joshi bhataji blog
Friday, 30 January 2026
!! #रामकृष्णहरि !!अयोध्येचा राजा दशरथ एकदा वनभ्रमणावर गेला होता आणि वालीला भेटला. त्याच्या बोलण्याने नाराज होऊन वालीने त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले.राजा दशरथ एकदा वनभ्रमणावर गेला आणि वालीला भेटला. त्याच्या बोलण्याने नाराज होऊन वालीने त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. राजा दशरथाच्या तीन राण्यांपैकी कैकेयी शस्त्रे आणि रथ चालविण्यात पारंगत होती.म्हणून, जेव्हा जेव्हा राजा दशरथ दौऱ्यावर जायचा, तेव्हा तो अनेकदा कैकेयीला सोबत घेऊन जायचा आणि ती अनेकदा युद्धात त्याच्यासोबत असायची. योगायोगाने, वाली आणि राजा दशरथ यांच्यातील भयंकर युद्धादरम्यान, राणी कैकेयी देखील त्याच्यासोबत होती.युद्धात, वालीने राजा दशरथावर मात करण्यास सुरुवात केली कारण वालीला वरदान मिळाले होते की जर त्याने कोणावरही नजर टाकली तर त्या व्यक्तीच्या शक्तीचा अर्धा भाग त्याच्याकडे जाईल. म्हणून, राजा दशरथ युद्ध हारणार हे निश्चित होते.जेव्हा राजा दशरथ युद्धात हरला, तेव्हा बालीने त्याच्यावर एक अट घातली: एकतर त्याची पत्नी कैकेयी सोडून जा किंवा रघुकुल वंशाचा अभिमान असलेला मुकुट मागे सोडा. राजा दशरथाला आपला मुकुट सोडून राणी कैकेयीसोबत अयोध्येला परत जावे लागले.राणी कैकेयीला हे ऐकून खूप दुःख झाले; एक स्त्री आपल्या पतीचा अपमान कसा सहन करू शकते? तिने राजा दशरथाला त्याचा मुकुट सोडण्यास भाग पाडले ही गोष्ट तिला प्रत्येक क्षणी त्रास देत असे.तिला मुकुट परत मिळण्याची चिंता होती. जेव्हा श्रीरामांच्या राज्याभिषेकाची वेळ आली तेव्हा दशरथ आणि कैकेयी यांनी मुकुटावर चर्चा केली. फक्त त्यांनाच ते माहित होते.रघुकुल वंशाचा सन्मान पुनर्संचयित करण्यासाठी, कैकेयीने श्रीरामांच्या वनवासाचा कलंक स्वतःवर घेतला आणि त्याला वनात पाठवले. त्याने श्रीरामांना असेही सांगितले होते की त्याला बालीकडून मुकुट परत मिळवावा लागेल.श्रीरामांनी बालीला पराभूत केल्यानंतर, त्याने बालीशी संभाषण सुरू केले. भगवानांनी स्वतःची ओळख करून दिली आणि बालीला त्याच्या वंशाचा अभिमान असलेल्या मुकुटाबद्दल विचारले.तेव्हा वालीने उत्तर दिले, "मी रावणाला पकडले. जेव्हा तो पळून गेला तेव्हा त्याने कपटाने मुकुटही सोबत घेतला. प्रभू, माझ्या मुलाला तुमच्या सेवेत घ्या. तो तुमचा मुकुट परत मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालेल."जेव्हा अंगद श्रीरामांचा दूत म्हणून रावणाच्या दरबारात गेला, तेव्हा त्याने आपले पाय दरबारात ठेवले आणि उपस्थित योद्ध्यांना त्याचे पाय हलवण्याचे आव्हान केले. रावणाच्या राजवाड्यातील सर्व योद्ध्यांनी अंगदाचे पाय हलवण्यासाठी सर्व शक्ती वापरली, परंतु कोणीही यशस्वी झाले नाही.जेव्हा रावणाच्या दरबारातील सर्व योद्धे अंगदाचे पाय हलवू शकले नाहीत, तेव्हा रावण स्वतः अंगदाजवळ आला आणि तो पाय हलवण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याच्या डोक्यावरून मुकुट पडला. अंगद मुकुट घेऊन श्रीरामांकडे परतला. रघुकुलाच्या राजमुकुटाचे असे वैभव होते.जेव्हा राजा दशरथाकडे गेला तेव्हा त्याला वेदना सहन कराव्या लागल्या. जेव्हा रावणाने बालीकडून मुकुट घेतला तेव्हा बालीला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. यानंतर, जेव्हा अंगदने रावणाकडून मुकुट घेतला तेव्हा रावणानेही आपला जीव गमावला.आणि केवळ कैकेयीमुळेच रघुकुलाचा मान वाचला. जर कैकेयीने श्रीरामांना वनवासात पाठवले नसते तर रघुकुलाचा मान परत मिळाला नसता. कैकेयीने वंशाच्या सन्मानासाठी सर्व कलंक आणि अपकीर्ती स्वतःवर घेतली, म्हणूनच श्रीरामांना त्यांच्या मातांमध्ये कैकेयी सर्वात जास्त आवडायची.
Monday, 29 December 2025
🙏 *आत्म्याचे अस्तित्व खरंच आहे का??*
उत्तर = जी माता गरोदर असते, त्या मातेला सुद्धा, आपण गरोदर आहोत, हें दोन महिन्यांनी कळते, याचा अर्थ *तो सूक्ष्म जीव*
*कसा प्रवेश करतो कसा संघर्ष करतो?*
दोन महिन्यांनी त्या मातेला कळते कि आपण आई होणार आहोत 👍 *मग त्या आधी का नाही कळले?? कारण कि तो आत्मा संघर्ष करत असतो*, जेव्हा एक संपूर्ण चेहरा तयार होतो,
आणि दोन हात तयार होतात, तेव्हा तो *आईच्या गर्भात दोन्ही हात जोडून, प्रार्थना करतो,* आणि *बोलतो कि, सोडविशी येथूनी, तर मी स्वहीत करिन, स्वहीत म्हणजे, परमार्थ करिन,* 🙏 हें वचन तो ईश्वराला देतो, आणि *पण जसा मोठा होतो, तसे ईश्वराला दिलेलं वचन विसरतो,* आईचा गर्भ म्हणजेचं नरक, या गर्भात *असंख्य यातना गर्भ सहन करत असतो,* *पृथ्वीवर जन्म घेणे, याचाच अर्थ स्वर्गात*
*ऋण घेणे होय* अवकाशात फक्त ब्रह्मांड आहे, आणि *पृथ्वी म्हणजेचं स्वर्ग आहे* 🙏
*संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरीत,* शुक्राणूची माहिती दिली आहे, आठशे वर्षापूर्वी हें लिखाण केले आहे, *गरुड पुरणातही* हे स्पष्ट व स्वच्छ लिहले आहे.आपण गरुड पुराण अनेकवार वाचले आहे .मग त्या काळात तर सोनोग्राफी नव्हती मग हें गूढ ज्ञान संत ज्ञानेश्वर यांना कुठून प्राप्त झाले,??
आता राहिला, *आत्म्याचे अस्तित्व खरेच आहे का?* मनुष्य देहाची पुण्याई असे पर्यंतच जिवंत राहतो, पुण्याई संपली कि देह ठेवावा लागतो, *आपल्याला दिसतो तो फक्त देह*
मग तो शरीरातील सूक्ष्म आत्मा आपल्याला का दिसतं नाही,??
*आत्मा येताना त्या गर्भवती मातेला ही दिसला नाही,* *आणि जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हाही दिसतं नाही*, पण जेव्हा शरीरातुन आत्मा बाहेर निघतो, तेव्हा एक तर तो *दुःखी* असतो किंवा तो *तृप्त झालेला* असतो, जर तो अंतरात्मा *दुःखी* असेल, तर त्या शरीराला लाथ मारतो, आणि बोलतो, स्वहीत करिन असे बोलला होतास, पण या *पृथ्वीवर जन्माला येऊन, मनुष्य देहाचे सार्थक, करू शकलास नाहीस*
संपूर्ण आयुष्य केवळ देह सुख पाहिलेस,
*या कलियुगात संतांची ओळख करून घेऊ शकला नाहीस,* आता मला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार 😭😭😭 असे बोलून तो अंतरिचा आत्माराम पुढील प्रवासाला निघतो,
आता ज्या व्यक्तीने प्राण सोडले आहेत, ती व्यक्ती, कुठे अडकली, जसे कि *लोभात, किंवा काही खाण्याची इच्छा, अपूर्ण वासना राहिली, तर पुन्हापुन्हा त्या आत्म्यास जन्म घ्यावा लागतो*,😭😭😭 अश्या कित्येक परमार्थिक व्यक्ती आहेत, जे उपासना करुन, घरात सगळ्यांना सांगून गेलेत, कि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा 🙏 *म्हणून मरणाचे स्मरण असावे* शरीराचे सार्थक करावे, *पूर्वजास उद्धरावे हरी भक्ती करुनी* 🙏
गुरूचरित्र ग्रंथात दुसऱ्या अध्याय मध्ये, *कलिकाळ* हा ब्रम्ह देवा समोर, आपली जीभ आणि लिंग धरून उभा आहे, आणि त्याने शपथ घेतली आहे कि, पृथ्वीवर मी मनुष्याला नागडा करिन, त्याला कपडे काढायला लावीन, परमार्थ करुन देणार नाही, जीभ, आणि वासना हेच माझं शस्त्र राहील, तेव्हा ब्रह्म त्याला बोलतात, कि *जे संतांना शरण जातील, जे परमार्थ करतील, त्यांना तू बाधा करू नकोस, कली ही अट मान्य करतो, आज आपण पाहतो कि मनुष्य हा केवळ, देहाचे भोग घेत आहे, त्याचा रसनेवर, आणि वासनेवर ताबा नाही, अंगावर कपडे राहिले नाहीत, जे लिहिले आहे, तेच सत्य आता अनुभवायला मिळत आहे, *यातून सुटायचं असेल, तर जा सदगुरूंना शरण,* सुटेल तुझे जन्म आणि मरण, *शरणा गतांची वाहे चिंता, तो एक सदगुरु दाता* *जैसे बालके वाढवी माता, नाना यत्ने करुनी* 🙏
प्रत्येक मनुष्याकडे आठ विषय आहेत,
1= *लोभ* , 2 *क्रोध*, 3 *वासना* 4 *मद* 5
*मत्सर 6 चिंता 7 भावना 8 संशय*
हें आठ विषयी मनुष्याचे मन, आणि अंतरात्मा चालवतात, हें *आठही विषय कोणत्याही शाळेत शिकवले जात नाहीत, ते दिसतं देखील नाहीत, पण मनुष्य त्यांचा अनुभव घेत असतो,*
मग अंतरात्माची ओळख कशी घ्यायची,??
*ज्याला परमार्थाची प्राप्ती झाली आहे, जो लोभात, आणि वासनेत ना अडकता, केवळ परमार्थ करत आहे, त्यालाच *अंतरीच्या आत्मारामाची ओळख होते*, कारण कि अंतिम समय जेव्हा येतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते, कि आपले या इहलोकांतील कार्य संपले आहे, *मी जे वचन आईच्या गर्भात दिले होते, त्याच सार्थक झाले आहे, आता मला जिवंत पणीच मोक्ष प्राप्ती व्हावी* जेव्हा तो असे *नामस्मरण* करत अंतरी संवाद साधत असतो,
तेव्हा, परेतून आवाज येतो, आता तुझी जाण्याची वेळ आली आहे, सगळ्यांना निरोप दे, उपासना करुन, पूजा करुन, मनुष्य देह सोडतो, *काही जण अंतिम समयी नामस्मरण* करताना, देह त्याग करुन गेलेत,🙏🙏
आपण काय करायचे, ते प्रत्येकाने ठरवायचे!!!!!
*|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||*
Tuesday, 23 December 2025
*आत्महत्या_केल्याने_नंतर_काय_होते* आत्म्याची कोणत्याही प्रकारे हत्या होऊच शकत नाही, केली जाऊ शकत नाही, हत्या होते ती फक्त शरीराची, ह्याला स्वघात किंवा देह हत्या म्हणू शकतो, दुसर्या जीवाची हत्या केल्याने ब्रम्ह हत्येचा दोष लागतोच परंतु स्वघात केल्याने घोर अपराध होतो. ज्या देहाने व परमेश्वराने आपणास ह्या जगात राहायला जागा दिली, हे जग पाहण्यास साठी, समजण्यासाठी, एकण्या साठी शक्ति दिली, त्या देहाची हत्या करणे निंदनीय घोर अपराध आहे. जरा विचार करा तुमचा जर कोणी खास, सखा, जवळचा आपला कोणी असेल तर तो फक्त परमेश्वराने दिलेलेला हा देह, शरीर आहे. कारण आत्मा आपली प्रगती शरीरात राहुनच करू शकतो. त्यात आत्महत्या करणार्या व्यक्तींचा गैरसमज असा होतो की आपल्या वर असणारा ताण, दुख, वेदना त्रास, हे आत्म हत्या करून संपवु शकतो, पंरतु हे अस मुळीच नाही कारण भोग हे भोगुनच संपतात, आत्महत्या करून ते अधिक वाढतात. कोणाच्या कारणाने, नातेवाईकांच्या रागाने आपण अस पाऊल उचलाल पण त्याचा फरक फक्त नी फक्त तुम्हाला पडतो ईतराना काही फरक पडत नाही कारण ते फक्त दोन दिवस आपली आठवण करतील, महिनाभरातच विसरून पण जातील, कारण या जगात कोणी कोणाचे नाहीच आहेत.*आत्मघात केल्यास काय भोग आहेत सविस्तर पणे लक्षात घ्या-*हिन्दू धर्मानुसार मृत्यु पश्चात आत्म्याची मुख्य करून 3 प्रकारच्या गती सांगितल्या आहेत. *1.उर्ध्व गति*2.स्थिर गति*3.अधोगति.ह्या मध्ये ही गती-अगती मध्ये विभागले आहेत. वैदिक ग्रंथां मध्ये आत्मघाती दुष्ट मनुष्या ला काय म्हटले आहे- *असूर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृता।**तास्ते प्रेत्यानिभगच्छन्ति ये के चात्महनो जना:।।**अर्थात:–* आत्मघाती मनुष्य मृत्यु पश्चात अज्ञान आणि अंधकाराने परिपूर्ण, सूर्य प्रकाशा पासून वंचित आशा असूर्य नामक लोकात टाकला जातो. गरुड पुराण मध्ये जीवन मृत्यु च्या प्रतेक रुपाचे वर्णन केले आहे, तर आत्म्हत्तेस निंदनीय मानल आहे, कारण धर्मा नुसार 84 दशलक्ष योनि नंतर परमेश्वराच्या कृपेने मानव जन्म प्राप्त होत असतो. आणि त्याला व्यर्थ घालवणे निंदनीय अपराध आहे. जो व्यक्ति आत्महत्या करतो तो आत्मा अतृप्त अवस्थेत आपल्या मध्ये भटकत राहतो. त्याला ना स्वर्ग-नर्क आणि ना पुंनर्जन्म प्राप्त होतो. अशा आत्म्यास त्याचे समय चक्र जो पर्यन्त पूर्ण होत नाही तो पर्यंत त्याला जागा मिळत नाही, म्हणून आत्महत्या पच्छात चे जीवन खूप कष्टदायक आणि असाह्य असते. त्यासाठी जीवनाचे चक्र समजून घेणे अति आवशक आहे-- जसे पुर्णपणे परिपक्व झालेले, पिकलेले फळ खाण्यासाठी योग्य असते आणि जस परिपक्व झालेले फळ स्वत: हून झाड सोडून, नवीन झाड बनण्याच्या अपेक्षेने बाहेर पडते, त्याच प्रमाणे पूर्ण आयुष जगून भोग भोगून मनुष्य आत्मा चांगल्या जीवन गती साठी बाहेर पडतो. मनुष्य जीवनाचे 7 चरण असतात, आणि प्राकृतिक प्रकिये नुसार, एक पूर्ण झाल्यावरच दुसरी चालू होते. आणि ते नियोजित क्रमवार असते, त्यात वेळे अगोधरच मृत्यु झाल्यास बिघाड होतो. ज्या शरीराचा मृत्यु प्राकृतिक नियमा नुसार होतो तो आत्मा तृप होत असतो, भटकत नसतो. आणि नियमांनुसार जीवनाचे 7 चरण पूर्ण झालेले असतात. परंतु जो मनुष्य आत्महत्या करतो तो आत्मा चक्र पूर्ण न केल्याने अतृप्तच राहतो. *मृत्यु नंतर केव्हा प्राप्त होते दुसरे शरीर ?*उपनिषद सांगते- मृत्यु नंतर जास्त करून त्याच वेळी दुसरे शरीर (सूक्ष्म) प्राप्त होते मग मनुष्य असो किंव्हा कुठचा ही प्राणी. पुराणा नुसार काही आत्मा 3 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात, काही आत्म्याना 10 ते 13 दिवसात दुसरे शरीर प्राप्त होते. काही आत्मा सव्वा महिन्यात जवळ-जवळ 40 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात. खूप कमी आत्मा असे 40 दिवसा नंतर ही शरीर प्राप्त करू शकत नाही, त्यात अधिकतर अपघाती, दुर्घटना, आत्महत्या झालेले असतात. *काय असते भूत-*ज्याचा काहीच वर्तमान नसतो, फक्त भूतकाळच असतो त्यालाच भूत म्हणतात, भूत काळात अटकलेल्या आत्म्याचे भूत बनते, जीवन ना भूत मध्ये आहे, ना भविष्या मध्ये, जीवन सधा वर्तमान मध्ये आहे. आत्माचे 3 स्वरूप मानले आहे, जीवात्मा, प्रेतात्मा, आणि सूक्ष्मात्मा. जो भौतिक शरीरात वास करतो त्याला जीवात्मा म्हणतात. जेव्हा या जिवात्म्याचा वासना आणि कामनामय शरीरात प्रवेश होतो, त्याला प्रेतात्मा म्हणतात, आणि हा आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो त्याला सूक्ष्मात्मा म्हणतात. अशा प्रकारे अपघाती कोणी व्यक्ति मृत होत असेल तर भूत, प्रेत, पिच्छ्यात, अवगत, खूनी, मुंजा, पीर, डायन, कृष्मांडा, ब्रम्हराक्षस, वेताळ, क्षेत्रपाल अशा स्थितीत अतृप्त राहतात. ह्या सर्वांची उत्पत्ति आपल्या पापकर्मा नुसार, व्यभिचार, अकाल, अपघाती मृत्यु किंवा श्राद्ध न झाल्याने होते. *अतृप्त आत्मा बनतात भूत :–*जो व्यक्ति भूख, तहान, संभोगसुख पासून विरक्त, राग, क्रोध, द्वेष, लोभ, वासना व इच्छा आणि भावना घेवून मरतो तो अवश्य तो भूत बनून भटकतो. व्यक्ति दुर्घटना, हत्या, आत्महत्या ने मृत्यु होतो तोही अतृप्त भूत बनून भटकतो, अंतता “जशी मती, तसी गती”. अशा अतृप्त आत्म्यास तृप्तते साठी श्राद्ध, तर्पण, आवशक कर्मकांड विधी केला जातो. अतृप्ते मध्ये आत्महत्या हे सर्वात मोठे कारण बनते, शास्त्र नुसार आत्महत्या करणे घोर अपराध मानले आहे. आत्महत्या करणे निश्चितच परमेश्वराचा अपमान करणे आहे. जो व्यक्ति आत्महत्या करतो तो मृत्यु नंतर त्वरित प्रेत बनून अनिश्चित काळापर्यंत भटकत राहतो. अशा स्थितीत त्या आत्म्यास अतिशय, आसाह्य कष्ट वेदना भोगाव्या लागतात. आसाह्य पीडा आणि पच्शाताप हेच त्याचे प्रेत जीवन बनते. मरणोपरांत संचित संस्कार च्या अनुरूप शरीर धारण करण्या साठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते, तोवर सूक्ष्म शरीरा मध्ये वास्तव होते. मुक्ति चा अर्थ मोक्ष नाही तर दुसरे शरीर प्राप्त होणे. मोक्ष तर जन्म-मृत्यु च्या फेर्यातून मुक्त होऊन आनंदस्वरूप परमात्मा मध्ये विलीन होणे. काही वेळा तर साधू-संताना पण मोक्ष मिळवणे कठीण असते. तर सामान्य जिवाची गोष्टच वेगळी. एकण्यात आहे अपुरी राहिलेली कर्तव्य आणि वासना मुळे माऊलींना पण परत जन्म घ्यावा लागला. आत्महत्या करण्याचा अर्थ हा आहे की आपण अजून मानसिक रूपाने परिपक्व नाहीत. तर मुक्तता नाहीच. शेवटी अतृप्त आत्म्यास मुक्ति सहज प्राप्त होत नाही, म्हणून ते भूत, प्रेत किंवा पिशाच अशा योनित भटकत राहतात. जोवर त्या शरीराचे निर्धारित आयुष्य पूर्ण होत नाही तोवर, असे कमीत कमी होते. पण सहसा मुक्ति मिळत नाही, त्या साठी नातेवाईकां कडून उचित धार्मिक कार्य, श्राद्ध, तर्पण आदि विधीतून मुक्तिची शक्यता असते.
Sunday, 5 October 2025
अंबाजोगाईची आरतीदंतासुरमर्दिनी कुमारी अंबाजोगाई,भवानी अंबाजोगाई।भावभक्तिने तुला आरती योगेश्वरी आई,गात मी योगेश्वरी आई।।ध्रु।।दो नेत्रांच्या निरांजनाने तुजला ओवाळू,माते तुजला ओवाळू।सत्कर्मांचा धूप सुगंधी तुझ्यापुढे जाळू।।तव पदकमलीं लीन निरंतर,पाव झणी माते,मजला पाव झणी माते।धावत येई अघराशींचा नाश करायाते।।सद्भावांच्या फुलवेलीवर भक्तिफुले आली,माते भक्तिफुले आली।वेचुनिया ती तव पदकमली प्रेमे अर्पियली।।तुझ्या कृपेने दैन्य दुःख मम लोपुनिया गेले,वरदे सौख्य घरा आले।शांतिसुखाने मानस माझे आनंदित झाले।।योगेश्वरि मम कुलस्वामिनी आशीर्वच द्यावा,माते आशीर्वच द्यावा।तव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा।।नारायण नतमस्तक चरणी,प्रार्थितसे आई,प्रेमे प्रार्थितसे आई।हृदयमंदिरी वास कराया,यावे लवलाही।।
Friday, 19 September 2025
काशीच्या मणिकर्णिका घाटावर चिता शांत झाल्यावर मुखाग्नी देणारा व्यक्ती चितेच्या भस्मावर ९४ लिहितो. ही गोष्ट सर्वांना माहीत नसते. फक्त खरेखुरे बनारसी लोक किंवा आजूबाजूचे लोकच ही परंपरा जाणतात. बाहेरून आलेले शवदाह करणारे लोक हे जाणत नाहीत.जीवनाचे शतपथ म्हणजे १०० शुभकर्मे असतात. १०० शुभकर्म करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर पुढचा जन्म त्या कर्मांच्या आधारावर शुभ किंवा अशुभ मिळतो. त्यापैकी ९४ कर्म मनुष्याच्या अधीन असतात. ती तो करू शकतो. परंतु ६ कर्मांचे फळ ब्रह्मदेवाच्या अधीन असते.हानि–लाभ, जीवन–मरण, यश–अपयश ही ६ कर्मे विधीच्या नियंत्रणात असतात. म्हणून चितेसोबत तुझे ९४ कर्म भस्म झाले, आता पुढील ६ कर्मेच तुझ्यासाठी नवीन जीवनाची निर्मिती करतील. म्हणूनच १०० – ६ = ९४ असे लिहिले जाते.गीतेतही सांगितले आहे की मृत्यूनंतर मन पाच ज्ञानेद्रियांना घेऊन पुढे जाते. म्हणजेच संख्या ६ होते – मन आणि पाच ज्ञानेंद्रिये. पुढचा जन्म कोणत्या देशात, कुठे आणि कोणत्या लोकांमध्ये होईल हे निसर्गाव्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही. म्हणून ९४ कर्मे भस्म होतात आणि ६ सोबत जातात.विदा प्रवासी, तुझे ६ कर्म तुझ्यासोबत आहेत.आता या १०० शुभकर्मांची सविस्तर यादी दिली आहे. ही जीवनाला धर्म आणि सत्कर्मांच्या दिशेने घेऊन जाते आणि तुझ्या जीवनात सत्कर्म करण्याची प्रेरणा देईल.१०० शुभकर्मांची गणनाधर्म आणि नैतिकतेची कर्मे१. सत्य बोलणे२. अहिंसा पाळणे३. चोरी न करणे४. लोभ टाळणे५. क्रोधावर नियंत्रण ठेवणे६. क्षमा करणे७. दयाभाव ठेवणे८. इतरांना मदत करणे९. दान देणे (अन्न, वस्त्र, धन)१०. गुरूची सेवा करणे११. आई–वडिलांचा सन्मान करणे१२. अतिथी सत्कार१३. धर्मग्रंथांचे अध्ययन१४. वेद आणि शास्त्रांचा अभ्यास१५. तीर्थयात्रा करणे१६. यज्ञ व हवन करणे१७. मंदिरात पूजा–अर्चना करणे१८. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे१९. संयम व ब्रह्मचर्याचे पालन करणे२०. नियमित ध्यान आणि योग करणेसामाजिक आणि कौटुंबिक कर्मे२१. कुटुंबाचे पालन–पोषण२२. मुलांना चांगले शिक्षण देणे२३. गरीबांना अन्न देणे२४. रोग्यांची सेवा करणे२५. अनाथांची मदत करणे२६. वृद्धांचा सन्मान करणे२७. समाजात शांती स्थापन करणे२८. खोट्या वादविवादापासून दूर राहणे२९. इतरांची निंदा न करणे३०. सत्य आणि न्यायाचे समर्थन करणे३१. परोपकार करणे३२. सामाजिक कार्यात भाग घेणे३३. पर्यावरणाचे रक्षण करणे३४. वृक्षारोपण करणे३५. जलसंवर्धन करणे३६. पशुपक्ष्यांचे रक्षण करणे३७. सामाजिक ऐक्य वाढवणे३८. इतरांना प्रेरित करणे३९. दुर्बल घटकांचा उत्थान करणे४०. धर्मप्रसारात सहकार्य करणेआध्यात्मिक आणि वैयक्तिक कर्मे४१. नियमित जप करणे४२. भगवानाचे स्मरण करणे४३. प्राणायाम करणे४४. आत्मचिंतन करणे४५. मन शुद्ध ठेवणे४६. इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे४७. लोभाचा त्याग करणे४८. मोह–मायेपासून दूर राहणे४९. साधे जीवन जगणे५०. स्वाध्याय करणे५१. संतांचे सहवास घेणे५२. सत्संगात सहभागी होणे५३. भक्तीत लीन होणे५४. कर्मफळ भगवानाला समर्पित करणे५५. तृष्णेचा त्याग करणे५६. ईर्ष्या टाळणे५७. शांतीचा प्रसार करणे५८. आत्मविश्वास राखणे५९. इतरांशी उदार राहणे६०. सकारात्मक विचार ठेवणेसेवा आणि दानाची कर्मे६१. भुकेल्यांना अन्न देणे६२. नग्नांना वस्त्र देणे६३. बेघरांना आसरा देणे६४. शिक्षणासाठी दान करणे६५. उपचारासाठी मदत करणे६६. धार्मिक स्थळांची निर्मिती करणे६७. गायींची सेवा करणे६८. प्राण्यांना चारा देणे६९. जलाशयांची स्वच्छता करणे७०. रस्त्यांची निर्मिती करणे७१. यात्रेकरूंकरिता निवास बांधणे७२. शाळांना मदत करणे७३. वाचनालय सुरू करणे७४. धार्मिक उत्सवांत सहकार्य करणे७५. गरीबांसाठी मोफत अन्नदान७६. वस्त्रदान७७. औषधदान७८. विद्यादान७९. कन्यादान८०. भूमिदाननैतिक आणि मानवी कर्मे८१. विश्वासघात न करणे८२. वचन पाळणे८३. कर्तव्यनिष्ठ राहणे८४. वेळेचे पालन करणे८५. धैर्य राखणे८६. इतरांच्या भावनांचा सन्मान करणे८७. सत्यासाठी संघर्ष करणे८८. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे८९. दुःखितांचे अश्रू पुसणे९०. मुलांना नैतिक शिक्षण देणे९१. निसर्गाबद्दल कृतज्ञता ठेवणे९२. इतरांना प्रोत्साहन देणे९३. मन–वचन–कर्म शुद्ध ठेवणे९४. जीवनात संतुलन राखणेविधीच्या अधीन असलेली ६ कर्मे९५. हानि९६. लाभ९७. जीवन९८. मरण९९. यश१००. अपयश९४ कर्मे मनुष्याच्या अधीनवरील यादीतील १ ते ९४ पर्यंतची कर्मे मनुष्य स्वतःच्या विवेक, इच्छाशक्ती आणि प्रयत्नांद्वारे करू शकतो. ही धर्म, सत्य आणि नैतिकतेवर आधारित असून जीवनाला सार्थक बनवतात.६ कर्मे विधीच्या अधीनशेवटची ६ कर्मे (हानि, लाभ, जीवन, मरण, यश, अपयश) मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर आहेत. ती भाग्य, निसर्ग किंवा परमेश्वराच्या इच्छेनुसार घडतात. 🙏आपली जीवन तत्वे माणसाच्या आयुष्याचा सखोल अभ्यास करून तयार केली आहेत. #समीर_गुप्ते_यांचे_मुखपुस्तिकेवरुन_साभार
Thursday, 7 August 2025
लेख स्वलिखितसौ मनीषा भावसारसंदर्भ ज्योतिष ग्रंथभगवान श्री कृष्णा ची कुंडली social media वर अशी मिळाली अजून एक दुसरी सुध्दा होती पण त्यांच्या जीवन प्रवासातील घटना या कुंडलीशी मिळत्या जुळत्या वाटल्यास्वतः योग योगेश्वर भगवान श्री कृष्णाची कुंडली माझ्या सारख्या तुच्छ मानवाने सांगणे म्हणजे ..... सहस्र सुर्या समोर काजवा .. पण ज्योतिष शास्त्रानुसार मानवाचे कुतूहल हे उच्च कोटीला जाते आणि जो ईश्वर अखंड ब्रह्मांड चालवतो तो जेव्हा मानव रुपात जन्म घेतो तेव्हा त्या मोहक भगवंताचीपत्रिका कशी असेल कुठले ग्रहयोग असतील हे पाहण्याचा मोह आवरता येत नाही।।वसुदेवसुतं देवं कंस चाणुर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु।।श्रीमद भागवत पुराण( महर्षी व्यास)हरीवंश पुराण यात श्री कृष्ण जन्माची माहिती मिळतेहरीवंश पुराणातील 4 आध्याय मधील श्लोकात श्री कृष्ण जन्म चे वर्णन मिळतेभगवान मानवरूपात जन्माला आल्यावर त्याना सुद्धा ग्रह नक्षत्राच्या गती नुसार फळे मिळतात का?....वेदांचे एक अंग ज्योतिष आहे आणि देव वेदांचे अंतरंग ...ह्या प्रश्न चे उत्तर शोधावे तेहोडे या गुंत्यात माणूस गुंततो....श्री कृष्ण हे श्री विष्णूचे आठवे अवतार आहेत त्यानी मानव रुपात जन्म घेतला गीते च्या 4 अध्यातील 7 व श्लोकात कृष्ण म्हणतात यदा यदा ही .... धर्मस्य. ....या श्लोकात स्वतः कृष्ण सांगतात ' जेव्हा,जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल ....तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना करण्यसाठी मी जन्म घेईन 'स्वतः कृष्णच त्यांच्या जन्माची कथा सांगत आहे...कुंडली विश्लेषण....कृष्ण अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता जेल मध्ये देवकी व वासुदेव यांच्या पोटी जन्म अष्टमी तिथी ही अपार सौंदर्याची तिथी श्री कृष्णा च्या कुंडलीत सुद्धा प्रभू रामाच्या कुंडली प्रमाणे 5 ग्रह उच्च आहेत....चंद्र,गुरू,बुध, शनी आणि मंगळलग्न व राशी स्वामी शुक्र आहे वृषभ लग्न वृषभ रास म्हणजेच अति सुंदर मनमोहक रूप ...हृदयाचा ठाव घेणारे स्मित हास्य ....राजस सुकुमार मदनाचा पुतळा ...सुंदर डोळे खरे तर कृष्ण म्हणजेच आकर्षण चंद्र उच्चीचा म्हणून देवकी व यशोदे कडून भरपूर प्रेम मिळाले पित्या चा कारक सूर्य स्वराशीचा नंद व वसुदेव हे आध्यत्मिक पिते मिळालेचंद्र मनाचा कारक उच्चीचा अनेक विद्या अवगत होत्या चंद्र पराक्रमेश लग्नात उच्चीचा त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पराक्रम करावा लागला मंगळाची दृष्टी पराक्रम स्थनावर ....कारक स्थनावर जिंकण्यासाठी च पराक्रम झाले मंगळ बंधू चा कारक बलराम सारखा भाऊ मिळाला उच्चीचा बुध पंचमात तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रदान करतो...महाभारतातील कृष्ण शिष्टाई आपण जाणतोचत्रितीयतील उच्चीचा गुरू व पंचमातील बुध जगाला गीते चे ज्ञान दिले ....गुरू ची दृष्टी मंगळावर त्यामुळे युद्ध करूनच धर्माची स्थापना झाली ...पण अगोदर युध्द क्षेत्रावर कर्तव्य पूर्ती चे ज्ञान दिले ..संपूर्ण विश्वात भगवद्गीते सारखा दुसरा ग्रंथ नाही तो एकमेवाद्वितीय आहेषष्ठात उच्चीचा शनी व राहू शत्रू हंता योग करत आहेत पण शत्रू चा निप्पात सुद्धा संयमाने केला हा उच्चीचा शनी लोकशाही दाखवतो ते सामान्य गोपगोपिका मध्ये रमले शनी ची पूर्ण दहावी 10 वी दृष्टी गुरुवार ते गूढ ज्ञान व योग योगेश्वर बनले ....माना मानव व परमेश्वर . मी स्वामी पतितांचा ...भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा .....उच्चीचा गुरू धर्म स्थनावर दृष्टी संदीपनी ऋषी सारखे गुरू लाभले ...चंद्र बुध मंगळ नवपंचम योग हा धर्मत्रिकोणात घटित होत आहेसप्तमेश मंगळाची दृष्टी लग्नावर व लाभेशावर बहू भार्या योग झाला आणि अष्टमेश व लाभेश गुरू दृष्टी सुध्दा सप्तमावर त्यांचे विवाह हे युद्ध करून झाले रुख्मिनी स्वयंवर किंवा 16 सहस्त्र नारी वरतांना त्याना युद्ध करावे लागले ....भूषण रामा एक पत्नीव्रत मला नको तसले ....तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अबला गुरू ची दृष्टी जशी धर्म भावावर धर्म स्थापने साठी जन्म आणि गुरू दृष्टी लाभ भावावर धनसंपदा वाढली अनेक लाभ मिळाले धनेश बुध पंचमात प्रद्युम्न योग करत आहे ....सोन्याची द्वारका होती त्याना प्रद्युम्न नावाची शिवशंकरच्या आशीर्वादाने झालेली अतिशय हुशार संतती लाभली होती म्हणजे पंचम भाव खूप स्ट्रॉंग होता वाणी चा कारक बुद्ध पंचमात उच्चीचा ते दिव्य वाणी चे धनी होते ,मंत्र शास्त्र पारंगत ,मित्राचे मित्र होते ..सुदामा प्रेम आपण जाणतोच काही संघर्ष....षष्ठात राहू मामा कडून त्रास ,आजोळी त्रास व्यएश मंगळाची दृष्टी लग्नेश शुक्रावर बंधन योगात जेल मध्ये जन्म ,शनी राहू षष्ठात सर्व आयुष्य शत्रूचा निप्पात करण्यात गेले ...त्याचा दशमेश शनी षष्ठात राहू सोबत पित्याला जेल योग झाला शष्टेश चतुर्थेश युती अनेक जागा बदलाव्या लागल्या व्यएश मंगळाची दृष्टी चतुर्थावर व त्यातील ग्रहावर आई वडिलांना त्रास भोगावा लागला व्यएश मंगळाची दृष्टी लाभेश गुरुवार मोठया बंधू ना त्रास झाला मोक्ष भावात केतु म्हणजे शरीर सोडताना पूर्ण जीवन मुक्त होतेमृत्युतून सुध्दा त्यानी कर्म भोगाचा संदेश दिला ....मोह न मजला कीर्ती चा मी नाथ अनाथांचा .....भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा ....कृष्ण नावाची मोहिनी अशीच अविरत राहो हीच प्रार्थनावरील कुंडली नेट वर मिळाली तशी घेतली कुंडली विश्लेषणात काही चुका असतील तर मार्गदर्शन करावे कुंडली ही फक्त लग्न कुंडली नुसार पहावी लागली राधे कृष्ण🙏सौ मनीषा भावसारManesha @astro
Wednesday, 30 July 2025
" जानवे " जानव्या संबंधित ५ प्रश्न?१) जानवे म्हणजे नेमके काय?२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात का आणी कसे आले?३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे?४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?५) जानवे घातल्याने होणारे याचे फायदे कोणते?ह्याची उत्तरे तूम्हाला माहित. नसेल तर, नक्की वाचा!१) जानवे म्हणजे नेमके काय ?जानवे हे हिंदू धर्मातील प्रत्येक पुरुष व्यक्तींच्या व्यवच्छेदक चिन्हांपैकी एक चिन्ह मानले जाते. जानव्याला यज्ञोपवीत, ब्रह्मसुत्र, यज्ञासुत्र, जनेऊ अशा विविध संज्ञा आहेत.जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत म्हणजे जानवे अशी व्याख्या केली जाते.जानवे हे कापसाच्या तंतूंनी तयार करतात. तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून एक विशिष्ट गाठ(ब्रह्मगाठ) "ग्रंथी " मारली म्हणजे जानवे तयार होते. अशा रीतीने जानव्यात एकून नऊ सूत्रे असतात. सुतावरुन स्वर्ग गाठणे ह्या मराठी म्हणीतील सूत (बासूत्र ) ते हेच.त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे.जानवे तयार करताना व धारण करताना विशिष्ट मंत्र म्हणतात, तो कोणता ते पुढे जाणून घेऊ. तसेच ते तयार झाल्यावर त्याच्यावर मंत्रपूर्वक संस्कार करतात. जानव्याचे मंत्रपूर्वक अभिमंत्रण केल्यावर ते सूर्याला दाखवितात आणि मगच धारण करतात.यज्ञोपवितामध्ये तीन मुख्य पदर, प्रत्येक मुख्य पदरांचे तीन उपपदर आणि प्रत्येक उपपदराचे तीन सुक्षमतंतू असे नऊ पदर म्हणजेच तंतू असतात. जानव्यातील एकूण ९ तंतूंपैकी• पहिल्या तंतूवर ओमकार असतो.• दुसर्यावर अग्नी असतो.•तिसर्यावर नवनाग असतो.• चौथ्यावर सोम असतो.• पाचव्यावर पितर असतो.• सहाव्यावर प्रजापती असतो.• सातव्यावर वायू असतो.• आठव्यावर यम असतो.• नवव्यावर विश्वदेव असतो.असे नऊ सुत्रिंचे (तंतू) तीन पदर म्हणजेच – •सत्व•रज•तम• हे तिन गुण.हे तीन गुण असलेल्या दोर्याच्या ९६ आंगुळे इतक्या लांब दोऱ्याचे जानवे बनलेले असावे.(जानवे ९६ बोटे लांब असावे असा शास्त्रात उल्लेख आहे.)शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चारअंगुळे )लांबी असलेल्या सूतास, कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून, त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते.जानव्यावर जी "ब्रह्मगाठ" मारली असते, ती अद्वैताची गाठ म्हणजेच “जिव व ब्रम्ह एकच आहे” हा सिद्धांत.चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे “जिवो ब्रम्हैव ना पर” हिच शिकवण देतात.माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात.तो गुण नवरत्नाकारू यया नवरत्नाचा हारू न फेङितले दिनकरू प्रकाश जैसा ज्ञाने.यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू हा मुख्य धागा होय. देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात.तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे.यज्ञोपविततील तीन मुख्य पदर पुढील त्रयींचे प्रतिनिधित्व करतात.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ हे तीन आश्रम;गार्हपत्य, दक्षिणाग्नी, आहवनीय हे तीन अग्नीसत्व, रज, तम हे तीन गुणपृथ्वी, अंतरीक्ष, दृह्यू हे तीन लोकखांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते.३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते.जानव्याच्या सुताची लांबी ९६ चौंगे असण्यामागे काही कारणे आहेत, ती अशी –प्रथम कारण – चतुर्वेदेषु गायत्री चतुर्विन्शत्येकाक्षरा | तस्मात् चतुर्गुणं कृत्वा ब्रह्मसुत्रं मदिरयेत् ||म्हणजे:-२४ अक्षरयुक्त गायत्री चारही वेदांमध्ये आलेली असल्यामुळे त्यानुसार ब्रह्मसुतांची लांबी (२४×४=९६) ९६ असते.दुसरे कारण म्हणजे –तिथि वार च नक्षत्र तत्ववेद गुणान्वितम् । कालत्रयम् च मासाश्च ब्रह्मसूत्र हि षण्णाव ||म्हणजे :-४ वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद )+ ३ काळ +२५ तत्वे (प्रकृती, पुरुष, महतत्व, अंहकार, पंच महाभुते,पंच विषय, पंच ज्ञानेद्रिय, पचं कर्मेद्रिय, मन) +३ गुण ( सत्व, रज, तम ) +१५ तिथी +७ वार +२७ नक्षत्रे +१२ महिने = ९६;ह्या सर्वांच्या बेरजेनुसार लांबी ९६ येते.तीसरे कारण म्हणजे –सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वतःच्या अंगुलांनी ८४ ते १०८ पर्यंत असते. त्याची सरासरी ९६ अंगुळे येते.हिंदू धर्मात एकूण १६ संस्कार आहेत. ते असे:-1. भूमिका2. गर्भाधान संस्कार3. पुंसाधन संसकार4. सीमन्तोन्नयन5. जातकर्म6. नामकरण संस्कार (बारसे)7. निष्क्रमण8. अन्नप्राशन संस्कार (बोळव)9. मुंडन/चूड़ाकर्म संस्कार (जावळ)10. विद्यारंभ संस्कार11. कर्णवेध संस्कार (कान टोचणे)12. यज्ञोपवीत /उपनयन संस्कार (मुंज)13. वेदारंभ संस्कार14. देशात संस्थार15. समावर्तन संस्कार16. विवाह संस्कारअन्त्येष्टि संस्कार आणि श्राद्ध संस्कारयांतील एका संस्कारात जानव्याचा उल्लेख केलेला आढळतो.पण, वर्णन केलेला उपनयन संस्कार / मौंज म्हणजे नेमके काय?गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, मौंज, व्रतबंध किंवा मौंजीबंधन असेही म्हणतात. गुरूंच्या जवळ राहून, ब्रम्हचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध होय. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. पहिला जन्म आई-बाबांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापसून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात कसे आले?प्राचीन काळी जेव्हा यज्ञाविधी किंवा कर्मकांड केले जात असे, तेव्हा विधी करणाऱ्याच्या शरीराच्या वरच्या भागावर ‘उत्तरीय’ पांघरलेले असावे, असा नियम होता. हे उत्तरीय डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या काखेखालून घेतले जात असे. प्राचीन काळी क्षत्रिय देखील यज्ञाविधि करायचे, त्या मुळे तेही ‘उत्तरीय’ पांघरत असत. पण तेव्हा हे उत्तरीय फक्त विधी चालू असताना पंघरणे बंधनकारक होते. नंतर ते काढून ठेवले तरी चालायचं. मनुष्य प्राणी वस्त्रहीन जन्माला येतो. आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे तो प्राण्याप्रमाणे वावरू शकतो. परंतु माणसाकडे संस्कृतीचा वारसा आणि जबाबदारी असते, म्हणून प्रौढत्त्वाकडे आणि स्वायत्ततेकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणून उपवस्त्र अर्थात् वरून घालायचा कपडा दिला जात असे. उपनयन अर्थात् मुंज हा तोच प्रकार आहे.मुंजीनंतर सदैव उपवस्त्र परिधान करावेच लागते. अंतर्वस्त्राशिवाय तर मुळीच वावरता येत नाही. मुंज झाल्यापासून “सत्यं वद। धर्म चर।” या आदेशाचे पालन अत्यावश्यक, मुंजीच्या आधीची सगळी पापे माफ असतात असे मानतात ते त्यासाठीच हा प्रकार फक्त हिंदुतच नव्हे तर जरतुष्टी (पारशी), ज्यू, आफ्रिकेतील मसाई अशा इतर समाजांतही असतो. जर तुष्टी (पारशी) धर्म हा वैदिक धर्माच्या जवळचा धर्म आहे. वैदिकांत ज्याप्रमाणे उपनयन हा द्वितीय जन्म मानला जातो आणि त्यावेळी बटूला यज्ञोपवित आणि मेखला दिली जाते, जरतुष्टी धर्मात नवजोत (नवीन जन्म) हा विधी असतो ज्यात बटूला सदरा (उपवस्त्र) आणि खुश्ती (मेखला) दिली जाते. ज्यू धर्मात मुलाच्या १३व्या वर्षी त्यावर बार मित्स्वा हा संस्कार केला जातो. वडील मुलाला तालित नामक शाल देतात जी धार्मिक विधी करताना डोक्या आणि खांद्यावरून ध्यायची असते, ह्या संस्कारानंतर मुलग्याचा पुरूष झाला असे समजले जाते. प्राचीन रोमन समाजात स्वतंत्र पराधीन/गुलाम नसलेल्या रोमन नागरिकाचा मुलगा १२-१३ वर्षांचा झाला की त्याल्या त्याचा पहिला तोगा (Toga) नामक लोकरी शाल दिली जात असे.जानव्याप्रमाणेच हा तोगा डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून असा घ्यायचा असतो. धार्मिक कार्यात तोग्याला विशेष महत्व असे. यज्ञ, बळी आदि धार्मिक विधी करताना यजमान त्याचा एक भाग आपल्या डोक्यावर घेत. रोमच्या पवित्र शहराच्या वेशीच्या (Pomerium) आत प्रत्येक रोमन नागरिकाने किमान सार्वजनिक ठिकाणी तरी तोग्याशिवाय फिरू नये असा प्रघात होता. याउलट रोमनेतरांनी आणि गुलामांनी तोगा घालू नये असा देखील नियम होता.आपल्या देशातील उष्म हवामान परिस्थितीमुळे आणि यज्ञकुंडाजवळ बसून राहावे लागत असल्याने ते दिर्घ काळ पांघरून ठेवणे कठीण होत असे. मग त्यावर पर्याय म्हणून तीन धाग्याचे प्रतिकात्मक उत्तरीय म्हणून जानवे किंवा यज्ञोपवीत अस्तित्वात आले.पुढे कालौघात ब्राह्मण जानवे सर्वकाळ घालू लागले आणि ते मग पुढे ब्राह्मण जातीचे प्रतीक बनले.रोमन सम्राट आणि महान तत्त्वज्ञानी पार्कस् ओरेलिअर ला बळी देताना अग्नि समक्ष उभ्या यजमानाने तागा डोक्यावरून घेतला आहे तर यजमानाच्या मागच्या माणसाने तो सामान्यपणे घातला आहे. कुह्राड धरलेला दास मात्र उघडा आहे.महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट ही त्याच्याशीच संबंधित आहे. द्रौपहीचे वस्त्रहरण म्हणजे बलात्काराचा प्रकार असा आजच्या काही लोकांत समज आहे. परंतु त्या काळी वस्त्रहरणाचा अर्थ वेगळा होता. दोन्ही बाबी लज्जास्पद आहेत पण आपण आपल्या आजच्या संदर्भात मूळ अर्थ पाहू शकत नाही. द्रौपदीला जेव्हा सभेत आणले जाते तेव्हा ती पाहते की पांडव बंधु स्वतः उपवस्त्राशिवाय बसले आहेत म्हणजे ते द्युद्धात आपले स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. आजच्या काळात साडी एका कापडाची असते, पण त्या काळी उत्तरीय (ओढणी) आणि अंतरीय (धोतर किंवा परकर) असे दोन प्रकार असत. वस्त्रहरणात द्रौपदीचे उत्तरीय खेचून घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडक्यात तिला गुलामासारखी वागणुन देण्याचा प्रयत्न केला. गेला नंतर दुर्योधन स्वतःची डावी मांडी थोपटतो. डावी मांडी ही पत्नीसाठी असते. उदाहरणार्थ: रामरक्षेत आलेले “वामाङ्कारूढसीता” अर्थात् रामाच्या डाव्या मांडीवर बसलेली सीता थोडक्यात कुठे त्या पांडवांसोबत गुलाम बनतेस? माझी पत्नी बन. एखाद्या स्त्रीसाठी आणि विशेषतः राजकुळातील स्त्रीसाठी हा घोर अपमान आहे. पण तो आजच्या काळी बलात्कार नाही. पण त्या प्रकरणातून उपवस्त्राचे त्या काळच्या समाजमानसातील महत्त्व दिसून येते. आजच्या काळातही आपण कोणाचा सत्कार करायचा झाला तर शाल किंवा उपरणे देतो.पण,फक्त ब्राह्मण लोकच जानवे घालतात का? नाही,काही लोकांचा असा गैरसमज आहे की ब्राह्मण स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी जानवे घालतात. वास्तव मात्र याच्या पूर्णपणे उलट आहे. पूर्व वैदिक काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीनच वर्ण अस्तित्वात होते. वैश्य ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यास तो विश् (अर्थात् गाव) या शब्दावरून येतो असे दिसते. वैश्य म्हणजे गावकरी, अर्थात् जनसामान्य ह्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिघांनाही उपवस्त्राचा (जानव्याचा) अधिकार होता. उत्तर वैदिक काळात जसा समाज अधिक जटिल होते गेला तशी वैश्य समाजाची विभागणी झाली, आणि त्यातून वैश्य (व्यावसायिक) आणि शूद्र (कामगार) समाजाची निर्मिती झाली. हा प्रकार नैसर्गिक आहे आणि तो इतर समाजांतही झालाचे आढळते. युरोपात औद्योगिकरणाच्या काळात भूतपूर्व शेतमजूर समाजाची औद्योगिक आणि मजूर समाजांत विभागणी झाली. शूद्र समाजाचे मूळ हे नक्की सांगता येणे कठीण आहे, पण ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या भागात तरी शूद्रांचा उल्लेख सापडत नाही. तो पहिला दिसतो तो पुरुषसुक्तात, जे फार नंतर रचले गेले. असो. नंतरच्या काळात ब्राह्मणेतर समाजात जानवे घालण्याचे प्रमाण कमी होत गेले. पण वैदिक अनुष्ठानाने हाच पेशा असल्यामुळे ब्राह्मणांत ते तसेच राहिले. आजच्या काळात जेव्हा ब्राह्मण इतर व्यवसायांकडे वळले आहेत, ब्राह्मण समाजातही जानव्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. अनेक प्राचीन देवालयांच्या मूर्तीत देव, दानव, ब्राह्मण, राजे, जनसामान्य, स्त्री देवता सगळेच जानवी घातलेले दिसतात.३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे ?जानवे कसे घालावे त्या विषयी शास्त्र संकेत असा की, ब्रह्मचार्याने एक आणि गृहस्थ व वानप्रस्थिय ह्यांनी दोन जानवी घालावी.उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो.ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।।या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो. ब्रह्मचाऱ्याने एक, गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनी दोन आणि यतीने एक यज्ञोपवीत धारण करावे असे देवलाने म्हटले आहे.प्राचीन काळी काळविटाचे चामडे किंवा वस्त्र जानवे म्हणून वापरत असत. तसेच प्राचीन काळी स्त्रियाही यज्ञोपवीत घालीत असत कारण विवाहसमयी वधूने यज्ञोपरीतिनी असावे असे गोभील गृह्यसूत्रात (२.१.१८) म्हटले आहे. ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे,क्षत्रियाने ताग्याच्या दोऱ्याचे आणि वैश्याने बकऱ्याच्या लोकरीच्या धाग्याचे जानवे वापरावे असे मनूने सांगितले आहे. (मनू २.४४)तसेच जानवे बदलत असताना देखील एक मंत्रोपचार सांगितला आहे:-एतावद् दिन पर्यंन्तं ब्रह्मं त्वं धारितं मया |जीर्णत्वात्त्वपरित्यागो गच्छ सुत्र यथा सुखम् ||म्हणजे:-हे यज्ञोपवीता, आजपर्यंत मी तुला धारण केले. पण, आता तुझ्या जिर्ण होण्यामुळे मी तुला त्यागत आहे.४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?जानवे डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात.पण,जानवे डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंस च उतरते का घालायचे?वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!परब्रह्मोपनिषद – १०ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताची मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहेकृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: अपवित्र झाल्यानंतर जानवे बदलले जाते. जानवे धारण केल्याशिवाय अन आणि पाणी ग्रहण केले जात नाही.आंघोळीच्या वेळेस जानवे खांद्या वरुन खाली न येऊ देता हाताने घासून स्वच्छ करावे.याज्ञवल्क्य ने जानव्याला ब्रह्मसूत्र असे म्हटले आहे. यज्ञोपवितातील लांबी जास्तीतजास्त कमरे पर्यंत असावी आणि कमीतकमी बेंबीपर्यंत असावी. ही लांबी उपरोक्त प्रमाणात यावी म्हणूनच यज्ञोपविताच्या मुख्यसुताची लांबी ते धारण करणाऱ्या व्यक्तीच्या अंगुलीप्रमाणानुसार असावी असे शास्त्र सांगते.ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे. जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे.शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुस-याचे जानवे घालू नये.जानवे तुटले तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे असे मनू सांगतो.एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनी जानवे बदलावे असे शास्त्र सांगते.निवीती दक्षिणकर्ने यज्ञोपवितं कृत्वा मुत्रपुरीषे विसृजेत ह्या शास्त्र वचनानुसार शौचसमयी व मूत्र विसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक आहे.आपली अशुचि अवस्था सूचीत करण्यासाठी देखील ही कृती उपयोगी पडते.शौचालयास जाऊन आल्यावर हातपाय धुऊन चुळा भरल्यावर मगच जानवे कानावरुन काढावे.रजस्वला, ओळी बाळंतीण, मृतदेह, चीतकाष्ठ, चिताधूम ह्यांचा शरीराला स्पर्श झाला असेल तर शितोदकाने सचैल स्नान करून अभिमांत्रित करून नवीन जानवे घालावे आणि पूर्वीचे विसर्जन करावे. एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनंतर जानवे बदलावे असा नियम सांगितला आहे.मुत्रविसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक सांगितले आहे.मग हातपाय धुवून चुळ भरल्यावर जानवे कानावरून काढावे. ह्या मागे शास्त्रीय कारण असे की शरीराचा नभी प्रदेशापासून वरचा भाग धार्मिक क्रियांसाठी पवित्र आणि खालचा भाग अपवित्र मानला गेला आहे.५) जानवे घातल्याने होणारे फायदे कोणते? शौचालयात जाताना हेच जानवे कानाला लावायचीही रीत आहे. कानाला जानवे दोन वेळा लपेटून घेतले तर कानाच्या दोन नसा ज्या पोटाच्या आतड्यांशी संबंधित असतात त्या जागृत होऊन अपचनासारखे विकार दूर होतात हा एक शास्त्रीय फायदा आहे.ॲसिडिटी, पोटाचे विकार, ब्लड प्रेशर आणि इतकंच नाही, तर हृदयरोग या क्रियेमुळे दूर राहू शकतात.मूत्र विसर्जन करताना डाव्या कानाला जानवे लपेटून ठेवल्यामुळे शुक्र बिजांचे रक्षण होते असंही म्हटलं जातं.ज्या पुरुषांना स्वप्रदोषासारखे विकार आहेत त्यांनी कानाला जानवे लपेटून झोपले तरीही फरक पडू शकतो.एकदा जानवे गळ्यात घातले की, माणसाचे विचार, आचार बदलून ते शुद्ध होतात. त्याच्या शब्दांमध्ये माधुर्य येते.आदित्य, वसू, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, सूर्य, अनिल, प्रभुती देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने केवळ स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते.उजव्या कानाला सुत्राने लपेटल्यावर शुक्रनाशापासून बचाव होतो हे आयुर्वेदशास्त्र दृष्ट्या सिध्द झालेले आहे..तात्पर्य:- केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने यज्ञोपवीत घालणे हे उपकारक असल्यामुळेही यज्ञोपवीत सदा धारण केलेले असावे.
Subscribe to:
Comments (Atom)