Tuesday, 23 December 2025

*आत्महत्या_केल्याने_नंतर_काय_होते* आत्म्याची कोणत्याही प्रकारे हत्या होऊच शकत नाही, केली जाऊ शकत नाही, हत्या होते ती फक्त शरीराची, ह्याला स्वघात किंवा देह हत्या म्हणू शकतो, दुसर्‍या जीवाची हत्या केल्याने ब्रम्ह हत्येचा दोष लागतोच परंतु स्वघात केल्याने घोर अपराध होतो. ज्या देहाने व परमेश्वराने आपणास ह्या जगात राहायला जागा दिली, हे जग पाहण्यास साठी, समजण्यासाठी, एकण्या साठी शक्ति दिली, त्या देहाची हत्या करणे निंदनीय घोर अपराध आहे. जरा विचार करा तुमचा जर कोणी खास, सखा, जवळचा आपला कोणी असेल तर तो फक्त परमेश्वराने दिलेलेला हा देह, शरीर आहे. कारण आत्मा आपली प्रगती शरीरात राहुनच करू शकतो. त्यात आत्महत्या करणार्या व्यक्तींचा गैरसमज असा होतो की आपल्या वर असणारा ताण, दुख, वेदना त्रास, हे आत्म हत्या करून संपवु शकतो, पंरतु हे अस मुळीच नाही कारण भोग हे भोगुनच संपतात, आत्महत्या करून ते अधिक वाढतात. कोणाच्या कारणाने, नातेवाईकांच्या रागाने आपण अस पाऊल उचलाल पण त्याचा फरक फक्त नी फक्त तुम्हाला पडतो ईतराना काही फरक पडत नाही कारण ते फक्त दोन दिवस आपली आठवण करतील, महिनाभरातच विसरून पण जातील, कारण या जगात कोणी कोणाचे नाहीच आहेत.*आत्मघात केल्यास काय भोग आहेत सविस्तर पणे लक्षात घ्या-*हिन्दू धर्मानुसार मृत्यु पश्चात आत्म्याची मुख्य करून 3 प्रकारच्या गती सांगितल्या आहेत. *1.उर्ध्व गति*2.स्थिर गति*3.अधोगति.ह्या मध्ये ही गती-अगती मध्ये विभागले आहेत. वैदिक ग्रंथां मध्ये आत्मघाती दुष्ट मनुष्या ला काय म्हटले आहे- *असूर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृता।**तास्ते प्रेत्यानिभगच्छन्ति ये के चात्महनो जना:।।**अर्थात:–* आत्मघाती मनुष्य मृत्यु पश्चात अज्ञान आणि अंधकाराने परिपूर्ण, सूर्य प्रकाशा पासून वंचित आशा असूर्य नामक लोकात टाकला जातो. गरुड पुराण मध्ये जीवन मृत्यु च्या प्रतेक रुपाचे वर्णन केले आहे, तर आत्म्हत्तेस निंदनीय मानल आहे, कारण धर्मा नुसार 84 दशलक्ष योनि नंतर परमेश्वराच्या कृपेने मानव जन्म प्राप्त होत असतो. आणि त्याला व्यर्थ घालवणे निंदनीय अपराध आहे. जो व्यक्ति आत्महत्या करतो तो आत्मा अतृप्त अवस्थेत आपल्या मध्ये भटकत राहतो. त्याला ना स्वर्ग-नर्क आणि ना पुंनर्जन्म प्राप्त होतो. अशा आत्म्यास त्याचे समय चक्र जो पर्यन्त पूर्ण होत नाही तो पर्यंत त्याला जागा मिळत नाही, म्हणून आत्महत्या पच्छात चे जीवन खूप कष्टदायक आणि असाह्य असते. त्यासाठी जीवनाचे चक्र समजून घेणे अति आवशक आहे-- जसे पुर्णपणे परिपक्व झालेले, पिकलेले फळ खाण्यासाठी योग्य असते आणि जस परिपक्व झालेले फळ स्वत: हून झाड सोडून, नवीन झाड बनण्याच्या अपेक्षेने बाहेर पडते, त्याच प्रमाणे पूर्ण आयुष जगून भोग भोगून मनुष्य आत्मा चांगल्या जीवन गती साठी बाहेर पडतो. मनुष्य जीवनाचे 7 चरण असतात, आणि प्राकृतिक प्रकिये नुसार, एक पूर्ण झाल्यावरच दुसरी चालू होते. आणि ते नियोजित क्रमवार असते, त्यात वेळे अगोधरच मृत्यु झाल्यास बिघाड होतो. ज्या शरीराचा मृत्यु प्राकृतिक नियमा नुसार होतो तो आत्मा तृप होत असतो, भटकत नसतो. आणि नियमांनुसार जीवनाचे 7 चरण पूर्ण झालेले असतात. परंतु जो मनुष्य आत्महत्या करतो तो आत्मा चक्र पूर्ण न केल्याने अतृप्तच राहतो. *मृत्यु नंतर केव्हा प्राप्त होते दुसरे शरीर ?*उपनिषद सांगते- मृत्यु नंतर जास्त करून त्याच वेळी दुसरे शरीर (सूक्ष्म) प्राप्त होते मग मनुष्य असो किंव्हा कुठचा ही प्राणी. पुराणा नुसार काही आत्मा 3 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात, काही आत्म्याना 10 ते 13 दिवसात दुसरे शरीर प्राप्त होते. काही आत्मा सव्वा महिन्यात जवळ-जवळ 40 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात. खूप कमी आत्मा असे 40 दिवसा नंतर ही शरीर प्राप्त करू शकत नाही, त्यात अधिकतर अपघाती, दुर्घटना, आत्महत्या झालेले असतात. *काय असते भूत-*ज्याचा काहीच वर्तमान नसतो, फक्त भूतकाळच असतो त्यालाच भूत म्हणतात, भूत काळात अटकलेल्या आत्म्याचे भूत बनते, जीवन ना भूत मध्ये आहे, ना भविष्या मध्ये, जीवन सधा वर्तमान मध्ये आहे. आत्माचे 3 स्वरूप मानले आहे, जीवात्मा, प्रेतात्मा, आणि सूक्ष्मात्मा. जो भौतिक शरीरात वास करतो त्याला जीवात्मा म्हणतात. जेव्हा या जिवात्म्याचा वासना आणि कामनामय शरीरात प्रवेश होतो, त्याला प्रेतात्मा म्हणतात, आणि हा आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो त्याला सूक्ष्मात्मा म्हणतात. अशा प्रकारे अपघाती कोणी व्यक्ति मृत होत असेल तर भूत, प्रेत, पिच्छ्यात, अवगत, खूनी, मुंजा, पीर, डायन, कृष्मांडा, ब्रम्हराक्षस, वेताळ, क्षेत्रपाल अशा स्थितीत अतृप्त राहतात. ह्या सर्वांची उत्पत्ति आपल्या पापकर्मा नुसार, व्यभिचार, अकाल, अपघाती मृत्यु किंवा श्राद्ध न झाल्याने होते. *अतृप्त आत्मा बनतात भूत :–*जो व्यक्ति भूख, तहान, संभोगसुख पासून विरक्त, राग, क्रोध, द्वेष, लोभ, वासना व इच्छा आणि भावना घेवून मरतो तो अवश्य तो भूत बनून भटकतो. व्यक्ति दुर्घटना, हत्या, आत्महत्या ने मृत्यु होतो तोही अतृप्त भूत बनून भटकतो, अंतता “जशी मती, तसी गती”. अशा अतृप्त आत्म्यास तृप्तते साठी श्राद्ध, तर्पण, आवशक कर्मकांड विधी केला जातो. अतृप्ते मध्ये आत्महत्या हे सर्वात मोठे कारण बनते, शास्त्र नुसार आत्महत्या करणे घोर अपराध मानले आहे. आत्महत्या करणे निश्चितच परमेश्वराचा अपमान करणे आहे. जो व्यक्ति आत्महत्या करतो तो मृत्यु नंतर त्वरित प्रेत बनून अनिश्चित काळापर्यंत भटकत राहतो. अशा स्थितीत त्या आत्म्यास अतिशय, आसाह्य कष्ट वेदना भोगाव्या लागतात. आसाह्य पीडा आणि पच्शाताप हेच त्याचे प्रेत जीवन बनते. मरणोपरांत संचित संस्कार च्या अनुरूप शरीर धारण करण्या साठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते, तोवर सूक्ष्म शरीरा मध्ये वास्तव होते. मुक्ति चा अर्थ मोक्ष नाही तर दुसरे शरीर प्राप्त होणे. मोक्ष तर जन्म-मृत्यु च्या फेर्‍यातून मुक्त होऊन आनंदस्वरूप परमात्मा मध्ये विलीन होणे. काही वेळा तर साधू-संताना पण मोक्ष मिळवणे कठीण असते. तर सामान्य जिवाची गोष्टच वेगळी. एकण्यात आहे अपुरी राहिलेली कर्तव्य आणि वासना मुळे माऊलींना पण परत जन्म घ्यावा लागला. आत्महत्या करण्याचा अर्थ हा आहे की आपण अजून मानसिक रूपाने परिपक्व नाहीत. तर मुक्तता नाहीच. शेवटी अतृप्त आत्म्यास मुक्ति सहज प्राप्त होत नाही, म्हणून ते भूत, प्रेत किंवा पिशाच अशा योनित भटकत राहतात. जोवर त्या शरीराचे निर्धारित आयुष्य पूर्ण होत नाही तोवर, असे कमीत कमी होते. पण सहसा मुक्ति मिळत नाही, त्या साठी नातेवाईकां कडून उचित धार्मिक कार्य, श्राद्ध, तर्पण आदि विधीतून मुक्तिची शक्यता असते.

No comments:

Post a Comment