ज्योतिषशास्त्र*
. *
विवाहाचा विचार करता. द्वितीय स्थान कुटुंब वृद्धी स्थान ,पंचम स्थान
प्रणय स्थान याचा विचार ..
सप्तम स्थान जोडीदाराचा विचार आणि वैवाहिक सुख विचार आणि व्यय स्थान म्हणून शय्या सुख स्थान
आणि वैवाहिक जीवनाचे कुटुंबातून मिळणारा लाभ यासाठी अकरावे लाभ
स्थान यांचा वाटा महत्त्वाचा असतो.
आणि वैवाहिक सुख यासाठी शुक्र मंगळ चंद्र आणि संतती कारक गुरू
महत्वाचे असतात.
पुरुषांच्या पत्रिकेत चंद्र आणि शुक्र
या सारखे स्त्रिकारक ग्रह तर ..
स्त्रियांचे पत्रिकेत रवी मंगळ हे पुरूष ग्रह महत्वाचे मानले जातात.
पुरुषांच्या पत्रिकेत सप्तम स्थानी ग्रह नसल्यास चंद्र प्रथम ज्या ग्रहाशी युती
करेल त्या गुणधर्माची .स्वभावाची
पत्नी मिळेल.
तर स्त्रियांचे पत्रिकेत रवी ज्याग्रहाशी
युती करेल त्या स्वभावाचा पती मिळेल
ग्रहांचा विचार करता रवी किंवा सिंह
रास असेल तर मानी गर्विष्ठ..हुकूमत
गाजविणारा.चांगल्या कुळातील जोडीदार मिळेल.
कदाचित विवाहयोग उशिरा येईल
पण सुखावह होईल.
चंद्र किंवा कर्क रास असता चंचल
भावना प्रधान प्रेमळ,संसार दक्ष गोरा,
कलाकार .टॉप गिअर मध्ये गाडी चालवणाऱ्या पैकी असेल.
मंगळ किंवा मेष व वृश्चिक राशी असता भांडखोर,तापट,वक्तशीर
वर्चस्व गाजविणारा आपले ते खरे
करणारा गव्हाळ वर्णाचा जोडीदार
मिळेल.विवाह योग लवकरच असतो.
बुध किंवा मिथुन कन्या रास असता
चतुर,विश्वासू,अतीबोलका,व्यवहार
दक्ष जोडीदार मिळेल.
विवाह योग उशिरा किंवा अडथळे
संभवतात.
गुरू किंवा धनु मीन राशी असता प्रेमळ
हुशार आनंदी,धार्मिक व्यवहारी जोडीदार असेल. वर्चस्व गाजवेल.
शुक्र किंवा वृषभ रास तसेच तूळ रास
असेल तर जोडीदार देखणा प्रेमळ
शौकीन सौंदर्याचा चाहता,आनंदी आणि सहनशील असेल.पापग्रह युतीत
असतील तर प्रेमभंग देईल.
शनी किंवा शनी च्या राशी मकर कुंभ
रूपाने साधारण गर्विष्ठ,कष्टाळू सोशिक धूर्त राजकारणी जोडीदार
मिळेल.विवाह योग शनी च्या गुणधरमानुसार उशिराच होईल.
राहू केतू असता विरुध्द स्वभावाचा
दिसण्यास बोजड थोडासा प्रौढ
दिसणारा नाटकी,डावपेच खेळणारा
जोडीदार मिळेल.
लग्नं वोग उशिरा येईल.
प्रेमभंग आणि मानहानी चे प्रसंग
आणेल.
हर्षल हा गूढ चमत्काराचा ग्रह असल्यामुळे जोडीदार हुशार बुध्दिमान
कल्पक असेल.
मात्र घटना इतक्या तात्काळ करेल
कधीकधी उतावळेपणा सारासार विचार लहरी आणि विक्षिप्त पणाला
प्रेमविवाह करेल ही पण विभक्यपणा
आणि घटस्फोट ही देईल.
नेपच्यून हा अंत स्फूर्ती चा कारक ग्रह
अध्यात्मात उपयोगी असतो.
मात्र विवाह सुखात मारक ठरतो.
सुरवातीला सुखी असणारी जोडपी
काही वर्षा नंतर नाईलाजाने संसार
ढकलतात.
प्लुटो सारखा स्फोटक ग्रह ही विवाह
सुखात उणीव ठेवतो.
खऱ्या सुखाचा आविष्कार घडू देत नाही.
वरील सर्व योग हे ढोबळ मानाने
झाले.याशिवाय शुभ योग शुभ युती
शुभ दृष्टी आणि दशा यांचा विचार ही
महत्त्वाचा ठरतो.
त्यानुसार शुभ अशुभ फले मिळतात.
अशा तऱ्हेने योग्य रीतीने विवाह
जुळवून देवाब्राम्हणा साक्षीने
केलेले विवाह यशस्वी झालेले पाहणे
म्हणजेच .सध्याच्या काळात नवलच
मानावे लागेल.
Sunday, 24 March 2019
वैवाहिक जोडीदार*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment