🙏हर हर महादेव 🙏
#नारायण_नागबली
नारायण नागबली चा प्रमुख उद्देश म्हणजे अतृप्त पितरांना तृप्त करण्यासाठी किंवा त्यांना मोक्षपद देण्यासाठी हे विधान केले जाते. कारण दुर्मरणाने मृत झालेल्यांच्या, बऱ्याचशा इच्छा वासना पूर्ण होऊ शकत नाही.काही तीव्र इच्छा मृत्यू नंतरही आत्म्याचा पिछा सोडत नाही अशा स्थितीमध्ये वायुरूप होऊन आत्मा पृथ्वीवर भ्रमण करतो . वास्तवत: जीवात्मा सूर्याचा अंश असतो जो निसर्गत: मृत्यूनंतर सूर्याकडे आकर्षित होते. परंतु वासना व इच्छा आत्म्याला वातावरणात राहण्यासाठी जबरदस्ती करतात. अशा स्थितीमध्ये आत्म्याला फार पीडा होते आणि मुक्ती मिळवण्यासाठी वंशातील लोकांना प्रापंचिक किंवा सांसारिक समस्या निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी सामान्य मनुष्य पहिल्यांदा वैद्यकीय सहाय्य घेतो. तरीही त्या उपचारांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून मनुष्य ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो . कारण कुंडलीमध्ये काही ग्रहांची स्थिती अशा प्रकारची असते ज्यात पितृदोष असल्याचा अनुमान काढला जातो.
नारायण नागबली विधी
#पहिला_दिवस
हा तीन दिवसांचा विधी असून प्रथम तीर्थराज कुशावर्त तीर्थावर देह शुद्धी प्रायश्चित्त स्नान करून नारायणबली पूजा (नक्षत्राप्रमाणे) केली जाते. यामध्ये आपल्या जन्मापासून दोन परिवारांचा संबंध येतो एक वडीलांकडील सात पिढ्या व दुसरी मामाकडील सात पिढ्या अशा चौदा पिढ्यांमध्ये जर काही अपमृत्यू झाले असतील.
श्राध्द तर्पणादिकांचा लोप झाला असेल तर जन्म कुंडलीत पितृदोष येतो किंवा कुंडलीमध्ये पितृदोष नसूनही आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर आपल्याला पितृशापाने त्रास होत आहे असे समजावे. आपल्या व्यवहारिक कार्यात येत असलेल्या प्रश्नांचे अडचणीचे निवारण आपण करण्यासाठी नारायण नागबली हा विधी करू शकतो.
हा विधी नारायण या नावाने व काश्यप या देवाच्या गोत्राने केला जातो. कारण आपल्या चौदा पिढ्यांचा उद्धार होऊन चौदा पिढ्यांमध्ये जे जे कोणी अपमृत्यू गेले आहे, ज्यांचा श्राद्धादि कर्माचा लोप झाला आहे. त्या सर्वांना मोक्ष सुख प्राप्त होते.
#दुसरा_दिवस
या विधीच्या दुसऱ्या दिवशी नागबली कर्म केले जाते ."अंतीसा गती" या शास्त्राच्या उक्तीप्रमाणे अंतकाळी माणसाची इच्छा आकांशा असते . तशीच त्याला गती प्राप्त होते.
#धनलोभात_मृतायेच_सर्प_योनिर्व्यवस्थि :
आपल्या चौदा पिढ्यांमध्ये जे जे कोणी धनलोभात गेले आहे त्या सर्वांना सर्प योनी प्राप्त होते. सर्पाला नैसर्गिक मृत्यू नसल्याने किंवा धनाच्या वासनेने आपल्या घरात किंवा आसपास आपल्या दृष्टीस पडला असता , आपल्या हातून त्याची हत्या झाली असता त्याचा अपमृत्यु होतो त्यांच्या निवारणासाठी नागबली ही पूजा केली जाते.
#पुत्रस्थानगते_राहौ_कुजेनापि_निरीक्षते ।।
#कुजक्षेत्रगते_वापि_सर्प_शापानसुतक्षय:||
जर कुंडलीमध्ये पंचम स्थानात राहू मंगळाने दृष्ट अथवा मंगळाच्या राशीत असेल तर सर्प शाप योग होतो व त्यामुळे संतातीची हानी होऊ शकते . त्याच्या निवारणा करता नागबली हा विधी केला जातो .
#तिसरा_दिवस
विधीच्या तिसऱ्या दिवशी गुरुजींच्या घरी गणपती पूजन, पुण्याहवाचन , सुवर्ण नाग प्रतिमेचे पूजन दानादी संकल्प अशी पूजा केली जाते. शुभाशीर्वाद घेऊन या विधीची सांगता केली जाते.
#नारायण_नागबली_हा_विधी_त्र्यंबकेश्वर_या_क्षेत्री_च_काकरावा?
१. त्र्यंबकेश्वर
येथे "लय तत्व स्मशान" आहे काशी, उज्जेन नंतर म्हणजे उत्पत्ती व स्थिती नंतर लय महास्मशान त्र्यंबकेश्वर ला आहे . याच ठिकाणी पाप पुण्याचा क्षय होतो तसेच पितरांना आवाहन केले असता ते सद्गती घेण्यासाठी उपस्थित होतात या क्षेत्राच हे वैशिष्ट्य आहे
२. गोदावरी नदी
दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी जिला आपण गोदावरी असे म्हणतो त्या नदीच उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे म्हणून तिला दक्षिण वाहिनी असे म्हणतात
३. कुशावर्त तीर्थ
भारत वर्षातील सर्व तीर्थांचे राजा ज्याला आपण कुशावर्त तीर्थ म्हणतो ते इथे आहे. याच तीर्थामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.
४. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
भारतामध्ये भगवान शंकरांचे 12 ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत त्यातले एक व यामध्ये सर्वात वेगळे असे ज्योतिर्लिंग मंदीर इथे आहे कारण इथली महादेवाची मूर्तीमध्ये महादेव एकटे नसून ब्रह्मा, विष्णू, शंकर हे तीनही देव एकत्र लिंग स्वरूपात आहे व सोबत गोदावरी माता पण शक्तिच्या रुपात आहे
म्हणून तर सर्वात वेगळे असे हे ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर आहे
५. संगम
गोदावरी व अहिल्या या दोन्ही नद्यां चा संगम इथे आहे याचं ठिकाणी पवित्र अशी सती ची मंदिर आहेत की ज्या ठिकाणी दोन दिवस ही पूजा केली जाते
अशी ही भौगोलिक परिस्थिती हा विशेष गुण आहे
म्हणून या क्षेत्राला जास्त महत्व आहे
या क्षेत्रात जो जातक येऊन पूजा करेल त्याला त्या कर्माचे फळ लवकरात लवकर प्राप्त होते.
#महत्वपूर्ण_सूचना.
सध्याच्या काळात काही बाहेरील ब्राह्मण हा विधी काही मूठभर लोकांच्या साहाय्याने त्रंबकेश्वर बाहेरील आश्रमात करून लोकांची फसवणुक करत आहे. इथल्या स्थानिक ब्राह्मण(ज्या लोकांकडे अधिकार आहे) त्यांच्या कडून हा विधी करू शकतात. स्थानिक ब्राह्मणां च्या घराबाहेर संघाचा(पुरोहित संघ) लोगो दिला आहे त्यावरून तेथील स्थानिक आहे की नाही हे ओळखू शकता.
गुरुजी
मयुरेश महेंद्र दीक्षित
कुशावर्त तीर्थाच्या पाठीमागे
त्र्यंबकेश्वर
98 50 65 33 39
97 63 65 33 39
everyone must read this blog,this all provided information are unique than others blog.Sharing very deep information about narayan nagbali pooja.
ReplyDeleteThanks,keep updating
https://bit.ly/35LcDGQ
Share very good knowledge about narayan nagbali pooja.
ReplyDeleteThanks,keep updating
https://kalsarpapooja.in/english/narayan-nagbali.html