Thursday, 20 August 2015

विषकन्या योग व वैधव्य योग

कुंभ विवाह याबद्दलची माहिती

विषकन्या योग
सूर्य भौमिर्किवारेषुमिथी भद्राशतभियम् । आश्लेषा कृत्तिका नामे मत्र ज्ञाता विषांगना ।।१।।
सूर्य, मंगळ, शनिवार हे वार असून भद्रातिथी (२,७,१२) असेल त्याप्रमाणे कृत्तिका, आश्लेषा, मुळ, शततारका नक्षत्र जर असल्यास अशा समयी पूर्ण योग असतांना एखादया मुलीचा जन्म झाल्यास विषकन्या योग होतो.

(खुलासा = वार, तिथी, नक्षत्र असे तीन मिळूनच विषकन्या योग होता.)
जर्नुलग्ने रिपुक्षेत्रे सांस्थित: पापखेचर: । द्विसास्मापि योगेsस्मिन सन्जाता विषकन्या ।।२।।

जन्म लग्नात शत्रुक्षेत्री पापग्रह असेल त्याचप्रमाणे त्यासंबंधी प्रथम श्लोकांप्रमाणे कोणतेही दोन योग होत असल्यास ती कन्या विषकन्या योगी होते. (खुलासा = वरील विधानाला अनुसरून त्याला जोडून वार, तिथी, नक्षत्र ह्या तीन पैकी दोन योग होणे आवश्यक आहे)

लग्ने शनिचरो यस्या सूतेर्को नवमे कुंज । विषायव्या सापि नौद्वाहया त्रिविध विषकन्या ।।३।।
ज्या मुलीच्या लग्नी शनी असून पंचम भावात सूर्य असेल त्याचप्रमाणे नवम स्थानाम मंगळ असेल तर ती कन्या विषकन्या होऊ शकते. त्यावरील प्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या होऊ शकते. त्यावरीलप्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या योग सांगितलेले आहेत. गुजरात व राजस्थानात वरील आशयासंबंधी एका दंतकथेच्या म्हणीचा अर्थ पुढे देत आहे.

विषकन्या योगात जन्मलेली कन्या जिवंत रहात नाही. जरी जन्म झाल्यास अल्पायुषी असते. नाहीतर पुर्ण कुंटुबाला नष्ट करते किंवा पीडा देते. विवाह संस्कारचे वेळी (हवनकुंडाला फेरे घेतांना ) वराला नष्ट करते. जरी विवाह झाल्यास प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णु, महेश येतात. अर्थात विषकन्येचा विवाह नेहमी कष्टमय होत असतो. जर अशा मुलीच्या कुंडलीत अशा प्रकारचे योग असल्यास त्याचा परिहार हा ''कुंभविवाह' ने खचितच दूर होतो.

वैधव्य योग 
१) ज्या मुलीच्या कुंडलीमध्ये सप्तम भावात मंगळ पापग्रहांसह युक्त असेल किंवा पापग्रह सप्तम भावात मंगळ त्यास पूर्ण दृष्टीने पहात असेल तर अशी कन्या तरूणावस्थेत पोहोचण्यापूर्वीच बालविधवा होते. 
२) चंद्रापासून सामवे किंवा आठवे स्थानी पापग्रह असल्यास किंवा मेष अथवा वृश्चिक या दोघे राशीना राहू आठवे किंवा बाराव्या स्थानी असल्यास अशी कन्या निश्चित विधवा होते. (खुलासा = हा योग फक्त वृषभ, कन्या, धनु, हा लग्नालाच लागु पडतो)
३) मकर लग्न असल्यास त्याच्या सप्तम भागात कर्कराशी गत सुर्य-मंगळाबरोबर असल्यास अथवा चंद्र पापग्रह पीडीत असल्यास वरील योग बनतो. अशी स्त्रीसुध्दा विवाहानंतर मध्यावस्थेत विधवा होते.
४) लग्न तसेच सप्तम या दोन्ही भावात पापग्रह असल्यास स्त्रीसुध्दा विवाहोत्तर काळात वैधव्य प्राप्त होते.
५) सप्तम स्थानात पापग्रह असुन तसेच चंद्र षष्ठ किंवा सप्तमात असल्यास विवाहानंतर वयाच्या मध्यात वैधव्य प्राप्त होते.
६) जर अष्टमाधिपती सप्तम भावात असून सप्तमेषाला जर पापग्रह पहात असेल तसेच सप्तमभाव पापग्रह पीडीत असेल तर नववधू लवकरच विधवा होते.
७) षष्ठ व अष्टम स्थानाचे अधिपती जर षष्ठ किंवा बाराव्या भावात पापग्रहाबरोबर असून सप्तम भावावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृद्वटी नसल्यास नववधुस सुध्दा लवकर वैधव्य प्राप्त होते. 
८) लग्नापासून सप्तम, अष्टम स्थानाचे स्वामी पापग्रह पीडीत असून जर ते सहा किंवा बाराव्या स्थानी जरी असल्यास निश्चितच वैधव्य योग होतो.

यदिलग्नगत: कुरस्तमाम् सप्तमग: कुंज । विषेयम् मरणम् पुंसाम ।।१।।
यदि लग्नतश्चस्तस्मात् सप्तम/ कुंज: । मृत्यु विज्ञानीयान ।।२।। (नारद)

वरील दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे की, जर मुलीचा जन्म लग्नामध्ये सप्तमेश पापी असेल किंवा पापदृष्ट असेल अथवा पापग्रहयुक्त असून अनिष्टकारी (६,८,१२) स्थानात असेल किंवा शत्रुगृही असेल तर पतिसुखास हानी करतो. त्याचप्रमाणे लग्नामध्ये आणि त्यापासून सप्तमस्थानी मंगळ असेल अथवा लग्नात चंद्र असून त्याच्या सप्तमात मंगळ असल्यास पतिसुखास हानी करतो.

लग्ने व्ययेच पाताले जामित्रेचाष्टमे कुंज: । कन्या भर्तुविनाशाय भर्ता विनाशकृंत ।।
अर्थात कुंडलीमध्ये लग्नात (प्रथम), चतुर्थात, सप्तमात, अष्टमात व व्ययात (बारावे) ह्यापैकी एका स्थानात मंगळ असल्यास पति सुखास हानी करतो (खुलासा = वरील ह्या श्लोकात मंगळाचा ऐकेरीच पध्दतीने विचार केलेला आहे. ह्या मंगळाचा विचार करतांना त्याच्या सर्व बाकी घटकांचा विचार प्रथम जरूर करावा.)

विषकन्या भंग योग
षुमेपे ता शुभेस्ते विषारखान ।

सप्तम स्थानात स्वत: सप्तमेशात विराजमान असुन जरी तो पापग्रह दृष्ट असला तरीही तो शुभ ग्रहाबरोबर असेल तर विषकन्या योग भंग पावतो. सप्तमस्थानात हे पतिचे स्थान असल्याने त्यावरुन पति सुखाचा विचार होतो ही गोष्ट सदैव लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, सप्तमात शुभग्रह असल्यास किंवा सप्तमावर शुभग्रह पहात असल्यास त्याच्या प्रभावाने पतिसुखात निश्चितच वाढ होईल.
ह्या विषयासंबंधी श्री. कल्याण वर्मा यांनी त्यांच्या सारावलीत असे म्हटले आहे.

वैधत्व निधने चिन्त्यं, शरीर जन्मलग्नत: । सप्तमे पति पंचमे प्रसवस्था ।।
(सारावली स्त्री जातक)

पुरुषांच्या अष्टम भावावरून ''विधुरता'' तसेच स्त्रीयांच्या अष्टम भावावरून ''वैधव्यता'' चा विचार केला जातो. सप्तमावरुन स्थिती, संपदा, वैभव तसेच पतिच्या सौभाग्याचा विचार होतो. पंचमावरून मुला-मुलीचा स्थितीचा विचार दिसतो. त्यासाठी येथे पण पति सौभाग्य सुख हेतु स्त्रीच्या भावाला अनन्यसाधारण प्राधान्य दिलेले आहे.
विषकन्या योग व वैधव्य योग ह्यावर परिहार विधान ह्या सर्व प्रकारच्या वैधव्य दोषाच्या निवृत्ती हेतू धर्मशास्त्र असे सांगते.

सावित्र्यादिव्रतं कृंत्य वैधव्यदिनिवृत्तये । अश्वत्थादिभिद्वाह्या दधानां चिजीवने ।।१।।
बाल वैधव्ययोगे तु कुंभादुपतिमादिभि: । कृंत्वा तत: पश्चात कंन्योहयेति चापरे ।।२।।

वटसावित्री व्रतकथा, अश्वस्थ (पिपळ) वृक्षाशी लग्न, तसेच कुंभ विवाह जर पहिले नंतर अन्य कोणाशी (पुरूष) विवाह केला तर कुंभ विवाहाने असलेला वैधव्य योग नाहीसा होतो.

त्याच्रप्रमाणे ''हेमाद्री व्रमखंड'' यामध्ये ''वैधव्य - योग नाशक सावित्रीव्रत'' असे सांगितलेले आहे की, सावित्र्यदिव्रतादिनी भक्तव्या कुर्वन्ति या: स्त्रिया । सौभागयंच सुहत्वंच भवेत् तासां सुसंगति: ।।

ज्या मुलीच्या कुंडलीत विधवायोग असल्यास तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडून एकांतात ''सावित्री व्रत'' किंवा ''पिपंळव्रत'' करवून नंतर दिर्घाय वरा वराबरोबर विवाह करावा.

नारी वा विधवा पुत्रीपुत्र विवर्जिता । सभर्तुका सुपुत्रा वा कुर्याद व्र तभिंद शुभम ।।
(स्कंद पुराण )

वरील व्रत हे सुध्दा सौभाग्यवती, विधवा, कुमारी, वृध्दा सुपुत्रविति किंवा पांझोटी ह्या सर्व स्त्रीयांन हे व्रत करण्यासारखे आहे.
दुसरे असेच व्रत (ज्ञानभास्कर) ह्या ग्रंथात सांगितलेले आहे. त्यास ''वैधव्य हर अश्वत्थव्रत'' असे नाव आहे. यामध्ये मुलींच्या आई - वडिलांनी आपल्या मुलीकडुन सुमुहूर्तावर ठरवून रंगीत वस्त्र परिधान करून ब्राम्हणाकडुन संकल्प आई-वडिलांद्वारे करावा. हे व्रत महिनाभराचे आहे. हे व्रत विशेषत: चैत्र वद्य तृतीया किंवा आश्विन वद्य तृतीया ते आगामी वद्य तृतिये पर्यंत हे व्रत चालू ठेवावे. यामध्ये बांबूच्या टोपलीमध्ये सुवर्णमयी (सोन्याची) शिवपार्वतीची मुर्ती यथोचित पूजन करून त्यांना ते दान करावे. ही पुजा रोज पिपंळाच्या झाडाखालीच झाली पाहिजे. जर पिपंळाचे झाड नसल्यास शमी अथवा बोराचे झाडाखाली केली तरी चालेले. अशा प्रकारे प्रतिदिनी महिन्यापर्यंत केल्यास पूर्ण पतिसौख्य प्राप्त होते.

वैधव्यहर कंर्कटीव्रत 
''व्रतराज या ग्रंथामध्ये हे एक आणखी व्रत सांगितलेले आहे. सुर्य जेव्हा राशीत प्रवेश केल्यानंतर मुलीने स्नान करून अथवा (तांदूळ) चे अष्टदल करून सोन्याची कर्कटी (काकडी)ची स्थापना करून मनोभावे षोडशोपचार पुजन करावे. विधिवत व्रत करून अकरा काकडी (ऋतुकाळातील काकडी) सहीत सुवर्ण कर्कटी (काकडी)चे दान ब्राम्हणभोजन करावे. या व्रताने वैधव्य योगाची शांती होते.

त्याचप्रमाणे ''मार्कण्डेय पुराण'' ह्या पुराणात ''कुंभविवाह'', ''विष्णूविवाह'' हे तील परिहार व्रत दिलेले आहे. ह्या तीनही विवाहांमध्ये ''गणपतिपुजन'', ''मातृकापूजन, ''वर्सोधारापूजन'', ''नांदीश्राध्द'', ''सुवर्णमयी विष्णुपूजन'', ''होमहवादि'' करवून पुढे कर्मे करावे.

अर्क विवाह :- 
ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''विषकन्या योग'' आणि वैधव्य योग असतो. त्याचप्रमाणे पुरूषांच्या कुंडलीत ही ''विषपुत्र योग'' व ''विधुर योग'' ही असतो. ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''वैधव्य योग'' पहातो. त्याचप्रमाणे तेच नियम पुरुषांच्या कुंडलीत ''विधुर योग'' पहावा. जर एखाद्या पुरूषाचा विवाह एका पेक्षा जास्त विवाह होऊनही जर पत्निसुख प्राप्त होत नसेल तर अशा पुरुषाला अर्क (रूई)च्या झाडासोबत विवाह करवून त्यानंतर दुसर्‍या कन्येशी विवाह करावा. कुंभविवाहाच्या प्रमाणे हा ''अर्क विवाह'' पण शास्त्रसंमत सप्तमभावाचे जन्मदोष व अरिष्ट निवारणाचा उत्तमोत्तम परिहार आहे.

मुहूर्त काल विचार
आदित्य दिवसे वापि हरपक्षे वा शनिश्वरे ।।
''अर्क विवाह'' हा रविवारी, शनिवारी किंवा हस्त नक्षत्रावर तसेच शुभ दिवशी हा विधी करावा.

॥ श्रीनरसिंहऋणमोचनस्तोत्र ॥

श्रीगणेशाय नमः ।
ॐ देवानां कार्यसिध्यर्थं सभास्तम्भसमुद्भवम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ १॥

लक्ष्म्यालिङ्गितवामाङ्गं भक्तानामभयप्रदम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ २॥

प्रह्लादवरदं श्रीशं दैतेश्वरविदारणम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ३॥

स्मरणात्सर्वपापघ्नं कद्रुजं विषनाशनम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ४॥

अन्त्रमालाधरं शङ्खचक्राब्‍जायुधधारिणम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ५॥

सिंहनादेन महता दिग्दन्तिभयदायकम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ६॥

कोटिसूर्यप्रतीकाशमभिचारिकनाशनम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ७॥

वेदान्तवेद्यं यज्ञेशं ब्रह्मरुद्रादिसंस्तुतम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॐ ॥ ८॥

इदं यो पठते नित्यं ऋणमोचकसञ्ज्ञकम् ।
अनृणीजायते सद्यो धनं शीघ्रमवाप्नुयात् ॥ ९॥

॥ इति श्रीनृसिंहपुराणे ऋणमोचनस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

उपनयन2

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन कालचा उपनयन विषय पुढे नेतो.
आश्वलायन गृह्यसुत्रानुसार (अध्याय -1  कंडिका -19) अष्टमे वर्षे ब्राह्मण मुपनयने .या खंडात उपनयाचे सार दिले आहे.जन्मापासुन आठव्या वर्षी किंवा गर्भावस्थेपासुन आठव्या वर्षी संस्कार करावा.प्रा.शिंत्रे यांनी भाषांतर केलेल्या पोथीत 15 कंडिकेतील पहिल्या सुत्रांतुन येथे "कुमारम् "अशि अनुवृत्ति येत असल्याने हा व यापुढिल व्रतरुप संस्कार मुलीचे होत नाहित. तसेच इतर स्मृतीतहि  वैवाहिको विधि:स्त्रिणामौपनायनिक: स्मृत: असे म्हटले आहे.मुलींच्या उपनयना संबधी हे मत आहे.विवाह हाच मुलींचा व्रतबंध आहे.विषयांतर करुन सांगतो.आठव्या वर्षी मुलाची मुंज व आठव्या वर्षी (अष्ट वर्षात. वगैरे श्लोकात उल्लेख आहेच) मुलीचा विवाह हे दोन्हि व्रतबंधच आहेत.मुलाचा मुंजीनंतर व मुलीचा विवाहा नंतर पुनर्जन्म होतो.म्हणुन दोन्हि कर्म आई पाहत नाहि हे कारण असावे.मुलगा पुनर्जन्माचे प्रतिक म्हणुन जानवे घालतो.मुलगी मंगळसुत्र घालते.दुसर्या जन्माची गर्भाशयाचे प्रतिक म्हणुन बटु खांद्यावर उपरणे घेतो.मुलगी शेला घेते.मुलाची शुत्धि व्हावी म्हणुन अंजली क्षारण आहे. मुलीसाठि कन्यादान आहे. (अंजली क्षारण च आहे एका प्रकारचे) मुलाचा पुनर्जन्म होतो म्हणुन उपनयनात नक्षत्र नामाने संबोधन करतात.आणी याच कारणास्तव मुलीचे नाव विवाहात बदलतात.
आता मुद्याकडे येउ क्षत्रियाचे उपनयन अकराव्या वर्षी व वैश्याचे बाराव्या वर्षी करावे. सोळा वर्षापर्यंतचा काल हा ब्राह्मण कुमारासाठि अतिक्रांत न झालेला समजावा.बावीस वर्षांपर्यंत क्षत्रिय व चौविस वर्षा पर्यंत वैश्यांना मुभा आहे. (अपवाद) या नंतर मात्र कुमार पतितसावित्रीक. समजावेत.यांना गायत्री अधिकार नाहित.किंवा यांचाशी संबध ठेवु नयेत.अशी वेऴ आली असता व्रात्यस्तोम संस्कार व योग्य प्रायश्चित्त घेउन उपनयन करावे.ब्राह्मणाची मेखला मोळ्याची (दर्भाचा प्रकार) , क्षत्रियाची मौर्वी ची  (धनुष्याच्या दोरी साठि वापरतात) , वैश्याची मेंढिच्या लोकरीपासुन केलेली घ्यावी.दंडासंबधी  ब्राह्मणाला  पळसाचा दंड, क्षत्रियाला औदुंबराचा दंड, वैश्याला बेलाचा दंड धारण करण्यासाठि द्यावा.ब्राह्मणाचादंड केस उगवतात एवढा, क्षत्रियाचा कपाऴापर्यंत पोचेल एवढा, वैश्यांचा नाकापर्यंत पोचेल एवढ्या मापाचा असावा.अल्पज्ञानाने मांडणी करतो आहे चुका असतील त्या निदर्शनास आणाव्यात.हि विनंती.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले.

उपनयन वर्ग

नमस्कार सर्व गुरुजनांना वंदन करुन आजपासुन उपनयन हा विषय मांडतो.आपण सर्व याज्ञिक कर्मातील तज्ज्ञ आहात प्रयोगासंबधी आपण अधिक जाणता मी अल्पमतीने प्रयत्न करेन.
मनु: - ब्रह्मवर्चस कामस्यकार्यं विप्रस्यपंचमे।विष्णु: -षष्ठेतुधनकामस्य विद्याकामस्य सप्तमे अष्टमेसर्वकामस्य नवमेकांतिमिच्छत: ।।संग्रहे: -सप्तमेचाष्टमेवर्षे नवमेदशमेतथा।एकादशेद्वादशेवाह्युपनयने वा द्विजातय़:।।ब्रह्मवर्चस्यमायुष्यंतेजोनाद्यंतथेंद्रियम्।पशून्कामयमानावैप्राप्नुवंतियथा क्रमम्।।
सनातन वैदिक हिंदु धर्मातील महत्वाचा संस्कार म्हणजे उपनयन  शब्दश: अर्थ घेतला तर "नवीन डोळ्यांची  प्राप्ती "असा होईल काहि जण तर डोऴे येणे अशा साथीशी संबध जोडतील. "ज्ञानचक्षुंची प्राप्ती" हा अधिक संयुक्तीक अर्थ होईल.उपनीत म्हणजे जवऴ नेणे गुरुंच्या जवऴ नेणे .तीसरे नाम व्रतबंध ब्रह्मचर्यपालन, गुरुसेवन, अध्ययन या व्रतांशी बंधन कारक राहणे म्हणजेच व्रतबंध. श्रुतीमताने मते गर्भधारणेपासुन  आठवे वर्षी उपनयन करावे.ब्रह्मवर्चस् प्राप्ती कामनेसाठि पाचव्या वर्षी करावे.धनप्राप्तीकरता सहाव्या वर्षी, विद्याप्राप्तीकरता सातव्या वर्षी, सर्वकामना पुर्तीकरता अाठव्या वर्षी करावे.अकरा बारा वर्षांपर्यंत मर्यादा मानली गेली आहे. ब्रह्मचर्य, आयुष्य, आरोग्य, तेज व इंद्रिय निग्रह हा  उपनयनाचा हेतु आहे.अन्यथा पशु प्रमाणेच आपले वर्तन होईल.
आपला धर्म  व आपले आचार विचार हे उपनयनासारख्या महत्वाचा संस्काराचा "ईव्हेंट " केल्याने मलीन होताहेत.मुंजीचे  "सेलिब्रेशन" हॉटेल मध्ये या सारखे दुर्दैव नाहि.घोड्या वरुन नाच गाणे करुन भिक्षा मागणे हा उपनयनाचा हेतु नाहि.मामा मुलगी देणार हा काम विषय ब्रह्मचारी बटुला शास्त्र म्हणुन सांगा हे जोपर्यंत आपण यजमानांना पटवुन देत नाहि तोपर्यंत धर्माचे रक्षक कसे तयार होतील.
यातील चांगले ते तुम्हि ठेवा चुकीच्या गोष्टि निदर्शनास आणा. क्षत्रिय, वैश्य यांच्याहि उपनयना संबधात, अपंग मुलांच्या उपनयना विषयी पुढे बोलुच.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
आताच एक गुरुजींची शंका होती की "मम कामचार कामवाद. "हा संकल्पातील काम म्हणजे काय? कामना असा अर्थ घ्यावा कामभावना हा तिथे अभिप्रेत नाहि. बाल्यअवस्थेत हट्टाने केलेले चुकीचे आचार, हट्ट किंवा अट्टहास, कामनेने केलेले काहि भक्षण (उदा. कांदा लसुण वगैरे ) हा अर्थ तिथे घ्यावा असे माझे मत आहे
हा संकल्प कुमाराकडून करवून न घेता पित्याकडूनच करवावा.

परशुरामस्तोत्रम्

परशुरामस्तोत्रम् ||
---------------------

कराभ्यां परशुं चापं दधानं रेणुकात्मजम्
जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम् ||१||

नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्
मोचिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनम् || २ ||

भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम्
गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम् || ३ ||

वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम्
तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम् || ४ ||

परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनु:
रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम् || ५ ||

शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं
रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ ||

मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं
य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||

|| इति श्री प.प. वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्री परशुरमस्तोत्रं संपूर्णम् ||