Monday, 8 July 2019

ब्राह्मणाचे आठ प्रकार १) मात्र २) ब्राह्मण ३) क्षोत्रिय ४) अनूचान ५) भ्रूण ६) ऋषिकल्प ७) ऋषि ८) मुनी मात्र : जो ब्राह्मण कुळात जन्मला असून उपनयन संस्कार व वैदिक कर्मांना पारखा आहे. ब्राह्मण : व्यक्तिगत स्वार्थाला टाकून जो आचाराने विचारांचे पालन करतो, जो सरळ, एकान्तिय, सत्यवादी, दयाळू आहे. क्षोत्रिय : जो वेदाच्या कोणत्याही एका शाखेचा सहा वेदांगासहित अभ्यास करतो, तो धर्मज्ञ विप्र, सदाचारी असा ब्राह्मण. अनूचान : जो वेद आणि वेदांगांचा पूर्ण तत्त्वज्ञ असून पापरहित, शुद्धचित्त, आणि श्रेष्ठ असतो, असा क्षोत्रिय ब्राह्मणाला शिकविणारा विद्वान. भ्रूण : अनूचानाचे समग्र गुण धारण करणारा, केवळ यज्ञ व स्वाध्यायात रमणारा, यज्ञनिष्ठ अन्नाचे भोजन करणारा, इन्द्रियांना आपल्या ताब्यात ठेवणारा. ऋषिकल्प : संपूर्ण वैदिक व लौकिक विषयांचे ज्ञान प्राप्त करून, मन व इंद्रियांवर विजय मिळवितो आणि आश्रमातच नित्य वास करतो. मुनी : जो ब्रह्मचारी असून नियमित व अत्यल्प भोजन करतो. सदेरहित आहे, शाप आणि वर या दोन्हीचे सामर्थ्य ज्या ठायी आहे, जो सत्यप्रतिज्ञ असून आत्मसाक्षात्कारी ज्ञाता आहे, ज्याने कामक्रोध जिंकले आहेत, जो ध्याननिष्ठ, निष्क्रिय म्हणजे अनासक्त, जितेन्द्रिय आणि माती - सोन्याला समान मानणारा असा जो श्रेष्ठ. या आठांची गुणवत्ता चढत्या श्रेणीने आहे. अशा प्रकारे वंश, विद्या आणि वृत्त (सदाचार) यांनी परिपूर्ण तो "त्रिशुक्ल" होय. !"अष्टौ ब्राह्मणान सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति "आता ऋषि शब्दांची व्युत्पत्ती पाहुयांत ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो. “ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्य शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा दोघांनाही ऋषी मानले आहे. ऋषीची व्याख्या -"ऊर्ध्वरेताः तपस्युग्रो नियताशी न संशयः । शापानुग्रहयोश्शक्तः सत्यसन्धो भवेदृषिः ।।" अर्थात , ऊर्ध्वरेता(योगसाधनेने वीर्य ज्याचे पतन होत नाही असा), उग्र तपस्वी, नियत आहार घेणारा, शाप व अनुग्रह करण्यास समर्थ, सत्याचरणास बद्ध अशा व्यक्तीस ऋषी असे म्हणतात. को वाष्टविधं ब्राह्मण्यं वेत्ति ब्राह्मणसत्तमः ब्राह्मणाचे आठ प्रकार १) मात्र २) ब्राह्मण ३) क्षोत्रिय ४) अनूचान ५) भ्रूण ६) ऋषिकल्प ७) ऋषि ८) मुनी मात्र : जो ब्राह्मण कुळात जन्मला असून उपनयन संस्कार व वैदिक कर्मांना पारखा आहे. ब्राह्मण : व्यक्तिगत स्वार्थाला टाकून जो आचाराने विचारांचे पालन करतो, जो सरळ, एकान्तिय, सत्यवादी, दयाळू आहे. क्षोत्रिय : जो वेदाच्या कोणत्याही एका शाखेचा सहा वेदांगासहित अभ्यास करतो, तो धर्मज्ञ विप्र, सदाचारी असा ब्राह्मण. अनूचान : जो वेद आणि वेदांगांचा पूर्ण तत्त्वज्ञ असून पापरहित, शुद्धचित्त, आणि श्रेष्ठ असतो, असा क्षोत्रिय ब्राह्मणाला शिकविणारा विद्वान. भ्रूण : अनूचानाचे समग्र गुण धारण करणारा, केवळ यज्ञ व स्वाध्यायात रमणारा, यज्ञनिष्ठ अन्नाचे भोजन करणारा, इन्द्रियांना आपल्या ताब्यात ठेवणारा. ऋषिकल्प : संपूर्ण वैदिक व लौकिक विषयांचे ज्ञान प्राप्त करून, मन व इंद्रियांवर विजय मिळवितो आणि आश्रमातच नित्य वास करतो. मुनी : जो ब्रह्मचारी असून नियमित व अत्यल्प भोजन करतो. सदेरहित आहे, शाप आणि वर या दोन्हीचे सामर्थ्य ज्या ठायी आहे, जो सत्यप्रतिज्ञ असून आत्मसाक्षात्कारी ज्ञाता आहे, ज्याने कामक्रोध जिंकले आहेत, जो ध्याननिष्ठ, निष्क्रिय म्हणजे अनासक्त, जितेन्द्रिय आणि माती - सोन्याला समान मानणारा असा जो श्रेष्ठ. या आठांची गुणवत्ता चढत्या श्रेणीने आहे. अशा प्रकारे वंश, विद्या आणि वृत्त (सदाचार) यांनी परिपूर्ण तो "त्रिशुक्ल" होय. !"अष्टौब्राह्मणान सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति " ! यात ऋषींची व्याख्या नाहि सबब आपण सवडीने मुळवचनांसह भाषांतर.टाकावे हि नम्र विनंती द्वारा गौरवजी देशपांडे ... ऋषीची व्याख्या -"ऊर्ध्वरेताः तपस्युग्रो नियताशी न संशयः । शापानुग्रहयोश्शक्तः सत्यसन्धो भवेदृषिः ।।" अर्थात , ऊर्ध्वरेता(योगसाधनेने वीर्य ज्याचे पतन होत नाही असा), उग्र तपस्वी, नियत घेणारा, शाप व अनुग्रह करण्यास समर्थ, सत्याचरणास बद्ध अशा व्यक्तीस ऋषी असे म्हणतात. कालच्या ८ ब्राह्मण संज्ञा 🌹 *अथर्वण* 🌹 प्राचीन पुरोहितास अथर्वन् असें म्हणत. पुढें हें नांव सरसकट सर्व ब्राह्मणास पडलें . ब्राह्मण जातीचा उदय होऊन त्यांच्याकडे पौरोहित्य येण्यापूर्वीं अथर्वण वर्गांकडे भारतीयांचें पौरोहित्य असावें असा एक समज आहे. अथर्वणांचा वेद अथर्ववेद असून त्याच्या शाखा कसकशा पडत गेल्या हें पुढील उतार्यांत दिलें आहे:- व्यासमहर्षींनी यजुर्वेद महातरुची अथर्वसंज्ञक चौथी शाखा आपल्या अत्यंत तेजस्वी `सुमंतु’नामक शिष्याला सांगितली आणि सुमंतूनें त्या शाखाविभागाचें आपल्या `कबंध’ नामक शिष्याकडून अध्ययन करविलें. कबंधानें त्या संहितेचे दोन शाखाभेद केले आणि देवदर्श व पथ्य या दोन शिष्यांना पढविले. मौद्ग, ब्रह्मबली, शौलकायनि, पिप्पलाद व आणखी दुसरे कित्येक, देवदर्शाचे शिष्य झाले. पथ्याचेहि जाजलि, कुमुदादि व शौनक असे तीन शिष्य संहिताकार झाले. शौनकानें आपली संहिता दोन ठिकाणीं करून एक बभ्रूला व एक सैंधवायनाला दिली. सैंधवायन व मुंजकेश यांच्या शिष्यांनींहि आपआपल्या संहितेचे दोन दोन विभाग केले. श्रेष्ठ अशा आथर्वणांच्या संहितांचे नक्षत्रकल्प, वेदकल्प, संहिताकल्प, आंगिरसकल्प आणि शांतिकल्प असे पांच भेद आहेत. वायु पुराणांत असलेली हकीगत प्राय: अशीच आहे. फक्त सैंधवायनानें आपल्या मुंजकेशनामक शिष्याला आपली संहिता दोन ठिकाणीं विभागून दिली, इतकाच फरक आहे. परंतु त्यानें विष्णुपुराणास विरोध न येतां उलट एकवाक्यता होते. सैंधवायन व मुंजकेश या गुरुशिष्यांच्या पुढे होणार्या शिष्यांनीं आपआपल्या संहितांचे दोन दोन विभाग केले असा विष्णु पुराणांतील श्लोकाचा अर्थ घेतला म्हणजे कांहीं भानगड राहात नाहीं. वायु पुराणांत आलेल्या नांवाचा विष्णु पुराणांतील नांवांशीं किंचित् फरक आहे पण तो फक्त नांवाचा आहे. मौद्गलाला मौद म्हटलें आहे, शौलकायनीला शौष्कायनि म्हटलें आहे व देवसर्शाच्या जागीं वेदस्पर्श आला आहे, एवढेंच काय तें. पंचकल्पांपैकीं दुसरा कल्प जो `वेद’ त्याच्या ऐवजीं `वैतान’ असें नांव आलें आहे. अथर्ववेदतरूच्या एकंदर ९ शाखा विस्तारल्या व त्याला पाच कल्परुपी फळें लटकलीं. चरणव्यूहामध्यें थर्वसंहिता भेदाच्या नांवाची यादी आहे ती अशी:- पिप्पल, दान्त, दामोदांत, औतपन, जावाली, शौनक, ब्रह्मपलाश व देवदर्शी आणि चारणविद्य खेरीज कल्पापैकीं वैतानास `विधानकल्प’ व आंगिरसकल्पास `अभिचारकल्प’ असा नांवांत फरक आहे. सध्यां हिंदुस्थानांत या वर्गाचें अस्तित्व बहुतेक नष्ट झालें असून कोठेंकोठें यांचे अवशेष दिसून येतात. *अथर्व वेदी ब्राह्मणांसंबंधी माहिती* या प्राचीन वर्गांची सध्यांची महाराष्ट्रांतली स्थिति लक्षांत येण्यासाठीं सातारा जिल्ह्यांतील चिंधवली गांवी राहाणार्या रा. अंताजी काशीनाथ कुळकर्णी ( काळे ) या अथर्वण शाखीय गृहस्थांनीं पुढील माहिती दिली आहे. रा. कुळकर्णी यांचें घराणें चिंधवलीस दोन तीनशें वर्षांपासून आहे, त्यांचें गोत्र भालंदन, व प्रवर काश्यप, आवत्सार, नैध्रुव असे आहेत. यांचे कुलगुरु नागेश भट बि. बाळंभट जोशी नांवाचे कौशिक गोत्री माहुलीकर ब्राह्मण होते. भालंदन गोत्राखेरीज भारद्वाज, उपमन्यू, कौशिक व शावास्य ( श्यावाश्व ? ) ही त्यांच्या शाखेचीं गोत्रें होत. चिंधवलीस अथर्वणांचीं तीन घरें आहेत, कांही मलवडीस आहेत. यांचे धर्मविधी गेलीं १५।२० वर्षे यांच्या शाखेप्रमाणें होत नाहींत. या शाखेचे विधी करणारे ब्राह्मण पूर्वी सांगली व ग्वाल्हेर संस्थानांत आढळत होते. काशी, प्रयाग, गया, इत्यादि ठिकाणींहि यांची तुरळक वस्ती आहे. महाराष्ट्रांत या शाखेचें शरीरसंबंध देशस्थ, क्वचित कर्हाडे ब्राह्मण, ॠग्वेद,-अथर्वण,- आपस्तंब शाखीय, यांच्याशीं होतात. आपला वेद सर्वांत वडील असल्याचें हे ब्राह्मण मानतात. या वेदाचें आधिदैवत्य भार्गवरामाकडे दिलें जातें. पूर्वी श्री. छत्रपति सरकार यांनीं या ब्राह्मणांची परीक्षा करण्याचें योजिलें असतां नैवेद्याच्या पदार्थांचीं फुलें झालीं व छत्रपतींनीं या ब्राह्मणांना मोठीं वेतनें दिलीं अशी आख्यायिका सांगतात. श्राद्धपक्षांत पितरांचा नामोच्चार करितांना प्रथम पणजे, मग आजे व नंतर शेवटीं वडील म्हणजे आदित्य, रुद्र, वसुरुप: अशी परंपरा म्हणतात. *संकलन :- अशोककाका कुलकर्णी* फोटो सोर्स विकिपीडिया।

को वाष्टविधं ब्राह्मण्यं वेत्ति ब्राह्मणसत्तमः

No comments:

Post a Comment