Sunday, 28 May 2023

*ज्योतिष शास्त्रानुसार तिथीला महत्त्व आहे = कोणत्या तिथीला कोणते कर्म करावे अथवा न करावे या बाबतीत माहिती*प्रतिपदा तिथी == कृष्ण पक्षातील प्रतिप्रदेत चंद्राला बलवान मानल गेलंय आणि शुल्क पक्षातील प्रतिपदेत चंद्राला निर्बल मानल गेले आहे. म्हणून प्रतिपदा तिथीत घराचे बांधकाम, गृहप्रवेश, वास्तू पूजा, लग्न, शांन्ति, यात्रा, प्राणप्रतिष्ठा इत्यादी चांगली कार्य केले जातात... शुक्ल पक्षातील प्रतिपदेत लग्न, यात्रा, व्रत, प्राणप्रतिष्ठा, सिमंन्त पूजन, चूडाकर्म, वास्तुकर्म, गृहप्रवेश इत्यादी कार्य करू नयेत....द्वितीया तिथी == विवाह मुहूर्त, यात्रा, दागिने खरेदी, शिलान्यास, देश वा राजकिय संबंधित कामे, वास्तुकर्म, उपनयन इत्यादी कार्य करणे शुभ मानल गेलयं परंतु या तीथीला तेल लावणे वर्जित आहे....तृतिया तिथी == शिल्पकला वा त्या संबंधित कार्य, सिमंतपूजन, चूडाकर्म, लग्न, गृहप्रवेश, उपनयन, राज्या संबंधित कार्य इत्यादी शूभ कार्य करतात....चतुर्थ तिथी == सर्व प्रकारच्या वीजेची कामं, शत्रूला हटलायचं काम, अग्नी संबंधित, शस्त्राचा वापर इत्यादी साठी ही तिथी चांगली आहे. परंतु क्रुर प्रवृत्ती च्या कामासाठी योग्य नाहीपंचमी तिथी = या तीथीला सर्व कार्यासाठी सर्व तीथींसाठी उपयुक्त मानली गेलीय. परंतु या तिथीत कूणालाहि कर्ज देऊ नये....षष्ठी तिथी = या तीथीला युध्दा साठी वापरले जाणारे शस्त्र, शिल्प कार्याला सुरवात, वास्तुकर्म, गृहप्रवेश, नवीन कपडे वापरणे अशा शुभ कार्या साठी योग्य मानली आहे. परंतु तेल अभ्यंग, पित्रांचे कार्य, आवाहन, दानकर्म, काष्ठकर्म, इत्यादी वर्जित मानल गेलय.... सप्तमी = ही तीथी लग्न मुहूर्त, संगीत कार्यासंबंधी दागिने बनविण्यासाठी नविन दागिने घालण्यासाठी, वधू प्रवेश, यात्रा, वधु प्रवेश, गृह प्रवेश, राजकिय कार्य, वास्तूकार्य, चूडाकर्म, उपनयन, संस्कार इत्यादी साठी शुभ मानली गेलीय....अष्टमी = या तिथीत लेखन, यूध्दासाठी चे कार्य, वास्तू कार्य, शिल्पा संबंधित, रत्ना संबंधित, आदानप्रदान संबंधित काम, अस्त्र - शस्त्र वापरण्यासंबंधित सूरवात करता येते.....नवमी स्थिती = या तिथीत शिकारीला जाणे, भांडण उकरून काढणे, सट्टा खेळणे, शस्त्रे निर्माण करणे, दारू निर्मिती अशी वाईट काम करतात...... दशमी तिथी = यात सरकार संबंधित राजकीय कार्याची सुरवात, हत्ती, घोडे, संबंधित कार्य लग्न, संगित, दागिने, कपडे, यात्रा, इत्यादी करता येतात गृह प्रवेश, वधु प्रवेश, चुडा कर्म, उपनयन, जेवण खाणे इत्यादी कामे करता येतात..... एकादशी = या तीथीत व्रत, सर्व धार्मिक कार्य, देवाचा उत्सव, उद्यापन, वास्तुकार्य, यूध्दाच्या संबंधित कार्य, शिल्प यज्ञैपवित, गृह प्रवेश यात्रा इत्यादी कार्य करतात..... द्वादशी= या तिथीत लग्न वा अन्य शुभ कार्य केले जातात परंतु तेलमर्दन, नवीन घराची निर्मिती, वा गृहप्रवेश, यात्रा या गोष्टी नाही केल्या पाहिजेत.... शुक्लपक्षी त्रयोदशी तिथी = यूध्दासाठी चे कार्य अस्त्र शस्त्र, राजकिय कार्य, वास्तू कार्य, संगीत विद्येशी संबंधित काम या तीथीत करता येतात परंतु यात्रा, गृह प्रवेश, नवीन दागिने, वस्त्र, यज्ञोपवित, वगैरे शुभ कार्य टाळले पाहिजे.....चतुर्थी = या तिथीत सर्व प्रकारच्या उग्र व क्रूर कार्यांना प्राधान्य दिले जाते. शस्त्र निर्माण इत्यादी प्रयोग केले जातात. यात्रा करणे वर्जित आहे.....पौर्णिमा = पौर्णिमेत शिल्प, दागिने, संबंधित कामे, यूध्द, विवाह, यज्ञ, बोटीतून प्रवास, शांती देणारे, योग्य मंगल कार्य करतात.....अमावस्या = पितृदोष, मुख्य रूपात केल जातं. महादान, ऊग्रकर्म केले जातात. या तिथीत चांगले शुभ काम व स्रि संग इत्यादी वर्जित म्हटलं आहे..... अमरनाथ परब वैदिक ज्योतिष, अंक ज्योतिष, वास्तु मार्गदर्शक व *सर्वसामान्य ज्योतिष* अयनांश म्हणजे खगोलातील ज्या स्थिर बिंदूपासून सूर्य, चंद्र वा ग्रह यांचे भोग दिलेले असतात, त्या स्थिर बिंदूचे वसंतसंपातापासून क्रांतिवृत्तावरील अंतर होय, आपण दोन अयन मानतो उत्तरायण आणि दक्षिणायन उत्तरायण = आपल्या पंचांग प्रमाणे मकर संक्रांतीला (१४/१५ जानेवारी) चालू होते. सूर्यमध्य पद्धती (पाश्चात्य) प्रमाणे २२ डिसेंबर ला चालू होते. (लहान दिवस मोठी रात्र) दक्षिणायन = आपल्या पंचांगाप्रमाणे कर्क संक्रांतीला १६/१७ जुलै ला चालू होते सूर्यमध्य पद्धती (पाश्चात्य) प्रमाणे २२ जूनला चालू होते. (मोठा दिवस लहान रात्र)आपण सहा ऋतू मानतो १. चैत्र वैशाख = वसंत ऋतू २. ज्येष्ठ आषाढ = ग्रीष्म ऋतू. ३. श्रावण भाद्रपद = वर्षाऋतू ४ अश्विन कार्तिक = शरद ऋतू ५.. मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू ६. माघ फाल्गुन शिशिर ऋतू महिने = १२ वर ऋतूत हिंदू महिने पण आलेत. दोन पक्ष शुक्ल ( शुद्ध) आणि कृष्ण (वद्य)तिथी = ३०शुक्ल ( शुद्ध) १. प्रतिपदा २. द्वितीया ३. तृतीया ४. चतुर्थी ५. पंचमी ६. षष्ठी ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ११.. एकादशी १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चतुर्दशी १५ पौर्णिमा. कृष्ण (वद्य)१. प्रतिपदा २. द्वितीया ३. तृतीया ४. चतुर्थी ५. पंचमी ६. षष्ठी ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ११.. एकादशी १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चतुर्दशी ३९ अमावस्या. नंदा, भद्रा, जया, रिक्ता व पूर्णा ह्या क्रमाने प्रतिपदेपासून तिथींची नवे आहेत. षष्टीपासून तीच पुनःपुन्हा येतात. योग आणि करण नावे आपण मागच्या भागात पाहिली आहेत. जुन्या ग्रंथांतून प्रत्येक गोष्टीची फळे दिली आहेत. ती पाहू. १. ऋतूफळ १. वसंतऋतुमध्ये जन्मणारा जातक उद्योगी, बुद्धिमान तेजस्वी, भरपूर काम करणारा आणि अनेक देशांशी व्यापार करणारा असतो २. ग्रीष्म ऋतू मध्ये जन्मणारा जातक भरपूर कामांचा आरंभ करणारा, क्रोध नसणारा, भुकेला, कामुक उंच, शूर, असतो ३. वर्षाऋतुमध्ये जन्मणारा जातक गुणवान, भोगी, राजकडून पूजला जाणारा, जितेंद्रिय, सत्य बोलणारा असतो. ४. शरदऋतुमध्ये जन्मणारा जातक व्यापारी, शेतकरी, धनधान्याने समृद्ध, तेजस्वी, लोकांमध्ये प्रसिद्ध असतो. ५. हेमंत ऋतुमध्ये जन्मणारा जातक बलवान, नीतिमान, गावात राहणार, सतत उद्योग करणारा, छोटे पाय लहान गळा असणारा असतो. ६. शिशिरऋतुमध्ये जन्मणारा जातक रूपवान, उत्कट मोठाली कामे करणारा, भुकेला (क्षुधायुक्त) आणि कामुक असतो. पक्ष फळ शुक्ल पक्षात जन्मणारा जातक पूर्णचंद्राच्या कांतीसारखा दिसणारा, श्रीमान, व्यावसायिक, अनेक शास्त्रे जाणणारा कुशल आणि ज्ञानी असतो. कृष्णपक्षात कठोर, दुर्मुख, मूर्ख, स्त्रीयांशी वैर करणारा, लोकांनी तिरस्कारलेला आणि दुसऱ्यांची सेवा करणारा असतो. वारफळ रविवारी जन्मणारा जातक मिष्टान्न खाणारा मानी, क्रोधी, मैथुनप्रिय, पित्त प्रकृती, आणि धनाची लालसा असणारा असतो. सोमवारी जन्मणारा जातक भोगी, कामी, शास्त्रवेत्ता, गुणी, मानी, जितेंद्रिय, उच्च शिक्षित, आणि शिलवन्त असतो. मंगळवारी जन्मणारा जातक मूर्खांमध्ये प्रिय, क्रोधी, धनी, श्रुतिस्मृतींची निंदा करणारा, नास्तिक, वेद न मानणारा असतो. बुधवारी जन्मणारा जातक वेदशास्त्राप्रमाणे वर्तन करणारा, दयाळू, भित्रा परंतु योगयुक्त असतो. गुरुवारी जन्मणारा जातक वेदाध्ययन करणारा अग्निहोत्री, मुलाबाळांनी युक्त, धनवान, भरपूर लोकसंग्रह असलेला पूर्ण विद्वान असतो. शुक्रवारी जन्मणारा जातक धनवान भोगी, शूर, भरपूर नोकर असणारा दयाळू, दैवज्ञ, आणि वेद जाणणारा असतो. शनिवारी जन्मणारा जातक वाईट लोकांमध्य वावरणारा, कुटिलमती, कृतघ्न, भावंडाना त्रास देणारा, सत्कर्मात अडथळे आणणारा, आणि रोगी होतो. टीप: ज्या वारी जन्म असेल तो ग्रह उपचय स्थानात (३,६,१०,११) स्थानात असेल तर फळ मिळते नाहीतर तसे फळ मिळत नाही.विश्वास गणपुले लेखनसीमा क्रमश:

No comments:

Post a Comment