगीतले
अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतम: सखा । (महा.आदि.74-41)
पत्नी हि पतीचे अर्धांग आहे व पत्नी हि पतीचा श्रेष्ठ मित्र (सखा) आहे.म्हणजेच उभयता हे मित्रच हवेत.
शकुंतले ने हा उपदेश केलाय हे लक्षात घेण्यासारखे आहे.
भर्ता व पती या शब्दांची व्याख्या पाहु
भार्याया भरणाद् भर्ता पालनाच्च पति:स्मृत:। (आदि.104-30)
पत्नीचे "भरण "म्हणजे पोषण हे पतीनेच करायचे असल्याने तो "भर्ता "या संज्ञेने ओळखला जातो.
"पालन "करत असल्याने पती या संज्ञेने ओळखला जातो.
म्हणजेच ओघानेच पत्नी चे पालन पोषण हि जवाबदारी भर्त्याचीच आहे. (बायकोच्या पगारावर डोऴा ठेवुन लग्न करु नये)
आता केवऴ पालन पोषण केले म्हणजे पतीचे कर्तव्य संपत नाहि तर विदुरांसारखा तत्वज्ञानी या विषयी काय म्हणतो ते पाहा.
श्लक्ष्णो मधुरवाक् स्त्रीणां न चासां वशगो भवेत् ।
पूजनीया महाभागा: पुण्याश्च गृहदीप्तय:।।
स्त्रिय:श्रियो गृहस्योक्तास्तस्माद्रक्षा विशेषत:।। (महा.उद्यो.38-10)
पतीने स्त्रियांशी मृदू व मधुर वाणीने बोलावे मात्र त्यांचाशी अधीन होऊ नये.स्त्रिया या पुण्यवंत गृहाला प्रकाशित करणार्या महाभाग्यशाली आहेत त्यामुऴेच त्या पूजनीय आहेत या गृहलक्ष्मींच सदैव प्राधान्याने रक्षण करावे.म्हणजेच पत्नीचे पालन पोषण व सन्मानपूर्वक रक्षण करणे हे पतीचे प्राधान्याने कर्तव्य आहे.
गृहिणी हीन घर हे कसे भासते याचे वर्णन पाहा.
न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृह मुच्यते ।
गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ।।
नुसत्या भिंति व छप्पर म्हणजे घर नव्हे तर गृहिणी हेच घर होय.गृहिणी हीन घर हे अरण्याप्रमाणे भयाण व कंटाऴवाणे भासते.
तेव्हा जे लोक आपल्या धर्माला पुरुष प्रधान संस्कृती हे लेबल लावतात व आपला धर्म हा स्त्रीयांचा मान ठेवत नाहि त्यांना शिक्षण नाकारतो हे म्हणतात त्यांना हि उदारणे दाखवा व या हितोपदेशानुसार आपणहि आचरण करा हि विनंती.
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले 9404170656
(वरील लेख लेखकाच्या नावागावासह अन्यत्र देवु शकता याने तात्विक समाधान लाभेल)
Friday, 27 October 2017
## हितोपदेश दांपत्यांकरता ##
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment