Friday, 20 June 2025

यजमानांचे नजरेतुन अंत्यक्रीया. फेसबुकवर आलेला लेख आहे प्रसिद्ध लेखिका सौ शेफाली वैद्य यांचे मातोश्रींचे नुकतेच निधन झाले त्याबाबतीत त्यांनी मांडलेले विचार आहेत हिंदू अंत्येष्टी – शोक व्यक्त करण्याची पवित्र प्रक्रियाआईच्या जाण्याबद्दलचा हा माझा शेवटचा सार्वजनिक लेख. हा लेख अंतिम संस्कारांकडे डोळसपणे पाहणारी एक श्रद्धावान आणि जिज्ञासू हिंदू व्यक्ती ह्या भूमिकेतून मी लिहिलाय. इथे मला आधीच हे स्पष्ट करायचंय की मी ना कोणी धर्मशास्त्रज्ञ आहे, ना संस्कृत पंडित, ना मी पूर्णपणे बरोबर असल्याचा दावा करतेय. पण मातृशोकातून जाताना आणि हिंदू अंत्येष्टीची सर्व कर्मकांडे श्रद्धापूर्वक पार पाडताना देखील विवेकी जिज्ञासेचा तिसरा डोळा उघडा ठेवून सामान्य माणसाला कधी कधी अगम्य, क्वचित भयावह वाटू शकणाऱ्या या विधींमागचा गहन अर्थ समजून घ्यायचा मी यथाशक्ती प्रयत्न केला. त्यासाठी मी मन्मथनाथ दत्त यांनी केलेला गरुडपुराणाचा संपूर्ण अनुवाद परत एकदा वाचला. Tibetan Book of the Dead आधीच वाचलं होतं. त्याशिवाय ग्रिफ मॅनेजमेंट ह्या विषयावर आधारित बरंच पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिलेलं मानसशास्त्रीय साहित्य वाचलं आणि अर्थातच, प्रत्यक्ष विधी सुरु असताना आमच्या पुरोहितांना हजार प्रश्न विचारले. त्यांनीही अतिशय शांतपणे आणि न कंटाळता माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या सर्वाचा परिपाक म्हणजे हा लेख. ह्यात जे काही लिहिलंय, ते माझ्या वैयक्तिक अनुभवावर आणि मी मिळवलेल्या धार्मिक माहितीवर आधारित आहे. हे इथे शेअर करण्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे मला जे उमगलं ते इतरांनांही कळावं. बरेचदा आपण ही सारी कर्मकांडे करतो पण त्या मागचा अर्थ कोणी सहजासहजी आपल्याला नीट उलगडून सांगत नाही. जवळच्या माणसांच्या मृत्यूनंतरचे विधी सर्वांनाच कधी ना कधी करावे लागतात, पण त्यामागचा सांकेतिक अर्थ जर कळला तर नक्कीच वियोगाच्या दुःखावर फुंकर मारल्यासारखं होतं हे मी स्वतः गेल्या १२ दिवसात अनुभवलेलं आहे. इतर कुणाच्या शोकप्रवासात जर हा लेख थोडी तरी सोबत करू शकला तर मी भरून पावेन. मी एक श्रद्धावान हिंदू आहे. माझ्या आयुष्यात मी अनेक वेळा वेगवेगळ्या स्वरूपात अग्नीची आराधना केली आहे, कधी देवापुढे दिवा लावून तर कधी घरी होम करवून. अनेक यज्ञही मी पाहिले आहेत, पण ज्या दिवशी माझ्या भावाने माझ्या आईच्या चितेला अग्नी दिला, त्या दिवशी मला खर्‍या अर्थाने कळलं की अग्नी ही संक्रमणाची देवता आहे. चितेला अग्नी देण्याचा क्षण हा केवळ लाकूड जाळण्याचा क्षण कधीच नसतो. तो एका रूपाचं अरूपात रूपांतर करण्याच्या प्रवासाचा आरंभक्षण असतो. चिताग्नी हा तो अग्नी आहे जो वेदात वर्णिला गेलाय, साक्षी, शुद्धिकर्ता, आणि आत्म्याला दुसऱ्या लोकात घेऊन जाणारं दिव्य वाहन.अंत्येष्टी हा हिंदू सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार. शेवटची आहुती. आपण जिवंत असताना जसे यज्ञ किंवा होम करताना अग्नीला आहुती देतो, तसाच हा कुठल्याही व्यक्तीचा शेवटचा यज्ञ, आणि याची आहुती म्हणजे त्याचं स्वतःचं नश्वर शरीर. यज्ञांमध्ये सामान्यतः अग्नी हा केवळ वाहक असतो. पण अंत्येष्टिमध्ये तो आहुतीचा भक्षकही असतो आणि ती हवी देवांपर्यंत पोचवणारा वाहकही असतो. ज्या पंचमहाभूतांपासून देह बनलेला असतो त्याच पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांमध्ये देह परत विलीन होतो. मी लहान असताना माझ्या आजोबांना पत्रात हा मजकूर लिहिताना अनेक वेळा वाचलं होतं की अमुक अमुक यांचा देह पंचमहाभूतांत विलीन झाला. तेव्हा या वाक्याचा पूर्ण अर्थ कधीच कळला नव्हता. पण गेल्या बारा दिवसात तो नीटच कळला. आईला मुखाग्नी द्यायच्या आधी माझा भाऊ जो कर्ता होता, त्याने चितेला तीन उलट्या प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला मातीचा माठ होता, ज्याला भटजी एका छोट्या दगडाने प्रत्येक प्रदक्षिणेत एकेक भोक पाडत होते ज्यातून आतलं पाणी गळत होतं, आधी छोटी धार आणि नंतर मोठी. प्राण जसा हळूहळू शरीर सोडतो, तसंच हे पाणी माठातून निःशब्दपणे निघून जात होतं. तीन प्रदक्षिणा झाल्यावर त्याने तो माठ मागे न पाहता डाव्या खांद्यावरून जमिनीवर जोरात फेकून फोडला. घटभेदन — अंत्येष्टीतील सर्वात विदारक क्षण. जो आपल्याला शिकवतो की त्या माठासारखं मृत शरीर कितीही सुंदर दिसत असलं, तरी आत प्राण नसताना ते नुसतंच एक रिकामं कवच असतं आणि ते नष्ट करावंच लागतं. किंबहुना आपण ते नाही केलं तर निसर्ग ते शरीर नष्ट करणारच असतो. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा स्मशानात गेलो, आईच्या अस्थी संकलनासाठी. खाली वाकून तिच्या अस्थी अलगद उचलून एका तांब्याच्या कलशात ठेवताना मला खूप भरून येत होतं. ज्या प्रेमाने आम्ही भावंडं तिच्या गालावरून हात फिरवायचे, त्याच मायेने आणि हळुवारपणे आम्ही त्या अस्थी आणि थोडीशी रक्षा कलशात भरली. उरलेली सर्व राख आम्ही कुंकळ्ळीच्या पवित्र आणि वीरप्रसवा साळ नदीत विसर्जित केली. काही काळ प्रवाहावर तरंगून ती राख हळूहळू पाण्यात विरत गेली. त्यानंतर आम्ही तिच्या अस्थी कारवारच्या काली नदीत विसर्जित केल्या. कारवार आईचं जन्मगाव. काली नदी आईला खूप आवडायची. जिथे काली नदीचं गोडं पाणी सागराशी एकरूप होतं तिथेच तिच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या. जीवाचं ब्रह्मात विलीन होणं, अस्तित्वाचं अव्यक्तात विलीन होणं ह्याचंच जणू प्रतीक असलेली ती जागा होती. ते पहिले तीन दिवस आणि त्यानंतरचे सात दिवस अशौचाचे होते, शोकाचे आणि सामाजिक निवृत्तीचे. ना नवे कपडे, ना देवपूजा, ना चमचमीत जेवण, फक्त विरहाच्या शांततेत डुंबलेलं घर आणि एकत्र बसून आईच्या आठवणी काढणारे आम्ही कुटुंबीय. कोणी शोक प्रदर्शनासाठी येई तेव्हाही त्याच आठवणी निघत, आमचं दुःख हळूहळू हलकं होत होतं. प्रत्येक दिवशी आईच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही तिलोदक अर्पण करत होतो. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसापर्यंत मृत व्यक्तीचा आत्मा पितृलोकात जात नसतो. तो अजूनही पृथ्वी लोकातच भटकत असतो धूसर अवस्थेत, गोंधळलेल्या मनस्थितीत. तिलोदक आत्म्याला दिशा देतं, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी.दहाव्या दिवशी, पुरोहितांना घेऊन आम्ही पुन्हा स्मशानात गेलो. धर्मशास्त्राप्रमाणे आता आईची पुढच्या प्रवासाची तयारी झाली होती. आता ती केवळ ‘आई’ राहिलेली नव्हती — ती आता आमची पूर्वज बनणार होती. आमच्या पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण करत तांदूळ आणि तिळाचे दहा पिंड तयार केले. ते सूक्ष्म शरीराचे प्रतीक होते. त्या पिंडांसोबत दर्भाच्या लहानश्या छत्र्या आणि ज्योती अर्पण केल्या गेल्या, दिवसा सावलीसाठी, रात्री प्रकाशासाठी. पुरोहितांनी जेव्हा त्या दर्भाच्या छोट्या मशाली तुपात भिजवून प्रज्वलित केल्या तेव्हा त्यांचा उजेड आमच्याही दुःखाचा अंधार हळूहळू नष्ट करत होता. हिंदू धर्मात कोणीही एकटा जात नाही. प्रत्येक आत्मा मृत्यूनंतर कुलपरंपरेत पूर्वज म्हणून सामील केला जातो. हिंदू धर्म संस्कृतीचा अविरत प्रवाह मानतो.अकराव्या दिवशी पुरोहितांनी येऊन घरी होम घातला आणि आमचं घर आणि आम्ही मृत्यूनंतरच्या अशौचातून परत शुद्ध झालो. पंचगव्य शिंपडून घर पवित्र केलं गेलं. आम्हीही सर्वजण एकेक थेंब प्यायलो. आता आम्हीही इतके दिवस थांबवून ठेवलेल्या आयुष्याच्या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी तयार होतो. बाराव्या दिवशी सपिंडीकरण होते. अंत्येष्टी संस्कारातला सर्वांत शेवटचा आणि निर्णायक विधी. आईचा पिंड आणि आमची आजी, पणजी, आणि शेणजी यांचे पिंड भावाने विधीपूर्वक एकत्र केले. धर्मानुसार आता आमची आई पितृ झाली होती. आता ती फक्त आमची आई नव्हती, आता ती आमच्या संपूर्ण कुळाची मार्गदर्शिका होती. आता ती आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांची पूर्वज बनली होती. हा निरोप नव्हता. ही होती नवीन नात्याची जाणीव. आमच्या कुलपरंपरेच्या अविरत वाहणाऱ्या प्रवाहात माझी आई एक नवी लाट बनून विलीन झाली होती. त्यानंतर आला शेवटचा विधी, शुभस्वीकार. अशौचाचा, दुःखाचा काळ आता संपला होता. आता आम्ही पुन्हा आयुष्याला आनंदाने सामोरे जायला मोकळे होतो. इतके दिवस दहन संस्कार करताना वापरलेला कोरा सुती पंचा नेसून सर्व विधी करणाऱ्या माझ्या भावाने आता ते कपडे सोडून रंगीत रेशमी कद परिधान केला, कपाळावर शुभसूचक कुंकुमटिळक लावला आणि हवन केलं. आईच्या द्वादशश्राद्धाला आमचे आप्तेष्ट जमले होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. बारा दिवसांच्या संयम आणि शोकानंतरचं पहिलं एकत्रित जेवण. जेवताना आईच्या आठवणी निघाल्या, तिच्या विनोदांची उजळणी झाली, तिच्या मायेच्या स्पर्शाची सर्वानी आवर्जून आठवण काढली. आमच्या मनावरचं दुःखाचं, शोकाचं सावट हळूहळू दूर होत होतं. ह्या बारा दिवसांच्या प्रवासात मला जाणवलं की हिंदू धर्म जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. बारा दिवस मनसोक्त शोक करू देतो. आपली कर्मकांडे म्हणजे दुःखाचा नीट, शास्त्रोक्त निचरा करायचा एक फॉर्मुला आहे. आपले विधी केवळ धार्मिक नाहीयेत तर मानसशास्त्रीयदृष्ट्या फार अचूक आणि सूक्ष्म विचार करून आपल्या पूर्वसुरींनी रचलेले आहेत.साधे मंत्र उच्चारतानाही अतिशय विचार करून शब्द योजले गेले आहेत. देवांना आहुती दिली जाते तेव्हा ‘स्वाहा’ म्हटलं जातं.पितरांना काही अर्पण केलं की ‘स्वधा’ हा शब्द उच्चारतात तर प्रेतात्म्याला बोलावताना पुरोहित म्हणतात — ‘उपतिष्ठत’. शब्द बदलतात. अर्थ बदलतो. ध्वनी स्पंदन बदलतं. यज्ञोपवीताची दिशा सुद्धा बदलते. देवकार्य करताना ते डाव्या खांद्यावर असतं — सव्य. पितृकार्य करताना उजव्या खांद्यावर — अपसव्य. ते करत असताना कर्ता वर्तमान क्षणात पूर्ण उपस्थित असतो, त्याच्या शोकाचे रूपांतर कर्मात होते. त्याचे दुःख तिळातिळाने कमी होत जाते. हिंदू अंत्यसंस्कार फक्त मृत व्यक्तीसाठी कधीच नसतात. ते मागे राहिलेल्या शोकमग्न कुटुंबासाठीही तितकेच महत्वाचे असतात. ते शोकाला एक आकार देतात. त्याला व्यक्त होऊ देतात. त्याला आदराने हात जोडतात आणि मग, हळूहळू, शोकाचं रूपांतर संस्कारात करतात.आपले ऋषी मृत्यूला घाबरत नव्हते. त्यांनी मृत्यू समजून घेतला होता. मृत्यूनंतरच्या शोकातून जीवनाकडे कसा प्रवास करायचा ह्याचा नकाशा त्यांनी ह्या कर्मकांडांद्वारे तयार केला होता. पाण्याचा माठ का फोडायचा? पिंड का तयार करायचा? यज्ञोपवीताची दिशा का बदलते? ह्या सगळ्याला उत्तर आहे. शोकाचेही एक व्याकरण आहे जे आपल्या पूर्वसुरींना ठाऊक होते. — शेफाली वैद्य

Wednesday, 18 December 2024

विवाहात वधुवर परस्परांना ठरलेल्या मुहूर्तावर वरमाला अर्पण करतात , आणि आपण 'लग्न लागलं' असं म्हणतो ।पण वास्तविक हि परंपरा नाहीये ।वरमाला किंवा जयमाला हा संस्कार गांधर्व विवाह आणि स्वयंवर विवाह यातील एक भाग आहे ।आपण जो करतो त्याला ब्राह्म विवाह म्हणतात ।प्रेम विवाहाला गांधर्व किंवा स्वयंवर नाही म्हणता येणार ।कारण गांधर्व पद्धतीमध्ये अन्य विधी नसतात , केवळ वरमाला असते । आणि स्वयंवर हे राजन्य वर्गातील क्षत्रिय कन्यांपुरता मर्यादित प्रकार होता जिथे वर सुद्धा समान वर्णाचा असायचा ।हा विवाह प्रायः राज्यविस्तार आणि सौमनस्यासाठी व्हायचा ।जे वर निवड करण्यासाठी वधुसमोर असत ते वधुपित्याने आधीच निवडलेले असत ।आता त्यातील एक वधूला निवडायचा असे ।त्यात जर वधूला आवडेल त्या पुरुषाच्या गळ्यात तिने माळ घातली तर ती वरमाला आणि वधु जिंकण्यासाठी जो पण असतो तो पूर्ण केल्यावर जेता पुरुष वधूच्या गळ्यात घालायचा ती जयमाला ।ब्राह्म विवाह विधीत परस्पर माला समर्पणाचा विधी नसून 'गुडजीरक' हा विधी आहे ।वधु आणि वर हातात तांदूळ, जिरं, गूळ ओंजळीत घेऊन उभे राहतात , आणि मुहूर्तावर अंतःपट बाजूला झाला कि ओंजळीतील सर्व वस्तू परस्परांच्या डोक्यावर आरोपण करतात (ओततात/सोडतात,, whatever) ।आजच्या काळात शास्त्राची माहिती असलेली शिवाय त्यावर निष्ठादेखील असलेली जी कुटुंबं आहेत त्यांच्या घरी विवाहात या पद्धतीने लग्न लागते ।त्यानंतर जनरीत म्हणून माला आदानप्रदान पण होते ।पण वैयक्तिक मला असं वाटतं कि हे वरमालेचं प्रकरण बंद व्हायला हवं । तसं झालं तर बराच अनाचार थांबेल ।म्हणजे वरमाला असुदे ,,, छान वाटते ,,, पण वरमाला म्हणजे 'लग्न लागलं' हे समीकरण बदललं पाहिजे ।दक्षिणेत काही शास्त्रनिष्ठ कुटुंबांमध्ये अशी पद्धत आहे कि जिरं आणि गूळ एकत्र कुटून त्याची चटणी केली जाते आणि ती विड्याच्या पानावर ठेऊन वधुवरांच्या हातात देतात । आणि मुहूर्तावर अंतःपट बाजूला झाला कि दोघे एकमेकांच्या डोक्यावर ते पान थापतात ,, एकमेकांच्या टाळूवर ते नीट पुसून विड्याची पाने टाकून देतात ।आणि मग जनरीत म्हणून वरमाला असते ।गुडजीरकाचा भौतिक लाभ काय यावर आयुर्वेदिक क्षेत्रातील जाणकार अधिक सांगू शकतील ।ग्रंथोल्लेखात हे पदार्थ आयुर्वृद्धीकारक आहेत ।महाराष्ट्रात गुडजीरक कोरडं असतं ,, आणि दक्षिणेत त्याची चटणी असते ।अशाच प्रकारे विधी करायला आपण अभ्यस्त झालो तर आपल्यालाही त्याच्या मागचा कार्यकारण भाव लक्षात येऊ लागेल ।लेखासह ग्रंथवचनाचे पान पण जोडलेले आहे ।विवाह संबंधात जे अधिकृत ग्रंथ आहेत त्यात संपूर्ण विवाह विधीत वरमाला हा उल्लेख नाही ।पुष्पमाला हा उल्लेख आहे ।पण त्याचा मुहूर्ताशी संबंध नाही ।पुष्पमाला धारण कन्यादान झाल्यानंतर आहे ।गार्ग्यगोत्रोत्पन्नः दाबकेउपाख्य सुहाससूनुः सागरशर्मा

Thursday, 17 October 2024

विषकन्या योग व वैधव्य योग कुंभ विवाह याबद्दलची माहितीविषकन्या योगसूर्य भौमिर्किवारेषुमिथी भद्राशतभियम् । आश्लेषा कृत्तिका नामे मत्र ज्ञाता विषांगना ।।१।।सूर्य, मंगळ, शनिवार हे वार असून भद्रातिथी (२,७,१२) असेल त्याप्रमाणे कृत्तिका, आश्लेषा, मुळ, शततारका नक्षत्र जर असल्यास अशा समयी पूर्ण योग असतांना एखादया मुलीचा जन्म झाल्यास विषकन्या योग होतो.(खुलासा = वार, तिथी, नक्षत्र असे तीन मिळूनच विषकन्या योग होता.)जर्नुलग्ने रिपुक्षेत्रे सांस्थित: पापखेचर: । द्विसास्मापि योगेsस्मिन सन्जाता विषकन्या ।।२।।जन्म लग्नात शत्रुक्षेत्री पापग्रह असेल त्याचप्रमाणे त्यासंबंधी प्रथम श्लोकांप्रमाणे कोणतेही दोन योग होत असल्यास ती कन्या विषकन्या योगी होते. (खुलासा = वरील विधानाला अनुसरून त्याला जोडून वार, तिथी, नक्षत्र ह्या तीन पैकी दोन योग होणे आवश्यक आहे)लग्ने शनिचरो यस्या सूतेर्को नवमे कुंज । विषायव्या सापि नौद्वाहया त्रिविध विषकन्या ।।३।।ज्या मुलीच्या लग्नी शनी असून पंचम भावात सूर्य असेल त्याचप्रमाणे नवम स्थानाम मंगळ असेल तर ती कन्या विषकन्या होऊ शकते. त्यावरील प्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या होऊ शकते. त्यावरीलप्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या योग सांगितलेले आहेत. गुजरात व राजस्थानात वरील आशयासंबंधी एका दंतकथेच्या म्हणीचा अर्थ पुढे देत आहे.विषकन्या योगात जन्मलेली कन्या जिवंत रहात नाही. जरी जन्म झाल्यास अल्पायुषी असते. नाहीतर पुर्ण कुंटुबाला नष्ट करते किंवा पीडा देते. विवाह संस्कारचे वेळी (हवनकुंडाला फेरे घेतांना ) वराला नष्ट करते. जरी विवाह झाल्यास प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णु, महेश येतात. अर्थात विषकन्येचा विवाह नेहमी कष्टमय होत असतो. जर अशा मुलीच्या कुंडलीत अशा प्रकारचे योग असल्यास त्याचा परिहार हा ''कुंभविवाह' ने खचितच दूर होतो.वैधव्य योग १) ज्या मुलीच्या कुंडलीमध्ये सप्तम भावात मंगळ पापग्रहांसह युक्त असेल किंवा पापग्रह सप्तम भावात मंगळ त्यास पूर्ण दृष्टीने पहात असेल तर अशी कन्या तरूणावस्थेत पोहोचण्यापूर्वीच बालविधवा होते. २) चंद्रापासून सामवे किंवा आठवे स्थानी पापग्रह असल्यास किंवा मेष अथवा वृश्चिक या दोघे राशीना राहू आठवे किंवा बाराव्या स्थानी असल्यास अशी कन्या निश्चित विधवा होते. (खुलासा = हा योग फक्त वृषभ, कन्या, धनु, हा लग्नालाच लागु पडतो)३) मकर लग्न असल्यास त्याच्या सप्तम भागात कर्कराशी गत सुर्य-मंगळाबरोबर असल्यास अथवा चंद्र पापग्रह पीडीत असल्यास वरील योग बनतो. अशी स्त्रीसुध्दा विवाहानंतर मध्यावस्थेत विधवा होते.४) लग्न तसेच सप्तम या दोन्ही भावात पापग्रह असल्यास स्त्रीसुध्दा विवाहोत्तर काळात वैधव्य प्राप्त होते.५) सप्तम स्थानात पापग्रह असुन तसेच चंद्र षष्ठ किंवा सप्तमात असल्यास विवाहानंतर वयाच्या मध्यात वैधव्य प्राप्त होते.६) जर अष्टमाधिपती सप्तम भावात असून सप्तमेषाला जर पापग्रह पहात असेल तसेच सप्तमभाव पापग्रह पीडीत असेल तर नववधू लवकरच विधवा होते.७) षष्ठ व अष्टम स्थानाचे अधिपती जर षष्ठ किंवा बाराव्या भावात पापग्रहाबरोबर असून सप्तम भावावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृद्वटी नसल्यास नववधुस सुध्दा लवकर वैधव्य प्राप्त होते. ८) लग्नापासून सप्तम, अष्टम स्थानाचे स्वामी पापग्रह पीडीत असून जर ते सहा किंवा बाराव्या स्थानी जरी असल्यास निश्चितच वैधव्य योग होतो.यदिलग्नगत: कुरस्तमाम् सप्तमग: कुंज । विषेयम् मरणम् पुंसाम ।।१।।यदि लग्नतश्चस्तस्मात् सप्तम/ कुंज: । मृत्यु विज्ञानीयान ।।२।। (नारद)वरील दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे की, जर मुलीचा जन्म लग्नामध्ये सप्तमेश पापी असेल किंवा पापदृष्ट असेल अथवा पापग्रहयुक्त असून अनिष्टकारी (६,८,१२) स्थानात असेल किंवा शत्रुगृही असेल तर पतिसुखास हानी करतो. त्याचप्रमाणे लग्नामध्ये आणि त्यापासून सप्तमस्थानी मंगळ असेल अथवा लग्नात चंद्र असून त्याच्या सप्तमात मंगळ असल्यास पतिसुखास हानी करतो.लग्ने व्ययेच पाताले जामित्रेचाष्टमे कुंज: । कन्या भर्तुविनाशाय भर्ता विनाशकृंत ।।अर्थात कुंडलीमध्ये लग्नात (प्रथम), चतुर्थात, सप्तमात, अष्टमात व व्ययात (बारावे) ह्यापैकी एका स्थानात मंगळ असल्यास पति सुखास हानी करतो (खुलासा = वरील ह्या श्लोकात मंगळाचा ऐकेरीच पध्दतीने विचार केलेला आहे. ह्या मंगळाचा विचार करतांना त्याच्या सर्व बाकी घटकांचा विचार प्रथम जरूर करावा.)विषकन्या भंग योगषुमेपे ता शुभेस्ते विषारखान ।सप्तम स्थानात स्वत: सप्तमेशात विराजमान असुन जरी तो पापग्रह दृष्ट असला तरीही तो शुभ ग्रहाबरोबर असेल तर विषकन्या योग भंग पावतो. सप्तमस्थानात हे पतिचे स्थान असल्याने त्यावरुन पति सुखाचा विचार होतो ही गोष्ट सदैव लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, सप्तमात शुभग्रह असल्यास किंवा सप्तमावर शुभग्रह पहात असल्यास त्याच्या प्रभावाने पतिसुखात निश्चितच वाढ होईल.ह्या विषयासंबंधी श्री. कल्याण वर्मा यांनी त्यांच्या सारावलीत असे म्हटले आहे.वैधत्व निधने चिन्त्यं, शरीर जन्मलग्नत: । सप्तमे पति पंचमे प्रसवस्था ।।(सारावली स्त्री जातक)पुरुषांच्या अष्टम भावावरून ''विधुरता'' तसेच स्त्रीयांच्या अष्टम भावावरून ''वैधव्यता'' चा विचार केला जातो. सप्तमावरुन स्थिती, संपदा, वैभव तसेच पतिच्या सौभाग्याचा विचार होतो. पंचमावरून मुला-मुलीचा स्थितीचा विचार दिसतो. त्यासाठी येथे पण पति सौभाग्य सुख हेतु स्त्रीच्या भावाला अनन्यसाधारण प्राधान्य दिलेले आहे.विषकन्या योग व वैधव्य योग ह्यावर परिहार विधान ह्या सर्व प्रकारच्या वैधव्य दोषाच्या निवृत्ती हेतू धर्मशास्त्र असे सांगते.सावित्र्यादिव्रतं कृंत्य वैधव्यदिनिवृत्तये । अश्वत्थादिभिद्वाह्या दधानां चिजीवने ।।१।।बाल वैधव्ययोगे तु कुंभादुपतिमादिभि: । कृंत्वा तत: पश्चात कंन्योहयेति चापरे ।।२।।वटसावित्री व्रतकथा, अश्वस्थ (पिपळ) वृक्षाशी लग्न, तसेच कुंभ विवाह जर पहिले नंतर अन्य कोणाशी (पुरूष) विवाह केला तर कुंभ विवाहाने असलेला वैधव्य योग नाहीसा होतो.त्याच्रप्रमाणे ''हेमाद्री व्रमखंड'' यामध्ये ''वैधव्य - योग नाशक सावित्रीव्रत'' असे सांगितलेले आहे की, सावित्र्यदिव्रतादिनी भक्तव्या कुर्वन्ति या: स्त्रिया । सौभागयंच सुहत्वंच भवेत् तासां सुसंगति: ।।ज्या मुलीच्या कुंडलीत विधवायोग असल्यास तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडून एकांतात ''सावित्री व्रत'' किंवा ''पिपंळव्रत'' करवून नंतर दिर्घाय वरा वराबरोबर विवाह करावा.नारी वा विधवा पुत्रीपुत्र विवर्जिता । सभर्तुका सुपुत्रा वा कुर्याद व्र तभिंद शुभम ।।(स्कंद पुराण )वरील व्रत हे सुध्दा सौभाग्यवती, विधवा, कुमारी, वृध्दा सुपुत्रविति किंवा पांझोटी ह्या सर्व स्त्रीयांन हे व्रत करण्यासारखे आहे.दुसरे असेच व्रत (ज्ञानभास्कर) ह्या ग्रंथात सांगितलेले आहे. त्यास ''वैधव्य हर अश्वत्थव्रत'' असे नाव आहे. यामध्ये मुलींच्या आई - वडिलांनी आपल्या मुलीकडुन सुमुहूर्तावर ठरवून रंगीत वस्त्र परिधान करून ब्राम्हणाकडुन संकल्प आई-वडिलांद्वारे करावा. हे व्रत महिनाभराचे आहे. हे व्रत विशेषत: चैत्र वद्य तृतीया किंवा आश्विन वद्य तृतीया ते आगामी वद्य तृतिये पर्यंत हे व्रत चालू ठेवावे. यामध्ये बांबूच्या टोपलीमध्ये सुवर्णमयी (सोन्याची) शिवपार्वतीची मुर्ती यथोचित पूजन करून त्यांना ते दान करावे. ही पुजा रोज पिपंळाच्या झाडाखालीच झाली पाहिजे. जर पिपंळाचे झाड नसल्यास शमी अथवा बोराचे झाडाखाली केली तरी चालेले. अशा प्रकारे प्रतिदिनी महिन्यापर्यंत केल्यास पूर्ण पतिसौख्य प्राप्त होते.वैधव्यहर कंर्कटीव्रत ''व्रतराज या ग्रंथामध्ये हे एक आणखी व्रत सांगितलेले आहे. सुर्य जेव्हा राशीत प्रवेश केल्यानंतर मुलीने स्नान करून अथवा (तांदूळ) चे अष्टदल करून सोन्याची कर्कटी (काकडी)ची स्थापना करून मनोभावे षोडशोपचार पुजन करावे. विधिवत व्रत करून अकरा काकडी (ऋतुकाळातील काकडी) सहीत सुवर्ण कर्कटी (काकडी)चे दान ब्राम्हणभोजन करावे. या व्रताने वैधव्य योगाची शांती होते.त्याचप्रमाणे ''मार्कण्डेय पुराण'' ह्या पुराणात ''कुंभविवाह'', ''विष्णूविवाह'' हे तील परिहार व्रत दिलेले आहे. ह्या तीनही विवाहांमध्ये ''गणपतिपुजन'', ''मातृकापूजन, ''वर्सोधारापूजन'', ''नांदीश्राध्द'', ''सुवर्णमयी विष्णुपूजन'', ''होमहवादि'' करवून पुढे कर्मे करावे.अर्क विवाह :- ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''विषकन्या योग'' आणि वैधव्य योग असतो. त्याचप्रमाणे पुरूषांच्या कुंडलीत ही ''विषपुत्र योग'' व ''विधुर योग'' ही असतो. ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''वैधव्य योग'' पहातो. त्याचप्रमाणे तेच नियम पुरुषांच्या कुंडलीत ''विधुर योग'' पहावा. जर एखाद्या पुरूषाचा विवाह एका पेक्षा जास्त विवाह होऊनही जर पत्निसुख प्राप्त होत नसेल तर अशा पुरुषाला अर्क (रूई)च्या झाडासोबत विवाह करवून त्यानंतर दुसर्‍या कन्येशी विवाह करावा. कुंभविवाहाच्या प्रमाणे हा ''अर्क विवाह'' पण शास्त्रसंमत सप्तमभावाचे जन्मदोष व अरिष्ट निवारणाचा उत्तमोत्तम परिहार आहे.मुहूर्त काल विचारआदित्य दिवसे वापि हरपक्षे वा शनिश्वरे ।।''अर्क विवाह'' हा रविवारी, शनिवारी किंवा हस्त नक्षत्रावर तसेच शुभ दिवशी हा विधी करावा.मन्वर्थ संजीविनी समुहवरून राम भाउ हलबे गुरुजीं कडून संकलित

Thursday, 20 June 2024

#यह_ज्ञान_अपने_बच्चों_को_जरूर_बतायें ||10 #कर्तव्य👉 1.संध्यावंदन, 2.व्रत, 3.तीर्थ, 4.उत्सव, 5.दान, 6.सेवा 7.संस्कार, 8.यज्ञ, 9.वेदपाठ, 10.धर्म प्रचार।...क्या आप इन सभी के बारे में विस्तार से जानते हैं और क्या आप इन सभी का अच्छे से पालन करते हैं?10 #सिद्धांत👉 1.एको ब्रह्म द्वितीयो नास्ति (एक ही ईश्‍वर है दूसरा नहीं), 2.आत्मा अमर है, 3.पुनर्जन्म होता है, 4.मोक्ष ही जीवन का लक्ष्य है, 5.कर्म का प्रभाव होता है, जिसमें से ‍कुछ प्रारब्ध रूप में होते हैं इसीलिए कर्म ही भाग्य है, 6.संस्कारबद्ध जीवन ही जीवन है, 7.ब्रह्मांड अनित्य और परिवर्तनशील है, 8.संध्यावंदन-ध्यान ही सत्य है, 9.वेदपाठ और यज्ञकर्म ही धर्म है, 10.दान ही पुण्य है।#महत्वपूर्ण_10_कार्य👉 1.प्रायश्चित करना, 2.उपनयन, दीक्षा देना-लेना, 3.श्राद्धकर्म, 4.बिना सिले सफेद वस्त्र पहनकर परिक्रमा करना, 5.शौच और शुद्धि, 6.जप-माला फेरना, 7.व्रत रखना, 8.दान-पुण्य करना, 9.धूप, दीप या गुग्गल जलाना, 10.कुलदेवता की पूजा।10 #उत्सव👉 नवसंवत्सर, मकर संक्रांति, वसंत पंचमी, पोंगल-ओणम, होली, दीपावली, रामनवमी, कृष्ण जन्माष्‍टमी, महाशिवरात्री और नवरात्रि। इनके बारे में विस्तार से जानकारी हासिल करें।10 #पूजा👉 गंगा दशहरा, आंवला नवमी पूजा, वट सावित्री, दशामाता पूजा, शीतलाष्टमी, गोवर्धन पूजा, हरतालिका तिज, दुर्गा पूजा, भैरव पूजा और छठ पूजा। ये कुछ महत्वपूर्ण पूजाएं है जो हिन्दू करता है। हालांकि इनके पिछे का इतिहास जानना भी जरूरी है। 10 #पवित्र_पेय👉 1.चरणामृत, 2.पंचामृत, 3.पंचगव्य, 4.सोमरस, 5.अमृत, 6.तुलसी रस, 7.खीर, 9.आंवला रस और 10.नीम रस। आप इनमें से कितने रस का समय समय पर सेवन करते हैं? ये सभी रस अमृत समान ही है।10 #पूजा_के_फूल👉 1.आंकड़ा, 2.गेंदा, 3.पारिजात, 4.चंपा, 5.कमल, 6.गुलाब, 7.चमेली, 8.गुड़हल, 9.कनेर, और 10.रजनीगंधा। प्रत्येक देवी या देवता को अलग अलग फूल चढ़ाए जाते हैं लेकिन आजकल लोग सभी देवी-देवता को गेंदे या गुलाब के फूल चढ़ाकर ही इतिश्री कर लेते हैं जो कि गलत है।10#धार्मिक_स्थल👉 12 ज्योतिर्लिंग, 51 शक्तिपीठ, 4 धाम, 7 पुरी, 7 नगरी, 4 मठ, आश्रम, 10 समाधि स्थल, 5 सरोवर, 10 पर्वत और 10 गुफाएं हैं। क्या आप इन सभी के बारे में विस्तार से जानने हैं? नहीं जानते हैं तो जानना का प्रयास करना चाहिए।10#महाविद्या👉 1.काली, 2.तारा, 3.त्रिपुरसुंदरी, 4. भुवनेश्‍वरी, 5.छिन्नमस्ता, 6.त्रिपुरभैरवी, 7.धूमावती, 8.बगलामुखी, 9.मातंगी और 10.कमला। बहुत कम लोग जानते हैं कि ये 10 देवियां कौन हैं। नवदुर्गा के अलावा इन 10 देवियों के बारे में विस्तार से जानने के बाद ही इनकी पूजा या प्रार्थना करना चाहिए। बहुत से हिन्दू सभी को शिव की पत्नीं मानकरपूजते हैं जोकि अनुचित है।10 #धार्मिक_सुगंध👉 गुग्गुल, चंदन, गुलाब, केसर, कर्पूर, अष्टगंथ, गुढ़-घी, समिधा, मेहंदी, चमेली। समय समय पर इनका इस्तेमाल करना बहुत शुभ, शांतिदायक और समृद्धिदायक होता है।10 #यम_नियम👉 1.अहिंसा, 2.सत्य, 3.अस्तेय 4.ब्रह्मचर्य और 5.अपरिग्रह। 6.शौच 7.संतोष, 8.तप, 9.स्वाध्याय और 10.ईश्वर-प्रणिधान। -----ये 10 ऐसे यम और नियम है जिनके बारे में प्रत्येक हिन्दू को जानना चाहिए यह सिर्फ योग के नियम ही नहीं है ये वेद और पुराणों के यम-नियम हैं। क्यों जरूरी है? क्योंकि इनके बारे में आप विस्तार से जानकर अच्छे से जीवन यापन कर सकेंगे। इनको जानने मात्र से ही आधे संताप मिट जाते हैं10 #बाल_पुस्तकें👉 1.पंचतंत्र, 2.हितोपदेश, 3.जातक कथाएं, 4.उपनिषद कथाएं, 5.वेताल पच्चिसी, 6.कथासरित्सागर, 7.सिंहासन बत्तीसी, 8.तेनालीराम, 9.शुकसप्तति, 10.बाल कहानी संग्रह। अपने बच्चों को ये पुस्तकें जरूर पढ़ाए। इनको पढ़कर उनमें समझदारी का विकास होगा और उन्हें जीवन में आगे बढ़ने की प्रेरणा मिलेगी।10 #ध्वनियां 👉 1.घंटी, 2.शंख, 3.बांसुरी, 4.वीणा, 5. मंजीरा, 6.करतल, 7.बीन (पुंगी), 8.ढोल, 9.नगाड़ा और 10.मृदंग। घंटी बजाने से जिस प्रकार घर और मंदिर में एक आध्यात्मि वातावरण निर्मित होता है उसी प्रकार सभी ध्वनियों का अलग अलग महत्व है।10 #दिशाएं 👉 दिशाएं 10 होती हैं जिनके नाम और क्रम इस प्रकार हैं- उर्ध्व, ईशान, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर और अधो। एक मध्य दिशा भी होती है। इस तरह कुल मिलाकर 10 दिशाएं हुईं। इन दिशाओं के प्रभाव और महत्व को जानकर ही घर का वास्तु निर्मित किया जाता है। इन सभी दिशाओं के एक एक द्वारपाल भी होते हैं जिन्हें दिग्पाल कहते हैं।10 #दिग्पाल 👉 10 दिशाओं के 10 दिग्पाल अर्थात द्वारपाल होते हैं या देवता होते हैं। उर्ध्व के ब्रह्मा, ईशान के शिव व ईश, पूर्व के इंद्र, आग्नेय के अग्नि या वह्रि, दक्षिण के यम, नैऋत्य के नऋति, पश्चिम के वरुण, वायव्य के वायु और मारुत, उत्तर के कुबेर और अधो के अनंत।10 #देवीय_आत्मा👉 1.कामधेनु गाय, 2.गरुढ़, 3.संपाति-जटायु, 4.उच्चै:श्रवा अश्व, 5.ऐरावत हाथी, 6.शेषनाग-वासुकि, 7.रीझ मानव, 8.वानर मानव, 9.येति, 10.मकर। इन सभी के बारे में विस्तार से जानना चाहिए।10 #देवीय_वस्तुएं 👉 1.कल्पवृक्ष, 2.अक्षयपात्र, 3.कर्ण के कवच कुंडल, 4.दिव्य धनुष और तरकश, 5.पारस मणि, 6.अश्वत्थामा की मणि, 7.स्यंमतक मणि, 8.पांचजन्य शंख, 9.कौस्तुभ मणि और 10.संजीवनी बूटी।आदि!!Arun Shastri जबलपुर: ❗जय महादेव❗ ⭕प्रश्न नहीं स्वाध्याय करें‼️

Thursday, 18 April 2024

🙏🌹🚩💐🍁🙏🙏🌹🚩🚩संग्रह..सं.गो.पोतदार,कोपर-डोंबिवली.माझ्याकडे एक पुस्तक सापडले .त्यात ब्राह्मणाची आरती होती.कुठेही तशी वाचनात न येणारी किंवा ही आरती कधी न केली जाणारी.खुप जुनी आहे.खास फक्त आपल्याच ब्राहमण संस्कृती कुटुंबातील व्यक्तींसाठी पाठवत आहे.👇👇👇🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🔥🔥🔥 🙏||ब्राह्मणाची आरती||🙏निगमागम विस्तारक तारक आहेसीकेवळ तु अधिकारी जप तप यज्ञासीवरिष्ट उत्तम गुरु नाना वर्णासी सकळांचे द्वीज मन्त्र आहे तुजपासी॥१॥जयदेव जयदेवजयदेव जयदेव जय भूदेवा ब्राह्मणतुझे दैवत करिती जन सेवा । जयदेव जयदेव॥धृ॥श्री विष्णूने धरिले ह्रदयी पदकमळा म्हणुनीया वैकुंठी भोगिती सोहळाप्रसाद अवघा हाची स्वामी भूपाळा आशिर्वचने हरतील भवचिन्ता सकळा ॥२॥जयदेव जयदेवद्विज वदने अर्पिता पावे देवासी पूजन केल्या हरतील पापांच्या राशीपदतीर्थांचा महिमा न कळे कोणासी गोसावी सूत स्वामी वंदे सहितासी॥३॥जयदेव जयदेवब्राह्मण संस्कृती.जास्तीत जास्त प्रसारित करावी..🙏🙏🙏

Friday, 29 March 2024

चौदा प्रकारचे जप - १ नित्यजप , २ नैमित्तिक , जप , ३ कम्यजप , ४ निषिद्ध जप , ५ प्रायश्चित्त जय , ६ अचल जप , ७ चल जप , ८ वाचिक जप , ९ उपांशु जप , १० भ्रमर जप , ११ मानस जप , १२ अखंड जप , १३ अजपा जप , आणि १४ प्रदक्षिणा जप .चौदा प्रकारचा भूतसमुदाय - १ सिद्ध , २ गुह्मक , ३ गंधर्व , ४ यक्ष , ५ राक्षस , ६ सर्प , ७ विद्याधर , ८ पिशाच - या आठ देवयोनि आणि ९ सरीसृप , १० वानर , ११ पशुअ , १२ मृग ( जंगली प्राणी ) १३ पक्षी - या पांच तिर्यग् ‌‍ योनि व १४ मनुष्य योनि . असा चौदा प्रकारचा भूतसमुदाय अथवा प्राणिमात्र होत .चौदा प्रकार यज्ञाचे - १ अग्निष्टोम , २ अत्यग्निष्टोअम , ३ उक्थ , ४ षोडशी , ५ वाजपेअय , ६ अतिरात्र , ७ आप्तोर्याम , ह्मा सात सोमसंस्था आणि ८ अग्निहोत्र , ९ दर्शपूर्णमास , १० आग्रयण , ११ पिण्डपितृयज्ञ , १२ चातुर्मास्य , १३ निरूढ पशुबंध आणि १४ सौत्रामणि . अशा सात हवियज्ञ संस्था मिळून चौदा प्रकार होत .चौदा प्रकार रुद्राक्षांचे - एक ते चौदा मुखें असलेल्या रुद्राक्षांचीं चौदा नांवें क्रमानें :- १ शिव . २ देवदेवेश्वर , ३ अनल , ४ ब्रह्मा , ५ कालाग्निरुद्र , ६ कार्तिकेय , ७ अनङ्‌‌ग , ८ विनायक , ९ मैरव , १० नजार्दन , ११ रुद्र , १२ आदित्य , १३ विश्चेदेव व १४ परम - शिव .चौदा प्रकारच्या शालिग्राम शिला - १ प्रलंबघ्न , २ पुंडरीक , ३ वैकुंठ , ४ मधुसूदन , ५ सुदर्शन , ६ नर ७ राम , ८ लक्ष्मीनारायण , ९ वीरनारायण , १० क्षीराव्धिशयन , ११ माधव , १२ हयग्रीव , १३ परमेष्ठी व १४ विष्वक्‌‌सेन . असे एक चक्र असलेले शालिग्रामाचे चौदा प्रकार . माध्व संप्रदायांत शालिग्रामपूजनाचें विशेष महत्त्व मानलें आहे .चौदा प्राकृत भाषा - १ शौरसेनी , २ महाराष्ट्री , ३ मागवी , ४ अर्धमागधी , ५ प्राच्य किंवा गौडी , ६ अवन्तिका ७ दाक्षिणात्य ८ शाकरी , ९ बाल्हिकी , १० द्राविडी , ११ आभीरी , १२ चाण्डाली , १३ शाबरी व १४ पैशाची . ( भारतीय साम्राज्य )चौदा प्रांत भाषा - १ आसामी , २ बंगाली , ३ गुजराथी , ४ हिंदी , ५ कानडी , ६ काश्मिरी , ७ मल्याळी , ८ मराठी , ९ ओरिया , १० पंजाबी , ११ संस्कृत , १२ तामिळ , १३ तेलगु व १४ ऊर्दू . या चौदा प्रमुख भाषा प्रांतभाषा म्हणून भारतीय घटनेनें मान्य केल्या आहेत . ( हिंदी राज्यघटना ) खेरीज साहित्य अकॅडमीनें इंग्रजी व सिंधी या दोन भाषांस कांहीं प्रमाणांत मान्य्ता दिली आहे .चौदा प्रमुख नाडया - १ सुषुम्ना , २ इडा , ३ पिंगला , ४ कुहु , ५ गांधारी , ६ हस्तिजिव्हा , ७ सरस्वती , ८ पूषा , ९ पयस्विनी , १० शंखिनी , ११ यशस्विनी , १२ करुणा , १५ विश्बोदरा आणि १४ अलम्बुषा . ( योगशास्त्र )चौदा प्रमुख स्त्रोते - १ प्राणवह २ उदकवह , ३ अन्नवह , ४ रसवह , ५ रक्तवह , ६ मांसवह , ७ मेदोवह , ८ अस्थिवह , ९ मज्जावह , १० शुक्रवह , १२ आर्तववह , १३ पुरीषवह , व १४ स्वेदवह , शरीरांत उत्पन्न होणार्‍या असंख्य भावांचें उत्पादन व वहन करणार्‍या अंसख्य स्त्रोतसांत चौदा प्रमुख खोतसें शास्त्रकारांनीं वर्णिलीं आहेत.चौदा बलें राज्यशासकांचीं - ( अ ) १ देश , २ दुर्ग , ३ रथ , ४ हत्ती , ५ घोडे , ६ योद्धे , ७ राज्याधिकारी , ८ अंतःपुर , ९ अन्नव्यवस्था , १० अश्वरथादिकांचा पुरवठा , ११ नीति , १२ आयव्यय , १३ द्वव्य - पुरवठा आणि १४ गुप्तशत्रु , हीं चौदा राज्यशासकांचें बलाबल अजमावण्याचीं स्थानें होत . ( आ ) १ अंगबल , २ स्वतःचें शरीरबल . ३ सेनाबल , ४ कोशबल , ५ दुर्गबल , ६ कोटकिल्ले , ५ शक्तिबळ , ६ मंत्रबळ , ९ - १० - ११ वेदत्रयबळ ( आयुर्वेद , धनुर्वेद व गांधर्ववेद ) १२ बुद्धिबळ , १३ ब्राह्मणशेष सुकृतबळ आणि १४ अन्य राज्यांचें साह्मबळ .चौदा ब्रह्में - १ शब्दब्रह्म , २ नित्येकाक्षरब्रह्म , ३ खंब्रह्म , ४ सर्वब्रह्म , ५ चौतन्यब्रह्म , ६ सत्ताब्रह्म , ७ साक्षिब्रह्म , ८ सगुणब्रह्म , ९ निर्गुणब्रह्म १० वाच्याब्रह्म , ११ अनुभवब्रह्म , १२ आनंदरब्रह्म , १३ तदाकारब्रह्म व १४ अनिर्वाच्यब्रह्म .चौदा मनु - १ स्वायंभुव , २ स्वारोचिष , ३ उत्तमननु , ४ तामसमनु , ५ रैवत , ६ चाक्षुष , ७ वैवस्वत , ८ सावर्णि , ९ दक्षसावर्णि , १० ब्रह्मा सावर्णि , ११ धर्मसावर्णि , १२ रुद्रसावर्णि , १३ देवसावर्णि व १४ इंद्रसावर्णि . सृष्टिचक्रांत असलेली , कोकस्थिति कांहीं कालानें बिघडते व पुन्हां ती ताळ्यावर आणण्यासाठीं जुळबाजुळव होते . हा जो जुळवाजुळव होऊन मोडेपर्यंतचा काल त्यास मन्वन्तर म्हणतात . त्या मन्वन्तराचा अधिपति तो मनु . असे चौदा मनु आहेत , अशी कल्पना आहे .चौदा मन्वन्तरें - १ स्वायंभुव , २ स्वारोचिष , ३ उत्तम , ४ तामस , ५ रैवत , ६ चाक्षुष , ७ विवस्वत , ८ सावर्णी , ९ धर्म , १० सावर्णिक , ११ पिशंग , १२ अपिशंगाम , १३ शबल आणि १४ वर्णक . ब्रह्मदेवाचें एक अहोरात्र म्हणजे कल्प , असे तीस कल्प सांगितले आहेत . एका कल्पांत चौदा मन्वन्तरें होतात . सध्यां चालू असलेल्या वाराह कल्पांतल्या सातव्या मन्वन्तराचें नांव वैवस्वत आहे .चौदा मन्वतरावतार - १ यज्ञ , २ विभु , ३ सत्यसेन , ४ हरि , ५ वैकुंठ , ६ अजित , ७ वामन , ८ सार्वभौम , ९ ऋषभ , १० विष्वक्‌‍सेन , ११ धर्मसेतु , १२ सुदामा , १३ योगेश्वर व १४ बृहद्भानु .चौदा माहेश्वरी सूत्रें - १ अ इ उ ण् ‌‍ , २ ऋ लृ क् ‌‍ , ३ ए ओ ङ् ‌‍ , ४ ए ओ च् ‌ , ५ ह य व र ट् ‌ , ६ ल ण् ‌‍ , ७ ञ म ङ ण न म् ‌‍ , ८ झ भ ञ् ‌‍ , ९ घ ढ ध ष् ‌‍ , १० ज ब ग ड द श् ‌‍ , ११ ख फ छ ठ थ च ट त व् ‌‍ , १२ क प य् ‌‍, १३ श ष स र् ‌‍ आणि १४ ह ल् ‌ . हीं मूळ सूत्रें पाणिनीनें अठ्ठावीस दिवस तप करून शंकराकडून मिळविलीं . ( भ . प्रतिसर्ग ४ - ३० ) पाणिनीच्या कठोर तपामुळें भगवान् ‌‍ शंकरानें प्रसन्न होऊन ताण्डव नृत्य करीत असतांना जो डमरू वाजबिला त्यांतून निघालेल्या चौदा ध्वनि - नादामुळें हीं मूळ चौदा सूत्रें ध्वनिरूपानें निघालीं .चौदा यज्ञ ( गीतोक्त )- १ ब्रह्मयज्ञ , २ द्र्व्यज्ञ , ३ देवयज्ञ , ४ ज्ञानेंद्रिययज्ञ , ५ विषययज्ञ , ६ स्वाध्याय - ज्ञानयज्ञ , ७ प्राणयज्ञ , ८ अपानयज्ञ , ९ प्राणापानयज्ञ , १० आंतरपानयज्ञ , ११ योगयज्ञ , १२ तपोयज्ञ , १३ जपयज्ञ व १४ इंद्रियप्रान - कर्मयज्ञ . या सर्वांत जपयज्ञ महत्त्वाचा होय .चौदा यमधर्म - १ यम , २ धर्मराज , ३ मृत्यु , ४ अंतक , ५ वैवस्वत , ६ नील , ७ दध्न , ८ काल , ९ सर्वभूत , १० षरमेष्ठी , ११ वृकोदर १२ औदुंबर , १३ चित्र व १४ चित्रगुप्त .चौदा रत्नें -( अ ) देव आणि दानव यानीं समुद्र्मंथन करून चौदा रत्नें अथवा मूल्यवान् ‌‍ वस्तु काढल्या त्या - १ लक्ष्मी , २ कौस्तुभ , ३ पारिजातक , ४ सुरा , ५ धन्वंतरी , ६ चंद्र , ७ कामधेनु , ८ ऐरावत , ९ रंमा ( आदि अप्सरी ), १० उच्चैःश्रव नामक सप्तमुखी अश्व ( हा श्चेतवर्ण व उन्नतकर्ण असा होता ), ११ कालकूट विष , १२ शाङ्‌‍र्ग धनुष्य , १३ पांचजन्य शंख व १४ अमृत होय .( आ ) प्रत्येक जातींतील श्रेष्ठं वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे. अशी चौदा प्रकारचीं रन्तें पुराणांत वर्णिलीं आहेत तीं :- १ हत्ती , २ घोडा , ३ रथ , ४ स्त्री , ५ पुरुष , ६ कोश ( धन ), ७ पुषमाला , ८ वस्त्र , ९ वृक्षराजि , १० शक्ति , ११ पाश , १२ मणि , १३ छत्र व १४ विमान .चौदा रत्नें वेदाब्धिमंथनांतून निघालेली - १ विष - काम , २ मणि - अर्थ , ३ रंभा - नरकप्रदवेश्या , ४ वाजी.५ श्री - शक्ति , ६ वारुणी - अभिमान , ७ धन्वतरि - विष्णु , ८ शंख - मोक्ष , ९ धेन - धर्म , १० धनु - मर्न्य - युद्ध - संघंर्ष , ११ चंद्र - आल्हाद तत्त्व शिव , १२ कल्पवृक्ष - खर्ग ( त्रिवर्गभोग ), १३ गज ऐरावत - गणेश गजानन आणि १४ अमृत - कथा .चौदा रोगभेद - १ सहजरोग , २ गर्मजरोग , ३ जातज्ञातरोग , ४ पीडाजनितरोग , ५ कालरोग , ६ प्रभावजरोग , ७ स्वभावजरोग , ८ देशजरोग ९ आगंतुकरोग , १० कायिकरोग , ११ आंतररोग , १२ कर्मजरोग , १३ दोषजरोग आणि १४ कर्मदोषजरोग .चौदा लाभ शिखा धारणानें प्राप्त होणारे - १ निष्णातता , २ जीवनशक्तिन , ३ दीर्घायुष्य , ४ बल , ५ तेज , ६ अन्न , ७ धन , ८ सुमन , ९ द्दष्टि , १९ देवताप्रसाद , ११ यश , १२ प्रजननशक्ति , १३ सुप्रजा आणि १४ उत्तम वीर्य .चौदा वाचा दोष - १ पद्यांतील प्रयोग गद्यांत व गद्यांतील प्रयोग पद्यांत करणें , २ नाददोष , ३ क्रमदोष , ४ पददोष , ५ वाक्यदोष , ६ शक्तिदोष , ७ सामर्थ्यदोष , ८ गुणदोष , ९ प्रसाददोष , १० माधुर्य व ओजदोष , ११ अर्थदोष , १२ उपदेशदोष , १३ क्रियादोष व १४ अकांक्षा दोष.चौदा विद्या -( अ ) १ ऋग्वेद , २ यजुर्वेद , ३ सामवेद , ४ अथर्ववेद हे चार वेद व १ छंद , २ शिक्षा ३ व्याकरण , ४ निरुक्त , ५ ज्योतिष व ६ कल्प - हीं सहा वेदांगें आणि १ न्याय , २ मीमांसा , ३ पुराणें व ४ धर्मशास्त्र - हीं सर्व मिळून चौदा विद्या होत .( आ ) १ आत्मज्ञान , २ वेदपठण , ३ धनुर्विद्या , ४ लिहिणें , ५ गणित , ६ पोहणें , ७ विणणें , ८ शस्त्र धरणें , ९ वैद्यक , १० ज्योतिष , ११ रमलविद्या , १२ सूपशास्त्र , १३ गायन व १४ गारुड . ( मूळ स्तंभ , ) ( इ ) १ ब्रह्मज्ञान , २ रसायन , ३ श्रुतिकथा , ४ विद्यक , ५ नाटय , ६ ज्योतिष , ७ व्याकरण , ८ धनुर्विद्या , ९ जलतरण , १० कामशास्त्र , ११ सामुद्रिकशास्त्र , १२ तन्त्रशास्त्र , १३ मंत्रशास्त्र आणि १४ परस्वहरण.चौदा वेग मानव शरीरांतले - १ अधो वायुवेग , २ रेचन ( मल ) वेग , ३ मूत्रवेग , ४ ढेकर , ५ शिंक , ६ तृषा , ७ क्षुधा , ८ निद्रा , ९ खोकला . १० श्रमजनित श्वासवेग , ११ जांभई , १२ अश्रुवेग , १३ वमन ( ओकारी ) आणि १४ कामवेग . या वेगांच अवरोअध केला असतां शरीरांत विकृति निर्माण होते .चौदा शिलाशासन लेख व विषय ( अशोकाचे )- १ अहिंसा , २ धार्मिक कृत्यें , ३ अधिकार्‍याची पंचवार्षिक फिरती , ४ धर्माचरण , ५ धर्म महासभा , ६ कामाचा उरक , ७ धार्मिक गुण , ८ धर्मयात्र , ९ मंगल समारंभ , १० यश व कीर्ति , ११ दानधर्म , १२ परमतसहिष्णुता , १३ धर्मविजय व १४ उपसंहार , असे चौदा महत्त्वाचे शिलाशासन लेख सर्व भारतांत अनेक ठिकाणीं आढळले असून त्यावरून भारताच्या प्राचीन इतिहासाची महत्त्वाची माहिती मिळते .चौदा शुभयोग - १ आनंद , २ प्रजापति , ३ सौम्य , ४ घ्वज , ५ श्रीवत्स , ६ छत्र , ७ मित्र , ८ मानस , ९ सिद्धि , १० शुभ , ११ अमृत , १२ मातंग , १३ स्थिर व १४ वर्धमान . हे चौदा संपूर्ण शुभयोग मानले आहेत .चौदा शैव ( वेदकालीन )- १ दुर्वास , २ विश्वामित्र , ३ चतुरानन , ४ मार्कंडेय , ५ इंद्र , ६ बाणासुर , ७ नारायण , ८ कार्तिकेय , ९ दधिचि , १० श्रीराम , ११ कण्व , १२ भार्गव , १३ बृहस्पति व १४ गौतम.चौदा समाधिस्थानें चांगदेवाचीं - १ ब्रह्मगिरि , २ पुण्यस्तंभ , ३ नारायण डोह , ४ गिरनार , ५ निर्मळ , ६ प्रयाग , ७ निर्गुंद , ८ सेतुबंध , ९ जगन्नाथपुरी , १० मणिपुरी , ११ चंद्रगिरि , १२ शरय़ूतीर , १३ अविमुक्त क्षेत्र ( वाराणशी ) व १४ गोदातीरां पुणतांबें , चांगदेव महायोगी होतो .दर शंभर वर्षांनीं योगसामर्थ्यांनें जुना देह टाकून नवा देह धारण करीत . अशा रीतीनें ते चवदाशें वर्षें जगले . शेवटची समाधि पुणतांबे येथें गोदातीरीं आहे .चौदा सहजप्रवृत्ति व त्यांच्या जोडीनें प्रगट होणार्‍या भावना - १ विमोचन प्रवृत्ति - भीति , २ युद्ध प्रवृत्ति - राग , ३ जुगुप्सा प्रवृत्ति - तिटकारा , ४ वात्सल्य प्रवृत्ति - मृदुभाव , ५ याचना प्रवृत्ति - आर्तभाव , ६ संभोग , प्रवृत्ति - कामभाव , ७ आत्मसमर्पण प्रवृत्ति - हीनभाव , ८ जिज्ञासा प्रवृत्ति - आश्वर्य , ९ आत्मविधान प्रवृत्ति - अहंभाव , १० संध प्रवृत्ति - एकाकी भाव , ११ अन्नसंशोधन प्रवृत्ति - क्षुधा , १२ निर्माण प्रवृत्ति - कर्तृभाव , १३ संपादन प्रवृत्ति - स्वाम्यभाव व १४ हास्य प्रवृत्ति - विनोदभाव.चौदा हेर प्राणिमात्रांच्या वर्तनावर देखरेख करणारे - १ सूर्य , २ चंद्र , ३ बायु , ४ अग्नि , ५ आकाश , ६ भूमि , ७ जल , ८ अंतःकरण , ९ यम , १० दिवस ११ रात्र , १२ सूर्योदय व १३ सूर्यास्त समयींचे संधिकाल आणि १४ धर्म ...