Wednesday, 22 November 2023

ll श्री शंकर ll आज प्रबोधिनी एकादशी तसेच तुलसी शालिग्राम ( श्रीकृष्ण ) विवाहll श्रीतुलसीस्तुती ll तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ १॥मनः प्रसादजननि सुखसौभाग्यदायिनि ।आधिव्याधिहरे देवि तुलसि त्वां नमाम्यहम् ॥ २॥यन्मूले सर्वतीर्थानि यन्मध्ये सर्वदेवताः ।यदग्रे सर्व वेदाश्च तुलसि त्वां नमाम्यहम् ॥ ३॥अमृतां सर्वकल्याणीं शोकसन्तापनाशिनीम् ।आधिव्याधिहरीं नॄणां तुलसि त्वां नम्राम्यहम् ॥ ४॥देवैस्त्चं निर्मिता पूर्वं अर्चितासि मुनीश्वरैः ।नमो नमस्ते तुलसि पापं हर हरिप्रिये ॥ ५॥सौभाग्यं सन्ततिं देवि धनं धान्यं च सर्वदा ।आरोग्यं शोकशमनं कुरु मे माधवप्रिये ॥ ६॥तुलसी पातु मां नित्यं सर्वापद्भयोऽपि सर्वदा ।कीर्तिताऽपि स्मृता वाऽपि पवित्रयति मानवम् ॥ ७॥या दृष्टा निखिलाघसङ्घशमनी स्पृष्टा वपुःपावनीरोगाणामभिवन्दिता निरसनी सिक्ताऽन्तकत्रासिनी ।प्रत्यासत्तिविधायिनी भगवतः कृष्णस्य संरोपितान्यस्ता तच्चरणे विमुक्तिफलदा तस्यै तुलस्यै नमः ॥ ८॥ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll

Thursday, 19 October 2023

दंतासुरमर्दिनी कुमारी अंबेजोगाई,भवानी अंबेजोगाई lभाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई ll धृ llदोन नेत्रीच्या निरांजनाने तुजला ओवाळूमाते तुजला ओवाळू lसत्कर्माचा धूप सुगंधित तुझ्यापुढे जाळू llतवपदकमली लीन निरंतर पावे झणी मातेमजला पावे झणी माते lधावत येई अघरराशीचा नाश कराया ते ll १ llसद् भावाच्या फुलं वेलीवर भक्ती फुले आलीमाते भक्ती फुले आली lवेचूनिया ती तव पदकमलावर प्रेम अर्पियली llतुझ्या कृपेने दैन्य दुःख ही लोपूनिया गेलेवर दे सौख्य घरा आले lशांतीसुखाने मानस माझे आनंदित झाले ll २ llयोगेश्वरी हे कुलस्वामिनी आशिर्वच द्यावामजला आशिर्वच द्यावा lतव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा llनारायण नतमस्तक चरणी प्रार्थितसे आईप्रेमे प्रार्थितसे आई lहृदयमंदिरी वास कराया यावे लवलाही ll ३ llही योगेश्वरी देवीची आरती बहुसंख्य चित्पावन घरात सकाळ संध्याकाळ म्हंटली जाते....बोडणाला, नवरात्रात, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही आरती म्हणण्याची पद्धत आहेच तसेच शकुनाची कामे करताना, वर्षाचे पापड घालताना, भात कांडताना, दळण दळताना, हळद करताना, इत्यादी शुभ कामे करतानाही ही आरती वेगळ्या वेगळ्या चालीत म्हंटली जाते...अंबेजोगाई ला ' धन्य अंबापुर ' ही आरती म्हणण्याची पद्धत आहे...ती स्थान वर्णन करणारी आरती आहे...आणि ही भाव व्यक्त करणारी....शक्य झाल्यास ज्यांच्याकडे ही आरती म्हणत नाहीत त्यांनी या नवरात्री पासून ही आरती म्हणण्याची पद्धत सुरू करा...यातील प्रत्येक ओळीनुरुप भाव व्यक्त होऊन मन जास्तीत जास्त देवी जवळ जाण्यास मदत होईल...इति श्री©® अतिक श्वेता सुभाष वर्तक भाद्रपद कृ. नवमी, शके १९४५

Thursday, 28 September 2023

#विकिर_प्रकिर_उच्छिष्ट ।१) #विकिर ब्रह्मदेवाने सृष्टि रचली त्या आधी तिच्या अन्नाची व्यवस्था केली , त्यात देवांसाठी सोमभाग योजला ,, म्हणजे सोमाची आहूति हे देवांचे अन्न आहे ।सोम ग्रहण करून देव पुष्ट होतात । पण अश्विनीकुमार हे वैद्य या यज्ञसंस्थेतून वर्जित झाले ,, कारण इंद्रादि देव अश्विनीकुमारांना आपल्या पंक्तीत स्थान देत नसत ।या अश्विनीकुमारांसाठी सर्वप्रथम च्यवन ऋषींनी सोमभाग अर्पण केला,, त्यानंतर श्रौत कर्मात 'सामवेदी बहिष्पवमान' आणि ऋग्वेदी 'आश्विनसाहस्र' या मंत्रांच्या साहाय्याने अश्विनी कुमारांना यज्ञभाग दिला जाऊ लागला ।पण सांप्रत काळात श्रौत कर्म घडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे ।आज सर्वत्र स्मार्त कर्म घडते ।। स्मार्त कर्म म्हणजे ,,,गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या उपचारांनी पूजन अर्चन, यजन याजन,, होम हवन ,, कलश स्थापन , विग्रह पूजा,, श्राद्ध पक्ष... शांती, संस्कार, प्रतिष्ठा, पीडा परिहार,,, इत्यादी सर्व कर्मे हि स्मार्त कर्म आहेत ।यातील श्राद्ध कर्मामध्ये या असोमपा देवांसाठी अन्नाची व्यवस्था पूर्वसुरींनी केली आहे ।असोमपाश्च ये देवाः यज्ञभाग विवर्जिताः ।तेषामन्नं प्रदास्यामि विकिरं वैश्वदेविकम् ।।अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य आहेत । सर्व देवांना मानव आहूति देतो ,, आणि देव मानवांना समृद्धी देतात,, त्यांची पीडा दूर करतात ।देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ।। भगवद्गीता ३-११त्यामुळे जसे आपण देवांचे देणे लागतो तसेच देवांच्या वैद्यांचे सुद्धा देणे लागतो ।असोमपा देवांना ग्रासमात्र देऊन आपण आपलेच कल्याण करतो ।श्राद्ध विधीत पिंडदान झाल्यानंतर उरलेल्या पिंडासाठी कालवलेला जो भात उरतो त्यात तीन भाग काढले जातात,,, त्यात पहिला भाग हा असोमपा देवांसाठी असतो त्याला विकिर म्हणतात ।२) #प्रकिर संस्कार ! म्हणजे नामकरण, मुंज, विवाह इत्यादी न होता गेलेल्या जीवांना 'असंस्कृत' अशी संज्ञा आहे,, कोणत्याही कारणाने एखाद्या स्त्रीचा त्याग केला गेला असेल तर अशा स्त्रियांचे अंत्यकर्म नीट होत नाही ।पूर्वी हा प्रकार खूप घडायचा,, मूल होत नाही म्हणून दुसरा विवाह,, दुसरा विवाह केल्यावर दुसऱ्या पत्नीला जी संतति व्हायची ती सावत्र आईसाठी सर्व क्रिया करेलच याची शाश्वती नसते कुटुंबात जे कुमार कुमारिका लहान वयात जातात ,, ज्यांना दहन केले जात नाही,, पुरले जाते,, यांचे संपूर्ण और्ध्वदेहिक करायचे नसते गर्भस्राव होतो,, गर्भातच बालक मरते ,, (अथवा मुद्दाम मारले जाते) यांचे देखील काही दिवसकार्य होत नाही १)विवाह न होता गेलेली स्त्री, २)परित्यक्ता स्त्री, ३)मुंज/सोडमुंज/विवाह इत्यादी संस्कार न होता गेलेला मुलगा, ४)कुमारावस्थेत गेलेले जीव, ५)गर्भातच मरण पावलेले जीव यांच्या तृप्तीसाठी पिंडातून उरलेल्या भाताचा एक घास काढला जातो ज्याला #प्रकिर म्हणतात ।असंस्कृतप्रमीता ये त्यागिन्यो या कुलास्त्रियः ।ददामि तेभ्यः प्रकिरमन्नं ताभ्यश्च पैतृकम् ।।३) #उच्छिष्ट : व्यवस्था अशी आहे , कि जेव्हा विवाह होतो तेव्हा जे होम केले जातात , त्यातील एक होम आहे गृहप्रवेशनीय होम । हा होम करून मग नवीन दाम्पत्याने गृहप्रवेश करायचा आहे ।आणि दोघेही जिवंत असेपर्यंत त्या अग्नीचे रक्षण करायचे आहे ।आणि सूर्योदय-सूर्यास्त काळी त्या अग्नीत निर्धारित आहुत्या द्यायच्या आहेत ।आणि जेव्हा दोघांपैकी एक कोणीतरी मरण पावेल तेव्हा तो आयुष्यभर रक्षण केलेला अग्नि मातीच्या मडक्यात भरून स्मशानावर घेऊन जायचा ,, आणि त्याच अग्नीवर त्या गृहस्थाचे दहन करावे ,, सांप्रत काळात या पद्धतीचा बहुतांशी लोप झालेला आहे ।गृहप्रवेशनीय होमाच्या अग्नि व्यतिरिक्त अन्य लौकिक अग्नीवर आज आपण मृताचे दहन करतो ।अशा प्रकारे दहन झालेल्या जीवाला 'अनग्निदग्ध' म्हणतात ।ज्या दाम्पत्याने आयुष्यभर अग्नीचे रक्षण केले आहे,, आता दोघांपैकी एक गेल्यावर असलेला अग्नि त्या मृतासोबत स्मशानात गेला,, आता दोघांपैकी जो नंतर जाईल त्याच्या दहनासाठी अन्य गृहस्थाचा गृहयाग्नि मडक्यात घेतला आणि त्याचे दहन केले तर त्या जीवाला 'अग्निदग्ध' असे म्हणतात ।यांचे सर्व और्ध्वदेहिक होते ,, पण आयुष्य भर जी आहूति दिली गेली हवी होती ती न दिली गेल्यामुळे यांच्या तृप्तीत एक न्यूनता असते ।गृहस्थाला प्रतिदिन हवन करणे अनिवार्य आहे । यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।। भगवद्गीता ३-१३या पितरांच्या तृप्तीतील न्यूनता जावी यासाठी पिंडातून उरलेल्या भाताचा एक भाग काढला जातो त्याला #उच्छिष्ट पिंड असे म्हणतात ।आपल्या आयुष्यामध्ये दृश्यमान आणि अदृश्यमान अशा दोन्ही जगतांचे अस्तित्व असते आणि त्या दोन्ही घटकांचा आपल्यावर दृश्य आणि अदृश्य परिणाम होत असतो ।श्राद्ध संस्थेत या सर्वांचा विचार करून त्यातून आपले हित कसे होईल आणि त्यासाठी आपण त्यांचे कसे करायला हवे याचे विधान आहे ।हे झाले नित्य श्राद्धातील एका अत्यंत छोट्या भागाबद्दल,, तेही संक्षिप्त स्वरूपात ।महालय श्राद्धात अधिक व्यापक विचार आहे ।त्यावर यथावकाश लिहिनच ।सर्वांना तृप्त करणारी श्राद्धसंस्था हि साक्षात कामधेनुच आहे ।सागर सुहास दाबके ।

Wednesday, 5 July 2023

#श्री_योगेश्वरी_प्रगट_दिन🙏🏻🌼🙏🏻#अंबाजोगाई 🙏🏻🌼🙏🏻#कुलदेवता 🙏🏻🌼🙏🏻दंतासुर मर्दिनी कुमारी अंबाजोगाई , भवानी अंबाजोगाईभाव भक्तीने तुला आरती योगेश्वरी आई ||दो नेत्रांच्या निरांजनाने तुजला ओवाळू माते तुजला ओवाळू सत्कर्माचा धूप सुगंधी तुझ्यापुढे जाळूतवा पदकमली लीन निरंतर पावे झणी माते मजला पावे झणी माते धावत येईल अघराशींचा नाश करायाते ||सदभावांच्या फुले वेलींवर भक्ती फुले आली माते भक्ती फुले आली वेचूनिया ती पदकमलांवर प्रेमे अर्पियलीतुझ्या कृपेने दैन्य दुःख ही लोपूनिया गेले वरदे सौख्य घरा आले शांती सुखाने मानस माझे आनंदित झाले ||योगेश्वरी हे कुलस्वामिनी आशीर्वच द्यावामजला आशीर्वच द्यावा तव नामाचा गजर मुखाने अविरत चालावा नतमस्तक मी होऊनी चरणी प्रार्थितसे आई, प्रेमे प्रार्थितसे आईह्रदयमंदिरी वास कराया यावे लवलाही ||आरती शब्द - श्री. नारायण बापट

Wednesday, 14 June 2023

विषय : कुंडलीची रचनालेखक : ज्योतिष मित्र मिलिंदसंदर्भ : संदर्भ : ज्योतीर्मयुखनमस्कार,अनेक समस्यां वा संधी जाणून घेण्यासाठी ज्योतीषाकडे जाऊन कुंडली दाखवून मार्गदर्शन घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. परंतू कुंडली म्हणजे काय हे अनेक जणांना माहीत नसते. कसले तरी चौकोन आखून त्यात आकडे व ग्रह लिहून काय सांगितले जाते हे तर अगाध ज्ञान.वास्तविक पणे ज्योतिष शास्त्र आपली सूर्यमाला व त्यातील ग्रहांची आकाशस्थ स्थिती, ग्रहांची गती व त्यांचा एकेमेकांशी साधला जाणारा कोन आणि या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम यावर आधारित आहे.आपल्या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांचा क्रम पहिला तर लक्षात येईलसूर्यबुधशुक्रपृथ्वीमंगळगुरुशनीआता या वर्तुळाकार मार्गास मधून छेद दिला असता त्याचे डावा व उजवा असे दोन भाग होतील.आता पृथ्वी वरून सूर्यमाला पाहिली असता पृथ्वी सोडून सूर्य, इतर ६ ग्रह व सूर्याचा प्रकाश पृथ्वी वर परावर्तीत करणारा चंद्र आपल्या नजरेस वास्तविक क्रमाने दिसतील.या सर्व आकाशस्थ स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मांडलेला नकाशा म्हणजे कुंडली.कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला जी ची मांडणी अत्यंत वास्तविक व थक्क करणारी आहे.सूर्यमालेत ज्याप्रमाणें ग्रहांचा अनुक्रम वास्तविक आहे, त्याप्रमाणे राशींची वाटणी केली गेलीं आहे. सर्व राशींत जी सिंह राशि तिचें स्वामित्व दैदीप्यमान व जगाचें उत्पत्तिस्थान असा मुख्य ग्रह जो सूर्य त्याच्याकडे आलें.सूर्याच्या खालोखाल चंद्राचें तेज असल्यामुळें सूर्यराशीच्या पूर्वीची जी कर्क राशि तिचें आधिपत्य चंद्राकडे आलें.नंतर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध त्याच्या राशी सिंह राशीच्या पुढील कन्या व कर्क च्या मागील मिथुन असा बुधाचा पट्टा विभागला गेला.बुधाच्या नंतर शुक्र आहे, म्हणून बुधाच्या ज्या दोन राशि मिथुन व कन्या त्यांच्या मागील एक व पुढील एक म्हणजे वृषभ व तूळ अशा दोन राशींवर, वरील न्यायानें शुक्राचें स्वामित्व ठरलें.शुक्राच्या नंतर मंगळ आहे. म्हणून शुक्राच्या मागील व पुढील एक एक राशि म्हणजे मेष व वृश्चिक अशा दोन राशि मंगळाच्या झाल्या.मंगळानंतर गुरु आहे, म्हणून मेष च्या मागील एक व वृश्चिक च्या पुढील एक म्हणजे मीन व धनु अशा दोन राशि गुरूच्या झाल्या.शेवटीं शनि आहे म्हणून मीन च्या मागील राशि कुंभ व धनु राशीच्या पुढील राशि मकर अशा दोन राशींवर शनीचें स्वामित्व ठरलें. आता लक्षात येईल कि शनीच्या दोन्ही राशी शेजारी का येतात.खरोखर ही रचना पाहून मनास अत्यानंद वाटतो. ज्योतिषांत अशा तऱ्हेचें सयुक्तिक व चमत्कारिक प्रकार अनेक असतील; किंबहुना प्रत्येक गोष्टीविषय असें मौजेचें कांहींतरी असेल. परंतु आपल्या अल्प बुद्धीला तें गम्य नाहीं इतकेंच. शिवाय आमच्या प्राचीन विद्वान ज्योतिर्विदांनी जरी अनेक शोध, मूल्यवान विचार ग्रंथित करून ठेविले आहेत सोबत दिलेल्या सूर्यमालेच्या आकृतीवरून कुंडलीची रचना सहज समजून येईल.ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)संपर्क : 7058115947(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Tuesday, 30 May 2023

*गदिमांची मंगलाष्टके*तेजःपुंज दिसे प्रवालगिरिसा, रक्तांबरा नेसलादेवांचा अधिदेव तो गणपती या मंडपी बैसलापूजा मान्‍य करी, प्रसन्‍न वदनें स्‍वीकारली वंदना आता एकच मागणे गजमुखा ‘कुर्यात् बटोर्मंगलम्.... अंबा अष्‍टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्‍वामिनीआली लग्‍नघरी निवास करण्‍या आवाहना ऐकुनी आता तीच उभी मुठीत मिटल्‍या घेऊनिया अक्षतामाते, हो वरदायिनी वधुवरा, ‘कुर्यात् बटोर्मंगलम् !अग्‍नी, ब्राम्‍हण, आप्‍त, मित्र, अवघ्‍या आवाहिता देवताआनंदे नवदंपतीस बघती, अन् वर्षती अक्षताआशीर्वाद म्‍हणून तांदुळ धरा हे आपुल्‍या मस्‍तकीमागा हेच पुनःपुनः वरवधू, ‘कुर्यात् सदा मंगलम्’घेई जन्‍म नवा शिवास वरण्‍या दाक्षायणी ना वृथा तर्कातीत तरीहि सार्थ पहिल्‍या मातापित्‍यांची कथाप्रीतीभाव असा चिरंजिवपणें जन्‍मांतरी नांदतोश्रद्धा हीच तुम्‍हांस सौख्‍यद ठरो, ‘कुर्यात् सदा मंगलम्’प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो हे सत्‍य ध्‍यानी धरा आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती सदा आदरा सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्‍यापित्‍यांनी दिलेत्‍यांचे श्रेय सुखप्रद तुम्‍हां, ‘कुर्यात सदा मंगलम्’वडिलपण मुलांनो, आमुचे धन्‍य व्‍हावेचढत चढत तुम्‍ही जीवनी उंच जावे मनसि वसत आहे, तोच आतून बोलेसकळ शुभद झाले, सौरभा सूर आलेआता बाळपणा सरे, उभयता ठाका उभे जीवनीस्‍वामी मान पतीस तू परिणिते, होई खरी स्‍वामिनीलाभू द्या धनसंपदा, यश, तुम्‍हां दीर्घायु सौख्‍यप्रदवाढू द्या यशवंत वंश तुमचा, कुर्यात् सदा मंगलम्अण्णा माडगूळकर******************************जवळ जवळ आला मीलनाचा मुहूर्तउभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थझटपट पट आता मित्र हो दूर साराअधीर बहुत झाला पंख येती जीवाला (1)रडूनि रडुनी डोळे लाल झाले मुलीचेकवण कथित सारे दुःख त्या माऊलीचेहळू हळू मग कन्या नीट मार्गासी जाईपुसत पुसत डोळे माय ती तीस पाही (2)मधुर मधुर वाद्ये वाजती मोहदायीवधु वर करी माला घेऊनि सज्ज होईजवळ जवळ आली ही घडी मीलनाचीमुदीत मुदीत प्रेमे भेट दोन्ही जीवांची (3)आता सावध सावधान समयो आला समीप असेआशीर्वाद हा पलार्ध घटिका संपूर्ण आली असे चित्ती गौरीहरा शची सुरवरा श्री रुक्मिणी माधवाचिंतावे कुलदेवता सततही कुर्वन्तु वो मङ्गलम् (4)चांदण्यात चांदणे पौर्णिमेचेलुगड्यात लुगडे पैठणीचे नवे लुगडे नेसता हर्ष वाटेपती पाहता ठेंगणा स्वर्ग वाटे (5)रमत गमत येता आज नवरदेव चढत चढत जाई नवऱ्या मुलीस चेवसरत सरत येई वेळ ती मुहूर्ताचीभरत भरत आली घटिका हि विवाहाचीअजब गजब घटना परत परत नाही रडत रडत नवरी सासुरासी जाई (6)*******************************

Sunday, 28 May 2023

*ज्योतिष शास्त्रानुसार तिथीला महत्त्व आहे = कोणत्या तिथीला कोणते कर्म करावे अथवा न करावे या बाबतीत माहिती*प्रतिपदा तिथी == कृष्ण पक्षातील प्रतिप्रदेत चंद्राला बलवान मानल गेलंय आणि शुल्क पक्षातील प्रतिपदेत चंद्राला निर्बल मानल गेले आहे. म्हणून प्रतिपदा तिथीत घराचे बांधकाम, गृहप्रवेश, वास्तू पूजा, लग्न, शांन्ति, यात्रा, प्राणप्रतिष्ठा इत्यादी चांगली कार्य केले जातात... शुक्ल पक्षातील प्रतिपदेत लग्न, यात्रा, व्रत, प्राणप्रतिष्ठा, सिमंन्त पूजन, चूडाकर्म, वास्तुकर्म, गृहप्रवेश इत्यादी कार्य करू नयेत....द्वितीया तिथी == विवाह मुहूर्त, यात्रा, दागिने खरेदी, शिलान्यास, देश वा राजकिय संबंधित कामे, वास्तुकर्म, उपनयन इत्यादी कार्य करणे शुभ मानल गेलयं परंतु या तीथीला तेल लावणे वर्जित आहे....तृतिया तिथी == शिल्पकला वा त्या संबंधित कार्य, सिमंतपूजन, चूडाकर्म, लग्न, गृहप्रवेश, उपनयन, राज्या संबंधित कार्य इत्यादी शूभ कार्य करतात....चतुर्थ तिथी == सर्व प्रकारच्या वीजेची कामं, शत्रूला हटलायचं काम, अग्नी संबंधित, शस्त्राचा वापर इत्यादी साठी ही तिथी चांगली आहे. परंतु क्रुर प्रवृत्ती च्या कामासाठी योग्य नाहीपंचमी तिथी = या तीथीला सर्व कार्यासाठी सर्व तीथींसाठी उपयुक्त मानली गेलीय. परंतु या तिथीत कूणालाहि कर्ज देऊ नये....षष्ठी तिथी = या तीथीला युध्दा साठी वापरले जाणारे शस्त्र, शिल्प कार्याला सुरवात, वास्तुकर्म, गृहप्रवेश, नवीन कपडे वापरणे अशा शुभ कार्या साठी योग्य मानली आहे. परंतु तेल अभ्यंग, पित्रांचे कार्य, आवाहन, दानकर्म, काष्ठकर्म, इत्यादी वर्जित मानल गेलय.... सप्तमी = ही तीथी लग्न मुहूर्त, संगीत कार्यासंबंधी दागिने बनविण्यासाठी नविन दागिने घालण्यासाठी, वधू प्रवेश, यात्रा, वधु प्रवेश, गृह प्रवेश, राजकिय कार्य, वास्तूकार्य, चूडाकर्म, उपनयन, संस्कार इत्यादी साठी शुभ मानली गेलीय....अष्टमी = या तिथीत लेखन, यूध्दासाठी चे कार्य, वास्तू कार्य, शिल्पा संबंधित, रत्ना संबंधित, आदानप्रदान संबंधित काम, अस्त्र - शस्त्र वापरण्यासंबंधित सूरवात करता येते.....नवमी स्थिती = या तिथीत शिकारीला जाणे, भांडण उकरून काढणे, सट्टा खेळणे, शस्त्रे निर्माण करणे, दारू निर्मिती अशी वाईट काम करतात...... दशमी तिथी = यात सरकार संबंधित राजकीय कार्याची सुरवात, हत्ती, घोडे, संबंधित कार्य लग्न, संगित, दागिने, कपडे, यात्रा, इत्यादी करता येतात गृह प्रवेश, वधु प्रवेश, चुडा कर्म, उपनयन, जेवण खाणे इत्यादी कामे करता येतात..... एकादशी = या तीथीत व्रत, सर्व धार्मिक कार्य, देवाचा उत्सव, उद्यापन, वास्तुकार्य, यूध्दाच्या संबंधित कार्य, शिल्प यज्ञैपवित, गृह प्रवेश यात्रा इत्यादी कार्य करतात..... द्वादशी= या तिथीत लग्न वा अन्य शुभ कार्य केले जातात परंतु तेलमर्दन, नवीन घराची निर्मिती, वा गृहप्रवेश, यात्रा या गोष्टी नाही केल्या पाहिजेत.... शुक्लपक्षी त्रयोदशी तिथी = यूध्दासाठी चे कार्य अस्त्र शस्त्र, राजकिय कार्य, वास्तू कार्य, संगीत विद्येशी संबंधित काम या तीथीत करता येतात परंतु यात्रा, गृह प्रवेश, नवीन दागिने, वस्त्र, यज्ञोपवित, वगैरे शुभ कार्य टाळले पाहिजे.....चतुर्थी = या तिथीत सर्व प्रकारच्या उग्र व क्रूर कार्यांना प्राधान्य दिले जाते. शस्त्र निर्माण इत्यादी प्रयोग केले जातात. यात्रा करणे वर्जित आहे.....पौर्णिमा = पौर्णिमेत शिल्प, दागिने, संबंधित कामे, यूध्द, विवाह, यज्ञ, बोटीतून प्रवास, शांती देणारे, योग्य मंगल कार्य करतात.....अमावस्या = पितृदोष, मुख्य रूपात केल जातं. महादान, ऊग्रकर्म केले जातात. या तिथीत चांगले शुभ काम व स्रि संग इत्यादी वर्जित म्हटलं आहे..... अमरनाथ परब वैदिक ज्योतिष, अंक ज्योतिष, वास्तु मार्गदर्शक व *सर्वसामान्य ज्योतिष* अयनांश म्हणजे खगोलातील ज्या स्थिर बिंदूपासून सूर्य, चंद्र वा ग्रह यांचे भोग दिलेले असतात, त्या स्थिर बिंदूचे वसंतसंपातापासून क्रांतिवृत्तावरील अंतर होय, आपण दोन अयन मानतो उत्तरायण आणि दक्षिणायन उत्तरायण = आपल्या पंचांग प्रमाणे मकर संक्रांतीला (१४/१५ जानेवारी) चालू होते. सूर्यमध्य पद्धती (पाश्चात्य) प्रमाणे २२ डिसेंबर ला चालू होते. (लहान दिवस मोठी रात्र) दक्षिणायन = आपल्या पंचांगाप्रमाणे कर्क संक्रांतीला १६/१७ जुलै ला चालू होते सूर्यमध्य पद्धती (पाश्चात्य) प्रमाणे २२ जूनला चालू होते. (मोठा दिवस लहान रात्र)आपण सहा ऋतू मानतो १. चैत्र वैशाख = वसंत ऋतू २. ज्येष्ठ आषाढ = ग्रीष्म ऋतू. ३. श्रावण भाद्रपद = वर्षाऋतू ४ अश्विन कार्तिक = शरद ऋतू ५.. मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू ६. माघ फाल्गुन शिशिर ऋतू महिने = १२ वर ऋतूत हिंदू महिने पण आलेत. दोन पक्ष शुक्ल ( शुद्ध) आणि कृष्ण (वद्य)तिथी = ३०शुक्ल ( शुद्ध) १. प्रतिपदा २. द्वितीया ३. तृतीया ४. चतुर्थी ५. पंचमी ६. षष्ठी ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ११.. एकादशी १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चतुर्दशी १५ पौर्णिमा. कृष्ण (वद्य)१. प्रतिपदा २. द्वितीया ३. तृतीया ४. चतुर्थी ५. पंचमी ६. षष्ठी ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ११.. एकादशी १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चतुर्दशी ३९ अमावस्या. नंदा, भद्रा, जया, रिक्ता व पूर्णा ह्या क्रमाने प्रतिपदेपासून तिथींची नवे आहेत. षष्टीपासून तीच पुनःपुन्हा येतात. योग आणि करण नावे आपण मागच्या भागात पाहिली आहेत. जुन्या ग्रंथांतून प्रत्येक गोष्टीची फळे दिली आहेत. ती पाहू. १. ऋतूफळ १. वसंतऋतुमध्ये जन्मणारा जातक उद्योगी, बुद्धिमान तेजस्वी, भरपूर काम करणारा आणि अनेक देशांशी व्यापार करणारा असतो २. ग्रीष्म ऋतू मध्ये जन्मणारा जातक भरपूर कामांचा आरंभ करणारा, क्रोध नसणारा, भुकेला, कामुक उंच, शूर, असतो ३. वर्षाऋतुमध्ये जन्मणारा जातक गुणवान, भोगी, राजकडून पूजला जाणारा, जितेंद्रिय, सत्य बोलणारा असतो. ४. शरदऋतुमध्ये जन्मणारा जातक व्यापारी, शेतकरी, धनधान्याने समृद्ध, तेजस्वी, लोकांमध्ये प्रसिद्ध असतो. ५. हेमंत ऋतुमध्ये जन्मणारा जातक बलवान, नीतिमान, गावात राहणार, सतत उद्योग करणारा, छोटे पाय लहान गळा असणारा असतो. ६. शिशिरऋतुमध्ये जन्मणारा जातक रूपवान, उत्कट मोठाली कामे करणारा, भुकेला (क्षुधायुक्त) आणि कामुक असतो. पक्ष फळ शुक्ल पक्षात जन्मणारा जातक पूर्णचंद्राच्या कांतीसारखा दिसणारा, श्रीमान, व्यावसायिक, अनेक शास्त्रे जाणणारा कुशल आणि ज्ञानी असतो. कृष्णपक्षात कठोर, दुर्मुख, मूर्ख, स्त्रीयांशी वैर करणारा, लोकांनी तिरस्कारलेला आणि दुसऱ्यांची सेवा करणारा असतो. वारफळ रविवारी जन्मणारा जातक मिष्टान्न खाणारा मानी, क्रोधी, मैथुनप्रिय, पित्त प्रकृती, आणि धनाची लालसा असणारा असतो. सोमवारी जन्मणारा जातक भोगी, कामी, शास्त्रवेत्ता, गुणी, मानी, जितेंद्रिय, उच्च शिक्षित, आणि शिलवन्त असतो. मंगळवारी जन्मणारा जातक मूर्खांमध्ये प्रिय, क्रोधी, धनी, श्रुतिस्मृतींची निंदा करणारा, नास्तिक, वेद न मानणारा असतो. बुधवारी जन्मणारा जातक वेदशास्त्राप्रमाणे वर्तन करणारा, दयाळू, भित्रा परंतु योगयुक्त असतो. गुरुवारी जन्मणारा जातक वेदाध्ययन करणारा अग्निहोत्री, मुलाबाळांनी युक्त, धनवान, भरपूर लोकसंग्रह असलेला पूर्ण विद्वान असतो. शुक्रवारी जन्मणारा जातक धनवान भोगी, शूर, भरपूर नोकर असणारा दयाळू, दैवज्ञ, आणि वेद जाणणारा असतो. शनिवारी जन्मणारा जातक वाईट लोकांमध्य वावरणारा, कुटिलमती, कृतघ्न, भावंडाना त्रास देणारा, सत्कर्मात अडथळे आणणारा, आणि रोगी होतो. टीप: ज्या वारी जन्म असेल तो ग्रह उपचय स्थानात (३,६,१०,११) स्थानात असेल तर फळ मिळते नाहीतर तसे फळ मिळत नाही.विश्वास गणपुले लेखनसीमा क्रमश:

Monday, 8 May 2023

[5/8, 11:35 AM] +91 94049 12121: तारास्तोत्रम् अथवा ताराष्टकं अथवा श्रीनीलसरस्वतीस्तोत्रम् श्रीगणेशाय नमः ।मातर्नीलसरस्वति प्रणमतां सौभाग्यसम्पत्प्रदेप्रत्यालीढपदस्थिते शवहृदि स्मेराननाम्भोरुहे ।फुल्लेन्दीवरलोचने त्रिनयने कर्त्रीकपालोत्पले खड्गंचादधती त्वमेव शरणं त्वामीश्वरीमाश्रये ॥ १॥वाचामीश्वरि भक्तिकल्पलतिके सर्वार्थसिद्धिश्वरिगद्यप्राकृतपद्यजातरचनासर्वार्थसिद्धिप्रदे ।नीलेन्दीवरलोचनत्रययुते कारुण्यवारान्निधेसौभाग्यामृतवर्धनेन कृपयासिञ्च त्वमस्मादृशम् ॥ २॥खर्वे गर्वसमूहपूरिततनो सर्पादिवेषोज्वलेव्याघ्रत्वक्परिवीतसुन्दरकटिव्याधूतघण्टाङ्किते ।सद्यःकृत्तगलद्रजःपरिमिलन्मुण्डद्वयीमूर्द्धज-ग्रन्थिश्रेणिनृमुण्डदामललिते भीमे भयं नाशय ॥ ३॥मायानङ्गविकाररूपललनाबिन्द्वर्द्धचन्द्राम्बिकेहुंफट्कारमयि त्वमेव शरणं मन्त्रात्मिके मादृशः ।मूर्तिस्ते जननि त्रिधामघटिता स्थूलातिसूक्ष्मापरा वेदानां नहि गोचरा कथमपि प्राज्ञैर्नुतामाश्रये ॥ ४॥त्वत्पादाम्बुजसेवया सुकृतिनो गच्छन्ति सायुज्यतांतस्याः श्रीपरमेश्वरत्रिनयनब्रह्मादिसाम्यात्मनः ।संसाराम्बुधिमज्जने पटुतनुर्देवेन्द्रमुख्यासुरान्मातस्ते पदसेवने हि विमुखान् किं मन्दधीः सेवते ॥ ५॥मातस्त्वत्पदपङ्कजद्वयरजोमुद्राङ्ककोटीरिणस्तेदेवा जयसङ्गरे विजयिनो निःशङ्कमङ्के गताः ।देवोऽहं भुवने न मे सम इति स्पर्द्धां वहन्तः परेतत्तुल्यां नियतं यथा शशिरवी नाशं व्रजन्ति स्वयम् ॥ ६॥त्वन्नामस्मरणात्पलायनपरान्द्रष्टुं च शक्ता न तेभूतप्रेतपिशाचराक्षसगणा यक्षश्च नागाधिपाः ।दैत्या दानवपुङ्गवाश्च खचरा व्याघ्रादिका जन्तवोडाकिन्यः कुपितान्तकश्च मनुजान् मातः क्षणं भूतले ॥ ७॥लक्ष्मीः सिद्धिगणश्च पादुकमुखाः सिद्धास्तथा वैरिणांस्तम्भश्चापि वराङ्गने गजघटास्तम्भस्तथा मोहनम् ।मातस्त्वत्पदसेवया खलु नृणां सिद्ध्यन्ति ते ते गुणाःक्लान्तः कान्तमनोभवोऽत्र भवति क्षुद्रोऽपि वाचस्पतिः ॥ ८॥ताराष्टकमिदं पुण्यं भक्तिमान् यः पठेन्नरः ।प्रातर्मध्याह्नकाले च सायाह्ने नियतः शुचिः ॥ ९॥लभते कवितां विद्यां सर्वशास्त्रार्थविद्भवेत्लक्ष्मीमनश्वरां प्राप्य भुक्त्वा भोगान्यथेप्सितान् ।कीर्तिं कान्तिं च नैरुज्यं प्राप्यान्ते मोक्षमाप्नुयात् ॥ १०॥॥ इति श्रीनीलतन्त्रे तारास्तोत्रं अथवा ताराष्टकं सम्पूर्णम् ॥[5/8, 12:04 PM] +91 94049 12121: श्रीताराशतनामस्तोत्रम् १ :----श्रीशिव उवाच ॥ॐ तारिणी तरला तन्वी तारा तरुणवल्लरी ।तीव्ररूपा तरी श्यामा तनुक्षीणपयोधरा ॥ १॥तुरीया तरला(तरुणा) तीव्रगमना नीलवाहिनी ।उग्रतारा जया चण्डी श्रीमदेकजटाशिराः ॥ २॥तरुणी शाम्भवीछिन्नभाला च भद्रतारिणी ।उग्रा चोग्रप्रभा नीला कृष्णा नीलसरस्वती ॥ ३॥द्वितीया शोभना नित्या नवीना नित्यनूतना ।चण्डिका विजयाराध्या देवी गगनवाहिनी ॥ ४॥अट्टहास्या करालास्या चरास्या दितिपूजिता ।सगुणा सगुणाराध्या हरीन्द्रदेवपूजिता ॥ ५॥रक्तप्रिया च रक्ताक्षी रुधिरास्यविभूषिता ।बलिप्रिया बलिरता दुर्गा बलवती बला ॥ ६॥बलप्रिया बलरता बलरामप्रपूजिता ।अर्धकेशेश्वरी केशा केशवासविभूषिता ॥ ७॥पद्ममाला च पद्माक्षी कामाख्या गिरिनन्दिनी ।दक्षिणा चैव दक्षा च दक्षजा दक्षिणे रता ॥ ८॥वज्रपुष्पप्रिया रक्तप्रिया कुसुमभूषिता ।माहेश्वरी महादेवप्रिया पञ्चविभूषिता ॥ ९॥इडा च पिङ्गला चैव सुषुम्ना प्राणरूपिणी ।गान्धारी पञ्चमी पञ्चाननादि परिपूजिता ॥ १०॥तथ्यविद्या तथ्यरूपा तथ्यमार्गानुसारिणी ।तत्त्वप्रिया तत्त्वरूपा तत्त्वज्ञानात्मिकाऽनघा ॥ ११॥ताण्डवाचारसन्तुष्टा ताण्डवप्रियकारिणी ।तालदानरता क्रूरतापिनी तरणिप्रभा ॥ १२॥त्रपायुक्ता त्रपामुक्ता तर्पिता तृप्तिकारिणी ।तारुण्यभावसन्तुष्टा शक्तिर्भक्तानुरागिणी ॥ १३॥शिवासक्ता शिवरतिः शिवभक्तिपरायणा ।ताम्रद्युतिस्ताम्ररागा ताम्रपात्रप्रभोजिनी ॥ १४॥बलभद्रप्रेमरता बलिभुग्बलिकल्पिनी ।रामरूपा रामशक्ती रामरूपानुकारिणी ॥ १५॥इत्येतत्कथितं देवि रहस्यं परमाद्भुतम् ।श्रुत्वा मोक्षमवाप्नोति तारादेव्याः प्रसादतः ॥ १६॥य इदं पठति स्तोत्रं तारास्तुतिरहस्यकम् ।सर्वसिद्धियुतो भूत्वा विहरेत् क्षितिमण्डले ॥ १७॥तस्यैव मन्त्रसिद्धिः स्यान्ममसिद्धिरनुत्तमा ।भवत्येव महामाये सत्यं सत्यं न संशयः ॥ १८॥मन्दे मङ्गलवारे च यः पठेन्निशि संयतः ।तस्यैव मन्त्रसिद्धिस्स्याद्गाणपत्यं लभेत सः ॥ १९॥श्रद्धयाऽश्रद्धया वापि पठेत्तारारहस्यकम् ।सोऽचिरेणैव कालेन जीवन्मुक्तः शिवो भवेत् ॥ २०॥सहस्रावर्तनाद्देवि पुरश्चर्याफलं लभेत् ।एवं सततयुक्ता ये ध्यायन्तस्त्वामुपासते ।ते कृतार्था महेशानि मृत्युसंसारवर्त्मनः ॥ २१॥इति स्वर्णमालातन्त्रे ताराशतनामस्तोत्रं समाप्तम् ॥एवं चइति मुण्डमालातन्त्रे हरपार्वती-संवादे त्रयोदशपटलान्तर्गतंताराशतनामस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Sunday, 12 March 2023

मंगल कामना व शांतीपाठशरणं त्वां गतो नाथ संसारार्णवतारक| दिश:पश्य अध:पश्य व्याधिभ्योरक्ष नित्यश:| प्रसीद स्वस्य राष्ट्रस्य राज्ञ:सर्वबलस्यच | गर्भिणीनां च वृद्धांना व्रीहिणां च गवां तथा || ब्राम्हणानां च सततं शातिं करु शुभं करु || अन्नं कुरु सुवृष्टिं च सुभिक्षमभयं तथा | राष्ट्रं प्रवर्द्धंतु विभो शांति र्भवतु नित्यश: ||देवानां ब्राम्हणानां च भक्तानां कन्यकासु च | पशूंना सर्वभूतानां शांतिर्भवतु नित्यश: || संसार सागरातून उद्धार करणाऱ्या प्रभो आम्ही आपणास शरण आलो आहोत आपण प्रसन्न व्हावे आपली दिव्य रक्षा दृष्टी चतुदीक् बनली आहे आधी व्याधी पासून आपण आमचे रक्षण सदैव करता आमचे राष्ट्र शासन त्रिविध प्रकारचे सैन्यबळ यावर आपली विजयिनी वरददृष्टी सतत असावी गाई गर्भिणी स्त्रिया वृद्ध जन अशक्त दिन हीन विद्वान ब्राह्मण यावर आपली शुभ दृष्टी अनुग्रह दृष्टी सतत असावी आपण यांच्यावर प्रसन्न असावे आमच्या देशातील धनधान्य समृद्ध करावे आपण सर्वत्र सुवृष्टी करावी पर्याप्त अन्न व सुभिक्ष यांना प्रदान करावे आमची अन्न भंडारे भरावीत सर्वतः अभयदान असावे विभो आपण आमच्या राष्ट्राचे संवर्धन करावे सर्वत्र विश्वात शुभ शांती पसरावी देव ब्राह्मण भक्त संत महात्मे कन्या पशुपक्षी आणि समस्त जीव सदैव शांती प्राप्त करून घेवोत. सर्वत्र सर्वजण सुखाने समाधानाने नांदावेत.महादेव गोविंद गाडगीळ तळवणे सावंतवाडी

Friday, 10 March 2023

*ब्राह्मणदक्षिणा व शास्त्र**मुहूर्ते समतीते तु,**भवेत् शतगुणा च सा |**त्रिरात्रे तद् दशगुणा,**सप्ताहे द्विगुणा मता ||**मासे लक्षगुणा प्रोक्ता,**ब्राह्मणानां च वर्धते |**संवत्सर व्यतीते तु,**त्रिकोटिगुणा भवेत् ||**कर्मं तद् यजमानानां,**सर्वञ्च निष्फलं भवेत् |**सब्रह्मस्व अपहारी च,**न कर्मार्हो शुचिर् नर: ||*अर्थात, ब्राह्मणांची दक्षिणा हवनाची पूर्णाहुति झाल्यावर एका मुहूर्ताच्या (२४ मिनिटाच्या) आत दिली पाहिजे, अन्यथा मुहूर्त निघून गेल्यावर शतपटीने वाढते. आणि तीन रात्री निघून गेल्यावर एक हजार पट, सप्ताहानंतर दोन हजार पट, महिन्यानंतर एक लाख पट, आणि संवत्सर निघून गेल्यावर तीन करोड पट दक्षिणा यजमानाने दिली पाहिजे. जर याप्रकारे न दिली तर त्याचे कर्म निष्फल होते, व त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते. त्याच्या हाताने केले जाणारे हव्य-कव्य देवता व पितर कधीच प्राप्त करत नाही. म्हणून ब्राह्मणांची दक्षिणा लवकरात लवकर दिली पाहिजे. हे शास्त्रप्रमाण आहे.म्हणून चाणक्य म्हणतात, *"नास्ति यज्ञसमो रिपु:"* अर्थात यज्ञादि कर्म विधिने सम्पन्न झाल्यावर लाभ, अन्यथा सर्वात जास्त हानीपर असते. गीतेतही भगवंतांनी स्वयं सांगितले आहे,*विधिहीनं असृष्टान्नं,**मन्त्रहीनं अदक्षिणं |**श्रद्धाविरहितं यज्ञं,**तामसं परिचक्षते ||*अयोग्य विधिने बनवलेले भोजन जसे परिणामात नुकसान करते, तसेच ब्राह्मणाने सांगितलेले मन्त्र दक्षिणा न दिल्यावर नुकसान करते.शास्त्र सांगते कि लोखंडाचे फुटाणे किंवा तुकडे देखील व्यक्ति पचवू शकतो परन्तु ब्राह्मणांच्या धनाला पचवू शकत नाही. कोणत्याही उपायाने ब्राह्मणांचे धन घेणारा नेहेमी दु:खच प्राप्त करतो. यावर महाभारतात एक कथानक आले आहे.महाभारत युद्ध चालू होते, युद्धमैदानात वाघासारखे हिंसक जीव योद्ध्यांचे गरमगरम रक्त पीत होते. एवढ्यातच धृष्टद्युम्नाने तलवारीने पुत्रशोकाने दु:खी निःशस्त्र द्रोणाचार्यांची मान कापली. द्रोणाचार्याचे गरमगरम रक्त पिण्यासाठी एक वाघीण पळतपळत येते, तेंव्हा वाघ वाघिणीला म्हणतो, प्रिये, *"विप्र-रक्तोsअयं गलद् दगलद् दहति"*अर्थात, ते ब्राह्मणाचे रक्त आहे, ते पिउ नको, ते शरीराला दहन करुन (गाळून गाळून) नष्ट करेल तेंव्हा त्या वाघिणीने देखील ब्राह्मण द्रोणाचार्याचे रक्तपान केले नाही.ऋषिमुनिंचे कररुपात रक्त घेतल्यानेच रावणकुळाचा संहार झाला, म्हणूनच जीवनात कधीही ब्राह्मणांचे द्रव्य अपहरण कोणत्याही रुपात करु नये.*वित्तशाट्ठ्यं न कुर्वीत,**सति द्रव्ये फलप्रदम |*अनुष्ठान, पाठ-पूजन केल्यावर ब्राह्मणांना उचित दक्षिणा दिली पाहिजे, आणि दक्षिणे-अतिरिक्त त्यांच्या येण्याजाण्याचे भाडेही वेगळे दिले पाहिजे. त्यानंतर विनम्रतेने ब्राह्मणांना वचनाद्वारे देखील सन्तुष्ट करत आशीर्वाद घेतला पाहिजे. असे केल्यावर ब्राह्मण मुखाने नाही तर हृदयाने आशीर्वाद देतो, आणि तेंव्हा यजमानाचे कल्याण होते.*यत्र भुंड्क्ते द्विजः तस्मात्,**तत्र भुंड्क्ते हरि: स्वयम् ||*ज्याच्या घरात अशा प्रकारे श्रद्धेने ब्राह्मणभोजन होते, तिथे ब्राह्मणरुपात स्वयं भगवानच भोजन करतात.