सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन गेले सात दिवस चालु असलेल्या सप्तपदी या लेखमालेचा अखेरचा भाग आज आपल्या समोर देतोय. भर्तृ: भ्रातृ पितृव्यैश्च श्वश्रू श्वशुर देवरै:। पुत्रैश्च पूजनीया स्त्री भूषणाच्छादनाशनै:।।(वसिष्ठ स्मृति 5-18) वसिष्ठ महर्षि सांगताहेत स्त्री हि समादरणीय (समान आदरयुक्तच) व रक्षणीय आहे.पति, भाऊ, काका सासु सासरे, दिर, पुत्र यांनी वस्त्र, अलंकार, भोजन वगैरेंनी स्त्रीयांची सदैव सेवा पूजा करणे आवश्यक आहे. (स्त्रीयांचा छळ करा, हुंड्याकरता मारहाण करा, अपमान करा अशी शिकवण धर्मशास्त्रात दिली नाहिये.) सातवे पद हे फार महत्वाचे आहे सर्वोच्च व श्रेष्ठ मागणी हे पद करतेय गृहस्थ जीवनाचे सार या शेवटच्या पदात आलेय मंत्र पाहु. सखा सप्तपदी भव。हा मंत्र आहे. तु माझ्या सोबत सात पावले चाललीस तुझे माझे आत्मसख्य होवुदे. सखा या शब्दाची व्याख्या "समाना ख्याति: यस्य स: " म्हणजेच ज्याची ख्याती आपल्या सारखी असते तो "सखा". ख्याती समान असणे म्हणजे काय? सांगतो नीट लक्ष द्या चंद्र तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तिथे विवेका । असणे कि जे ।। यांची एकमेकांशिवाय कल्पनाच करु शकत नाहि एवढ "सख्य "यांचे आहे.असच आपल सख्य होवो हि उदात्त कामना या पदात केली आहे.. सीताराम, राधाकृष्ण, उमामहेश्वर, रतिमदन , लक्ष्मी नारायण अशी आपली उपासनेची परंपराच आहे.आपल्या देवता ह्या युग्मच आहेत प्रकृति व पुरुष या दोघांच्या संयोगानेच सृष्टिची रचना ब्रह्मदेवांनी केलीय .हे दोन्हि अभेद्य आहेत. आपणहि असेच अभेद्य होवु.दुधात साखर विरघळल्यानंतर केवऴ "माधुर्य "च निर्माण होते त्याच प्रमाणे आपले "सख्य"होवुदे. आपल्याकडे "युग्मांची "एक गंमत आहे. "तो "दिवस आहे "ती "रात्र आहे.यांचा जेव्हा संयोग होतो तो काऴ फारच सुंदर असतो (पहाट व सायंकाऴ) "तो "जप असतो "ती "जपमाला असते यांचा संयोग हा देखील फार सुंदर असतो (हा संयोग असतो तो पाहु नये म्हणुनच जपमालेवर आच्छादन (गोमुखी) करतात) "तो "यज्ञ असतो "ती "आहुती असते. "तो "सागर असतो "ती "नदी असते वरील उदारणात अभेद्य युग्म आहे.दिवसाचे महत्व रात्रीमुऴे कऴते.त्याचप्रमाणे आपण उभयतांचे सख्य घडुदे परस्परांच्या सहकार्याने आपला उत्कर्ष घडुदे हि लक्ष्मी नारायणाच्या चरणी विनंती करु.द्वैताने भरलेल्या या जगात आपले "अद्वैत "घडुदे हि सदिच्छा यात आहे. हे वाचल्यानंतर आपला धर्म स्त्रीयांना मान देत नाहि समान वागणुक देत नाहि असे आपण तरी म्हणु नका हि विनंती.तु माझी "सखी "हो एवढा उदात्त विचार आपल्या ऋषिमुनींनी दिलाय तो आचरावा हि प्रार्थना. "आम्हि "या शब्दात "मी "हे अक्षर येते. परंतु "मी "मध्ये "आम्हि "येत नाहि.तेव्हा मी पणा सोडुन आम्हि बनुन सुरुवात करुया तुर्त लेखन मर्यादा वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले 9404170656 (वरील लेख लेखकाच्या नावागावासहित अन्य समुहावर देवु शकता याने तात्विक समाधान लाभेल)
No comments:
Post a Comment