joshi bhataji blog
Thursday, 7 August 2025
लेख स्वलिखितसौ मनीषा भावसारसंदर्भ ज्योतिष ग्रंथभगवान श्री कृष्णा ची कुंडली social media वर अशी मिळाली अजून एक दुसरी सुध्दा होती पण त्यांच्या जीवन प्रवासातील घटना या कुंडलीशी मिळत्या जुळत्या वाटल्यास्वतः योग योगेश्वर भगवान श्री कृष्णाची कुंडली माझ्या सारख्या तुच्छ मानवाने सांगणे म्हणजे ..... सहस्र सुर्या समोर काजवा .. पण ज्योतिष शास्त्रानुसार मानवाचे कुतूहल हे उच्च कोटीला जाते आणि जो ईश्वर अखंड ब्रह्मांड चालवतो तो जेव्हा मानव रुपात जन्म घेतो तेव्हा त्या मोहक भगवंताचीपत्रिका कशी असेल कुठले ग्रहयोग असतील हे पाहण्याचा मोह आवरता येत नाही।।वसुदेवसुतं देवं कंस चाणुर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु।।श्रीमद भागवत पुराण( महर्षी व्यास)हरीवंश पुराण यात श्री कृष्ण जन्माची माहिती मिळतेहरीवंश पुराणातील 4 आध्याय मधील श्लोकात श्री कृष्ण जन्म चे वर्णन मिळतेभगवान मानवरूपात जन्माला आल्यावर त्याना सुद्धा ग्रह नक्षत्राच्या गती नुसार फळे मिळतात का?....वेदांचे एक अंग ज्योतिष आहे आणि देव वेदांचे अंतरंग ...ह्या प्रश्न चे उत्तर शोधावे तेहोडे या गुंत्यात माणूस गुंततो....श्री कृष्ण हे श्री विष्णूचे आठवे अवतार आहेत त्यानी मानव रुपात जन्म घेतला गीते च्या 4 अध्यातील 7 व श्लोकात कृष्ण म्हणतात यदा यदा ही .... धर्मस्य. ....या श्लोकात स्वतः कृष्ण सांगतात ' जेव्हा,जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल ....तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना करण्यसाठी मी जन्म घेईन 'स्वतः कृष्णच त्यांच्या जन्माची कथा सांगत आहे...कुंडली विश्लेषण....कृष्ण अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता जेल मध्ये देवकी व वासुदेव यांच्या पोटी जन्म अष्टमी तिथी ही अपार सौंदर्याची तिथी श्री कृष्णा च्या कुंडलीत सुद्धा प्रभू रामाच्या कुंडली प्रमाणे 5 ग्रह उच्च आहेत....चंद्र,गुरू,बुध, शनी आणि मंगळलग्न व राशी स्वामी शुक्र आहे वृषभ लग्न वृषभ रास म्हणजेच अति सुंदर मनमोहक रूप ...हृदयाचा ठाव घेणारे स्मित हास्य ....राजस सुकुमार मदनाचा पुतळा ...सुंदर डोळे खरे तर कृष्ण म्हणजेच आकर्षण चंद्र उच्चीचा म्हणून देवकी व यशोदे कडून भरपूर प्रेम मिळाले पित्या चा कारक सूर्य स्वराशीचा नंद व वसुदेव हे आध्यत्मिक पिते मिळालेचंद्र मनाचा कारक उच्चीचा अनेक विद्या अवगत होत्या चंद्र पराक्रमेश लग्नात उच्चीचा त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पराक्रम करावा लागला मंगळाची दृष्टी पराक्रम स्थनावर ....कारक स्थनावर जिंकण्यासाठी च पराक्रम झाले मंगळ बंधू चा कारक बलराम सारखा भाऊ मिळाला उच्चीचा बुध पंचमात तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रदान करतो...महाभारतातील कृष्ण शिष्टाई आपण जाणतोचत्रितीयतील उच्चीचा गुरू व पंचमातील बुध जगाला गीते चे ज्ञान दिले ....गुरू ची दृष्टी मंगळावर त्यामुळे युद्ध करूनच धर्माची स्थापना झाली ...पण अगोदर युध्द क्षेत्रावर कर्तव्य पूर्ती चे ज्ञान दिले ..संपूर्ण विश्वात भगवद्गीते सारखा दुसरा ग्रंथ नाही तो एकमेवाद्वितीय आहेषष्ठात उच्चीचा शनी व राहू शत्रू हंता योग करत आहेत पण शत्रू चा निप्पात सुद्धा संयमाने केला हा उच्चीचा शनी लोकशाही दाखवतो ते सामान्य गोपगोपिका मध्ये रमले शनी ची पूर्ण दहावी 10 वी दृष्टी गुरुवार ते गूढ ज्ञान व योग योगेश्वर बनले ....माना मानव व परमेश्वर . मी स्वामी पतितांचा ...भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा .....उच्चीचा गुरू धर्म स्थनावर दृष्टी संदीपनी ऋषी सारखे गुरू लाभले ...चंद्र बुध मंगळ नवपंचम योग हा धर्मत्रिकोणात घटित होत आहेसप्तमेश मंगळाची दृष्टी लग्नावर व लाभेशावर बहू भार्या योग झाला आणि अष्टमेश व लाभेश गुरू दृष्टी सुध्दा सप्तमावर त्यांचे विवाह हे युद्ध करून झाले रुख्मिनी स्वयंवर किंवा 16 सहस्त्र नारी वरतांना त्याना युद्ध करावे लागले ....भूषण रामा एक पत्नीव्रत मला नको तसले ....तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अबला गुरू ची दृष्टी जशी धर्म भावावर धर्म स्थापने साठी जन्म आणि गुरू दृष्टी लाभ भावावर धनसंपदा वाढली अनेक लाभ मिळाले धनेश बुध पंचमात प्रद्युम्न योग करत आहे ....सोन्याची द्वारका होती त्याना प्रद्युम्न नावाची शिवशंकरच्या आशीर्वादाने झालेली अतिशय हुशार संतती लाभली होती म्हणजे पंचम भाव खूप स्ट्रॉंग होता वाणी चा कारक बुद्ध पंचमात उच्चीचा ते दिव्य वाणी चे धनी होते ,मंत्र शास्त्र पारंगत ,मित्राचे मित्र होते ..सुदामा प्रेम आपण जाणतोच काही संघर्ष....षष्ठात राहू मामा कडून त्रास ,आजोळी त्रास व्यएश मंगळाची दृष्टी लग्नेश शुक्रावर बंधन योगात जेल मध्ये जन्म ,शनी राहू षष्ठात सर्व आयुष्य शत्रूचा निप्पात करण्यात गेले ...त्याचा दशमेश शनी षष्ठात राहू सोबत पित्याला जेल योग झाला शष्टेश चतुर्थेश युती अनेक जागा बदलाव्या लागल्या व्यएश मंगळाची दृष्टी चतुर्थावर व त्यातील ग्रहावर आई वडिलांना त्रास भोगावा लागला व्यएश मंगळाची दृष्टी लाभेश गुरुवार मोठया बंधू ना त्रास झाला मोक्ष भावात केतु म्हणजे शरीर सोडताना पूर्ण जीवन मुक्त होतेमृत्युतून सुध्दा त्यानी कर्म भोगाचा संदेश दिला ....मोह न मजला कीर्ती चा मी नाथ अनाथांचा .....भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा ....कृष्ण नावाची मोहिनी अशीच अविरत राहो हीच प्रार्थनावरील कुंडली नेट वर मिळाली तशी घेतली कुंडली विश्लेषणात काही चुका असतील तर मार्गदर्शन करावे कुंडली ही फक्त लग्न कुंडली नुसार पहावी लागली राधे कृष्ण🙏सौ मनीषा भावसारManesha @astro
Wednesday, 30 July 2025
" जानवे " जानव्या संबंधित ५ प्रश्न?१) जानवे म्हणजे नेमके काय?२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात का आणी कसे आले?३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे?४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?५) जानवे घातल्याने होणारे याचे फायदे कोणते?ह्याची उत्तरे तूम्हाला माहित. नसेल तर, नक्की वाचा!१) जानवे म्हणजे नेमके काय ?जानवे हे हिंदू धर्मातील प्रत्येक पुरुष व्यक्तींच्या व्यवच्छेदक चिन्हांपैकी एक चिन्ह मानले जाते. जानव्याला यज्ञोपवीत, ब्रह्मसुत्र, यज्ञासुत्र, जनेऊ अशा विविध संज्ञा आहेत.जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत म्हणजे जानवे अशी व्याख्या केली जाते.जानवे हे कापसाच्या तंतूंनी तयार करतात. तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात. असे तीन पदर एकत्र करून एक विशिष्ट गाठ(ब्रह्मगाठ) "ग्रंथी " मारली म्हणजे जानवे तयार होते. अशा रीतीने जानव्यात एकून नऊ सूत्रे असतात. सुतावरुन स्वर्ग गाठणे ह्या मराठी म्हणीतील सूत (बासूत्र ) ते हेच.त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे.जानवे तयार करताना व धारण करताना विशिष्ट मंत्र म्हणतात, तो कोणता ते पुढे जाणून घेऊ. तसेच ते तयार झाल्यावर त्याच्यावर मंत्रपूर्वक संस्कार करतात. जानव्याचे मंत्रपूर्वक अभिमंत्रण केल्यावर ते सूर्याला दाखवितात आणि मगच धारण करतात.यज्ञोपवितामध्ये तीन मुख्य पदर, प्रत्येक मुख्य पदरांचे तीन उपपदर आणि प्रत्येक उपपदराचे तीन सुक्षमतंतू असे नऊ पदर म्हणजेच तंतू असतात. जानव्यातील एकूण ९ तंतूंपैकी• पहिल्या तंतूवर ओमकार असतो.• दुसर्यावर अग्नी असतो.•तिसर्यावर नवनाग असतो.• चौथ्यावर सोम असतो.• पाचव्यावर पितर असतो.• सहाव्यावर प्रजापती असतो.• सातव्यावर वायू असतो.• आठव्यावर यम असतो.• नवव्यावर विश्वदेव असतो.असे नऊ सुत्रिंचे (तंतू) तीन पदर म्हणजेच – •सत्व•रज•तम• हे तिन गुण.हे तीन गुण असलेल्या दोर्याच्या ९६ आंगुळे इतक्या लांब दोऱ्याचे जानवे बनलेले असावे.(जानवे ९६ बोटे लांब असावे असा शास्त्रात उल्लेख आहे.)शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चारअंगुळे )लांबी असलेल्या सूतास, कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून, त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते.जानव्यावर जी "ब्रह्मगाठ" मारली असते, ती अद्वैताची गाठ म्हणजेच “जिव व ब्रम्ह एकच आहे” हा सिद्धांत.चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे “जिवो ब्रम्हैव ना पर” हिच शिकवण देतात.माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात.तो गुण नवरत्नाकारू यया नवरत्नाचा हारू न फेङितले दिनकरू प्रकाश जैसा ज्ञाने.यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू हा मुख्य धागा होय. देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात.तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे.यज्ञोपविततील तीन मुख्य पदर पुढील त्रयींचे प्रतिनिधित्व करतात.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ हे तीन आश्रम;गार्हपत्य, दक्षिणाग्नी, आहवनीय हे तीन अग्नीसत्व, रज, तम हे तीन गुणपृथ्वी, अंतरीक्ष, दृह्यू हे तीन लोकखांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते.३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते.जानव्याच्या सुताची लांबी ९६ चौंगे असण्यामागे काही कारणे आहेत, ती अशी –प्रथम कारण – चतुर्वेदेषु गायत्री चतुर्विन्शत्येकाक्षरा | तस्मात् चतुर्गुणं कृत्वा ब्रह्मसुत्रं मदिरयेत् ||म्हणजे:-२४ अक्षरयुक्त गायत्री चारही वेदांमध्ये आलेली असल्यामुळे त्यानुसार ब्रह्मसुतांची लांबी (२४×४=९६) ९६ असते.दुसरे कारण म्हणजे –तिथि वार च नक्षत्र तत्ववेद गुणान्वितम् । कालत्रयम् च मासाश्च ब्रह्मसूत्र हि षण्णाव ||म्हणजे :-४ वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद )+ ३ काळ +२५ तत्वे (प्रकृती, पुरुष, महतत्व, अंहकार, पंच महाभुते,पंच विषय, पंच ज्ञानेद्रिय, पचं कर्मेद्रिय, मन) +३ गुण ( सत्व, रज, तम ) +१५ तिथी +७ वार +२७ नक्षत्रे +१२ महिने = ९६;ह्या सर्वांच्या बेरजेनुसार लांबी ९६ येते.तीसरे कारण म्हणजे –सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वतःच्या अंगुलांनी ८४ ते १०८ पर्यंत असते. त्याची सरासरी ९६ अंगुळे येते.हिंदू धर्मात एकूण १६ संस्कार आहेत. ते असे:-1. भूमिका2. गर्भाधान संस्कार3. पुंसाधन संसकार4. सीमन्तोन्नयन5. जातकर्म6. नामकरण संस्कार (बारसे)7. निष्क्रमण8. अन्नप्राशन संस्कार (बोळव)9. मुंडन/चूड़ाकर्म संस्कार (जावळ)10. विद्यारंभ संस्कार11. कर्णवेध संस्कार (कान टोचणे)12. यज्ञोपवीत /उपनयन संस्कार (मुंज)13. वेदारंभ संस्कार14. देशात संस्थार15. समावर्तन संस्कार16. विवाह संस्कारअन्त्येष्टि संस्कार आणि श्राद्ध संस्कारयांतील एका संस्कारात जानव्याचा उल्लेख केलेला आढळतो.पण, वर्णन केलेला उपनयन संस्कार / मौंज म्हणजे नेमके काय?गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, मौंज, व्रतबंध किंवा मौंजीबंधन असेही म्हणतात. गुरूंच्या जवळ राहून, ब्रम्हचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध होय. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. पहिला जन्म आई-बाबांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापसून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.२) जानव्याचा इतिहास काय? जानवे अस्तित्वात कसे आले?प्राचीन काळी जेव्हा यज्ञाविधी किंवा कर्मकांड केले जात असे, तेव्हा विधी करणाऱ्याच्या शरीराच्या वरच्या भागावर ‘उत्तरीय’ पांघरलेले असावे, असा नियम होता. हे उत्तरीय डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या काखेखालून घेतले जात असे. प्राचीन काळी क्षत्रिय देखील यज्ञाविधि करायचे, त्या मुळे तेही ‘उत्तरीय’ पांघरत असत. पण तेव्हा हे उत्तरीय फक्त विधी चालू असताना पंघरणे बंधनकारक होते. नंतर ते काढून ठेवले तरी चालायचं. मनुष्य प्राणी वस्त्रहीन जन्माला येतो. आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे तो प्राण्याप्रमाणे वावरू शकतो. परंतु माणसाकडे संस्कृतीचा वारसा आणि जबाबदारी असते, म्हणून प्रौढत्त्वाकडे आणि स्वायत्ततेकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणून उपवस्त्र अर्थात् वरून घालायचा कपडा दिला जात असे. उपनयन अर्थात् मुंज हा तोच प्रकार आहे.मुंजीनंतर सदैव उपवस्त्र परिधान करावेच लागते. अंतर्वस्त्राशिवाय तर मुळीच वावरता येत नाही. मुंज झाल्यापासून “सत्यं वद। धर्म चर।” या आदेशाचे पालन अत्यावश्यक, मुंजीच्या आधीची सगळी पापे माफ असतात असे मानतात ते त्यासाठीच हा प्रकार फक्त हिंदुतच नव्हे तर जरतुष्टी (पारशी), ज्यू, आफ्रिकेतील मसाई अशा इतर समाजांतही असतो. जर तुष्टी (पारशी) धर्म हा वैदिक धर्माच्या जवळचा धर्म आहे. वैदिकांत ज्याप्रमाणे उपनयन हा द्वितीय जन्म मानला जातो आणि त्यावेळी बटूला यज्ञोपवित आणि मेखला दिली जाते, जरतुष्टी धर्मात नवजोत (नवीन जन्म) हा विधी असतो ज्यात बटूला सदरा (उपवस्त्र) आणि खुश्ती (मेखला) दिली जाते. ज्यू धर्मात मुलाच्या १३व्या वर्षी त्यावर बार मित्स्वा हा संस्कार केला जातो. वडील मुलाला तालित नामक शाल देतात जी धार्मिक विधी करताना डोक्या आणि खांद्यावरून ध्यायची असते, ह्या संस्कारानंतर मुलग्याचा पुरूष झाला असे समजले जाते. प्राचीन रोमन समाजात स्वतंत्र पराधीन/गुलाम नसलेल्या रोमन नागरिकाचा मुलगा १२-१३ वर्षांचा झाला की त्याल्या त्याचा पहिला तोगा (Toga) नामक लोकरी शाल दिली जात असे.जानव्याप्रमाणेच हा तोगा डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून असा घ्यायचा असतो. धार्मिक कार्यात तोग्याला विशेष महत्व असे. यज्ञ, बळी आदि धार्मिक विधी करताना यजमान त्याचा एक भाग आपल्या डोक्यावर घेत. रोमच्या पवित्र शहराच्या वेशीच्या (Pomerium) आत प्रत्येक रोमन नागरिकाने किमान सार्वजनिक ठिकाणी तरी तोग्याशिवाय फिरू नये असा प्रघात होता. याउलट रोमनेतरांनी आणि गुलामांनी तोगा घालू नये असा देखील नियम होता.आपल्या देशातील उष्म हवामान परिस्थितीमुळे आणि यज्ञकुंडाजवळ बसून राहावे लागत असल्याने ते दिर्घ काळ पांघरून ठेवणे कठीण होत असे. मग त्यावर पर्याय म्हणून तीन धाग्याचे प्रतिकात्मक उत्तरीय म्हणून जानवे किंवा यज्ञोपवीत अस्तित्वात आले.पुढे कालौघात ब्राह्मण जानवे सर्वकाळ घालू लागले आणि ते मग पुढे ब्राह्मण जातीचे प्रतीक बनले.रोमन सम्राट आणि महान तत्त्वज्ञानी पार्कस् ओरेलिअर ला बळी देताना अग्नि समक्ष उभ्या यजमानाने तागा डोक्यावरून घेतला आहे तर यजमानाच्या मागच्या माणसाने तो सामान्यपणे घातला आहे. कुह्राड धरलेला दास मात्र उघडा आहे.महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट ही त्याच्याशीच संबंधित आहे. द्रौपहीचे वस्त्रहरण म्हणजे बलात्काराचा प्रकार असा आजच्या काही लोकांत समज आहे. परंतु त्या काळी वस्त्रहरणाचा अर्थ वेगळा होता. दोन्ही बाबी लज्जास्पद आहेत पण आपण आपल्या आजच्या संदर्भात मूळ अर्थ पाहू शकत नाही. द्रौपदीला जेव्हा सभेत आणले जाते तेव्हा ती पाहते की पांडव बंधु स्वतः उपवस्त्राशिवाय बसले आहेत म्हणजे ते द्युद्धात आपले स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. आजच्या काळात साडी एका कापडाची असते, पण त्या काळी उत्तरीय (ओढणी) आणि अंतरीय (धोतर किंवा परकर) असे दोन प्रकार असत. वस्त्रहरणात द्रौपदीचे उत्तरीय खेचून घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडक्यात तिला गुलामासारखी वागणुन देण्याचा प्रयत्न केला. गेला नंतर दुर्योधन स्वतःची डावी मांडी थोपटतो. डावी मांडी ही पत्नीसाठी असते. उदाहरणार्थ: रामरक्षेत आलेले “वामाङ्कारूढसीता” अर्थात् रामाच्या डाव्या मांडीवर बसलेली सीता थोडक्यात कुठे त्या पांडवांसोबत गुलाम बनतेस? माझी पत्नी बन. एखाद्या स्त्रीसाठी आणि विशेषतः राजकुळातील स्त्रीसाठी हा घोर अपमान आहे. पण तो आजच्या काळी बलात्कार नाही. पण त्या प्रकरणातून उपवस्त्राचे त्या काळच्या समाजमानसातील महत्त्व दिसून येते. आजच्या काळातही आपण कोणाचा सत्कार करायचा झाला तर शाल किंवा उपरणे देतो.पण,फक्त ब्राह्मण लोकच जानवे घालतात का? नाही,काही लोकांचा असा गैरसमज आहे की ब्राह्मण स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी जानवे घालतात. वास्तव मात्र याच्या पूर्णपणे उलट आहे. पूर्व वैदिक काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीनच वर्ण अस्तित्वात होते. वैश्य ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यास तो विश् (अर्थात् गाव) या शब्दावरून येतो असे दिसते. वैश्य म्हणजे गावकरी, अर्थात् जनसामान्य ह्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिघांनाही उपवस्त्राचा (जानव्याचा) अधिकार होता. उत्तर वैदिक काळात जसा समाज अधिक जटिल होते गेला तशी वैश्य समाजाची विभागणी झाली, आणि त्यातून वैश्य (व्यावसायिक) आणि शूद्र (कामगार) समाजाची निर्मिती झाली. हा प्रकार नैसर्गिक आहे आणि तो इतर समाजांतही झालाचे आढळते. युरोपात औद्योगिकरणाच्या काळात भूतपूर्व शेतमजूर समाजाची औद्योगिक आणि मजूर समाजांत विभागणी झाली. शूद्र समाजाचे मूळ हे नक्की सांगता येणे कठीण आहे, पण ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या भागात तरी शूद्रांचा उल्लेख सापडत नाही. तो पहिला दिसतो तो पुरुषसुक्तात, जे फार नंतर रचले गेले. असो. नंतरच्या काळात ब्राह्मणेतर समाजात जानवे घालण्याचे प्रमाण कमी होत गेले. पण वैदिक अनुष्ठानाने हाच पेशा असल्यामुळे ब्राह्मणांत ते तसेच राहिले. आजच्या काळात जेव्हा ब्राह्मण इतर व्यवसायांकडे वळले आहेत, ब्राह्मण समाजातही जानव्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. अनेक प्राचीन देवालयांच्या मूर्तीत देव, दानव, ब्राह्मण, राजे, जनसामान्य, स्त्री देवता सगळेच जानवी घातलेले दिसतात.३) जानवे कोणी कसे व किती घालावे? व कधी बदलावे ?जानवे कसे घालावे त्या विषयी शास्त्र संकेत असा की, ब्रह्मचार्याने एक आणि गृहस्थ व वानप्रस्थिय ह्यांनी दोन जानवी घालावी.उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो.ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।।या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो. ब्रह्मचाऱ्याने एक, गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनी दोन आणि यतीने एक यज्ञोपवीत धारण करावे असे देवलाने म्हटले आहे.प्राचीन काळी काळविटाचे चामडे किंवा वस्त्र जानवे म्हणून वापरत असत. तसेच प्राचीन काळी स्त्रियाही यज्ञोपवीत घालीत असत कारण विवाहसमयी वधूने यज्ञोपरीतिनी असावे असे गोभील गृह्यसूत्रात (२.१.१८) म्हटले आहे. ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे,क्षत्रियाने ताग्याच्या दोऱ्याचे आणि वैश्याने बकऱ्याच्या लोकरीच्या धाग्याचे जानवे वापरावे असे मनूने सांगितले आहे. (मनू २.४४)तसेच जानवे बदलत असताना देखील एक मंत्रोपचार सांगितला आहे:-एतावद् दिन पर्यंन्तं ब्रह्मं त्वं धारितं मया |जीर्णत्वात्त्वपरित्यागो गच्छ सुत्र यथा सुखम् ||म्हणजे:-हे यज्ञोपवीता, आजपर्यंत मी तुला धारण केले. पण, आता तुझ्या जिर्ण होण्यामुळे मी तुला त्यागत आहे.४) जानवे घालायची पद्धत कोणती व नियम कोणते?जानवे डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात.पण,जानवे डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंस च उतरते का घालायचे?वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!परब्रह्मोपनिषद – १०ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताची मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहेकृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: अपवित्र झाल्यानंतर जानवे बदलले जाते. जानवे धारण केल्याशिवाय अन आणि पाणी ग्रहण केले जात नाही.आंघोळीच्या वेळेस जानवे खांद्या वरुन खाली न येऊ देता हाताने घासून स्वच्छ करावे.याज्ञवल्क्य ने जानव्याला ब्रह्मसूत्र असे म्हटले आहे. यज्ञोपवितातील लांबी जास्तीतजास्त कमरे पर्यंत असावी आणि कमीतकमी बेंबीपर्यंत असावी. ही लांबी उपरोक्त प्रमाणात यावी म्हणूनच यज्ञोपविताच्या मुख्यसुताची लांबी ते धारण करणाऱ्या व्यक्तीच्या अंगुलीप्रमाणानुसार असावी असे शास्त्र सांगते.ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे. जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे.शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुस-याचे जानवे घालू नये.जानवे तुटले तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे असे मनू सांगतो.एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनी जानवे बदलावे असे शास्त्र सांगते.निवीती दक्षिणकर्ने यज्ञोपवितं कृत्वा मुत्रपुरीषे विसृजेत ह्या शास्त्र वचनानुसार शौचसमयी व मूत्र विसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक आहे.आपली अशुचि अवस्था सूचीत करण्यासाठी देखील ही कृती उपयोगी पडते.शौचालयास जाऊन आल्यावर हातपाय धुऊन चुळा भरल्यावर मगच जानवे कानावरुन काढावे.रजस्वला, ओळी बाळंतीण, मृतदेह, चीतकाष्ठ, चिताधूम ह्यांचा शरीराला स्पर्श झाला असेल तर शितोदकाने सचैल स्नान करून अभिमांत्रित करून नवीन जानवे घालावे आणि पूर्वीचे विसर्जन करावे. एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनंतर जानवे बदलावे असा नियम सांगितला आहे.मुत्रविसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक सांगितले आहे.मग हातपाय धुवून चुळ भरल्यावर जानवे कानावरून काढावे. ह्या मागे शास्त्रीय कारण असे की शरीराचा नभी प्रदेशापासून वरचा भाग धार्मिक क्रियांसाठी पवित्र आणि खालचा भाग अपवित्र मानला गेला आहे.५) जानवे घातल्याने होणारे फायदे कोणते? शौचालयात जाताना हेच जानवे कानाला लावायचीही रीत आहे. कानाला जानवे दोन वेळा लपेटून घेतले तर कानाच्या दोन नसा ज्या पोटाच्या आतड्यांशी संबंधित असतात त्या जागृत होऊन अपचनासारखे विकार दूर होतात हा एक शास्त्रीय फायदा आहे.ॲसिडिटी, पोटाचे विकार, ब्लड प्रेशर आणि इतकंच नाही, तर हृदयरोग या क्रियेमुळे दूर राहू शकतात.मूत्र विसर्जन करताना डाव्या कानाला जानवे लपेटून ठेवल्यामुळे शुक्र बिजांचे रक्षण होते असंही म्हटलं जातं.ज्या पुरुषांना स्वप्रदोषासारखे विकार आहेत त्यांनी कानाला जानवे लपेटून झोपले तरीही फरक पडू शकतो.एकदा जानवे गळ्यात घातले की, माणसाचे विचार, आचार बदलून ते शुद्ध होतात. त्याच्या शब्दांमध्ये माधुर्य येते.आदित्य, वसू, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, सूर्य, अनिल, प्रभुती देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने केवळ स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते.उजव्या कानाला सुत्राने लपेटल्यावर शुक्रनाशापासून बचाव होतो हे आयुर्वेदशास्त्र दृष्ट्या सिध्द झालेले आहे..तात्पर्य:- केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने यज्ञोपवीत घालणे हे उपकारक असल्यामुळेही यज्ञोपवीत सदा धारण केलेले असावे.
Saturday, 19 July 2025
Copy pasteस्थिर चित्त स्तोत्र :-सध्या आजूबाजूला अनेक विचित्र घटना घडत आहेत. स्पर्धेच्या युगात अनेक अपेक्षा ठेवल्या जात आहेत . दरवेळी अपेक्षापुर्ती होत नाही . अशावेळी मन स्थिर रहाणे ही अवघड गोष्ट झाली आहे. त्यासाठी खालील स्तोत्र उपयोगी पडू शकेल .----------------------------------------------------------------------------- मन स्थिर करण्यासाठी जपावयाचे स्तोत्र -🚩🔸श्री दत्त स्तोत्र 🚩🔸||1||अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते | सर्व देवाधिदेवत्वं मम चित्तंस्थिरि कुरु !! ||2||शरणागत दिनार्त तारका-खिलकारक | सर्व चालक देवत्वं मम चित्तं स्थिरी कुरु !! ||3|| सर्व मंगल मांगल्ये सर्वाधि व्याधी भेषज |सर्व संकट हारिनत्वं मम चित्तं स्थिरि कुरु !!||4|| स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशन: | भुक्ति मुक्ति प्रद: सत्वं मम चित्तं स्थिरि कुरु !!||5|| सर्वपापक्षयकरस्ताप दैन्य निवारन: |यो-भीष्टद :प्रभु :सत्वं मम चित्तं स्थिरी कुरु !!||6|| य एतत्प्रयत : श्लोक पंचकंप्रपठेत्सुधी : | स्थिर चित्त : स भगवत्कृपा पात्रं भविष्यति ||6|| इति श्री .प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वतिविरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् |☄☄☄🌾🌾☄☄☄🌟हे स्तोत्र अतिशय प्रभावी असून या स्तोत्र पठनाने चित्त एकाग्र होते🌟🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🌞श्री गुरुदेव दत्त🌞अनसूया अत्रिपासून संजात ! दत्तात्रेया तू महाबुध्दिमंत !सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात ! माझे चित्त करी स्थिर !! १ !!शरण आलेल्यांचा जगात ! दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात !सर्वचालक देवा तू त्वरित ! माझे चित्त करी स्थिर !! २ !!सर्व मंगलाचे मंगल पावन ! सर्व आधिव्याधींचे औषध महान !सर्व संकटांचा हर्ता तू शोभन ! माझे चित्त करी स्थिर !! ३ !!स्मरताक्षणी स्वभक्तांना ! भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना !भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना ! माझे चित्त करी स्थिर !! ४ !!सर्व पापांचा क्षय करी ! ताप दैन्य सारे निवारी !अभिष्टदात्या प्रब्जो तू सावरी ! माझे चित्त करी स्थिर !! ५ !!जो हे श्लोक पंचक वाचतील ! नित्यनेमें नियम चित्त निर्मळ !स्थिर चित्त तो होईल ! भगवतकृपापात्र जगती !! ६ !!इति श्री - परमहंस - परिवाज्रकाचार्य - वासुदेवानंदसरस्वती - विरचितं मनः स्थिरीकरण स्तोत्रं संपूर्णम् !!
Friday, 20 June 2025
यजमानांचे नजरेतुन अंत्यक्रीया. फेसबुकवर आलेला लेख आहे प्रसिद्ध लेखिका सौ शेफाली वैद्य यांचे मातोश्रींचे नुकतेच निधन झाले त्याबाबतीत त्यांनी मांडलेले विचार आहेत हिंदू अंत्येष्टी – शोक व्यक्त करण्याची पवित्र प्रक्रियाआईच्या जाण्याबद्दलचा हा माझा शेवटचा सार्वजनिक लेख. हा लेख अंतिम संस्कारांकडे डोळसपणे पाहणारी एक श्रद्धावान आणि जिज्ञासू हिंदू व्यक्ती ह्या भूमिकेतून मी लिहिलाय. इथे मला आधीच हे स्पष्ट करायचंय की मी ना कोणी धर्मशास्त्रज्ञ आहे, ना संस्कृत पंडित, ना मी पूर्णपणे बरोबर असल्याचा दावा करतेय. पण मातृशोकातून जाताना आणि हिंदू अंत्येष्टीची सर्व कर्मकांडे श्रद्धापूर्वक पार पाडताना देखील विवेकी जिज्ञासेचा तिसरा डोळा उघडा ठेवून सामान्य माणसाला कधी कधी अगम्य, क्वचित भयावह वाटू शकणाऱ्या या विधींमागचा गहन अर्थ समजून घ्यायचा मी यथाशक्ती प्रयत्न केला. त्यासाठी मी मन्मथनाथ दत्त यांनी केलेला गरुडपुराणाचा संपूर्ण अनुवाद परत एकदा वाचला. Tibetan Book of the Dead आधीच वाचलं होतं. त्याशिवाय ग्रिफ मॅनेजमेंट ह्या विषयावर आधारित बरंच पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिलेलं मानसशास्त्रीय साहित्य वाचलं आणि अर्थातच, प्रत्यक्ष विधी सुरु असताना आमच्या पुरोहितांना हजार प्रश्न विचारले. त्यांनीही अतिशय शांतपणे आणि न कंटाळता माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या सर्वाचा परिपाक म्हणजे हा लेख. ह्यात जे काही लिहिलंय, ते माझ्या वैयक्तिक अनुभवावर आणि मी मिळवलेल्या धार्मिक माहितीवर आधारित आहे. हे इथे शेअर करण्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे मला जे उमगलं ते इतरांनांही कळावं. बरेचदा आपण ही सारी कर्मकांडे करतो पण त्या मागचा अर्थ कोणी सहजासहजी आपल्याला नीट उलगडून सांगत नाही. जवळच्या माणसांच्या मृत्यूनंतरचे विधी सर्वांनाच कधी ना कधी करावे लागतात, पण त्यामागचा सांकेतिक अर्थ जर कळला तर नक्कीच वियोगाच्या दुःखावर फुंकर मारल्यासारखं होतं हे मी स्वतः गेल्या १२ दिवसात अनुभवलेलं आहे. इतर कुणाच्या शोकप्रवासात जर हा लेख थोडी तरी सोबत करू शकला तर मी भरून पावेन. मी एक श्रद्धावान हिंदू आहे. माझ्या आयुष्यात मी अनेक वेळा वेगवेगळ्या स्वरूपात अग्नीची आराधना केली आहे, कधी देवापुढे दिवा लावून तर कधी घरी होम करवून. अनेक यज्ञही मी पाहिले आहेत, पण ज्या दिवशी माझ्या भावाने माझ्या आईच्या चितेला अग्नी दिला, त्या दिवशी मला खर्या अर्थाने कळलं की अग्नी ही संक्रमणाची देवता आहे. चितेला अग्नी देण्याचा क्षण हा केवळ लाकूड जाळण्याचा क्षण कधीच नसतो. तो एका रूपाचं अरूपात रूपांतर करण्याच्या प्रवासाचा आरंभक्षण असतो. चिताग्नी हा तो अग्नी आहे जो वेदात वर्णिला गेलाय, साक्षी, शुद्धिकर्ता, आणि आत्म्याला दुसऱ्या लोकात घेऊन जाणारं दिव्य वाहन.अंत्येष्टी हा हिंदू सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार. शेवटची आहुती. आपण जिवंत असताना जसे यज्ञ किंवा होम करताना अग्नीला आहुती देतो, तसाच हा कुठल्याही व्यक्तीचा शेवटचा यज्ञ, आणि याची आहुती म्हणजे त्याचं स्वतःचं नश्वर शरीर. यज्ञांमध्ये सामान्यतः अग्नी हा केवळ वाहक असतो. पण अंत्येष्टिमध्ये तो आहुतीचा भक्षकही असतो आणि ती हवी देवांपर्यंत पोचवणारा वाहकही असतो. ज्या पंचमहाभूतांपासून देह बनलेला असतो त्याच पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांमध्ये देह परत विलीन होतो. मी लहान असताना माझ्या आजोबांना पत्रात हा मजकूर लिहिताना अनेक वेळा वाचलं होतं की अमुक अमुक यांचा देह पंचमहाभूतांत विलीन झाला. तेव्हा या वाक्याचा पूर्ण अर्थ कधीच कळला नव्हता. पण गेल्या बारा दिवसात तो नीटच कळला. आईला मुखाग्नी द्यायच्या आधी माझा भाऊ जो कर्ता होता, त्याने चितेला तीन उलट्या प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला मातीचा माठ होता, ज्याला भटजी एका छोट्या दगडाने प्रत्येक प्रदक्षिणेत एकेक भोक पाडत होते ज्यातून आतलं पाणी गळत होतं, आधी छोटी धार आणि नंतर मोठी. प्राण जसा हळूहळू शरीर सोडतो, तसंच हे पाणी माठातून निःशब्दपणे निघून जात होतं. तीन प्रदक्षिणा झाल्यावर त्याने तो माठ मागे न पाहता डाव्या खांद्यावरून जमिनीवर जोरात फेकून फोडला. घटभेदन — अंत्येष्टीतील सर्वात विदारक क्षण. जो आपल्याला शिकवतो की त्या माठासारखं मृत शरीर कितीही सुंदर दिसत असलं, तरी आत प्राण नसताना ते नुसतंच एक रिकामं कवच असतं आणि ते नष्ट करावंच लागतं. किंबहुना आपण ते नाही केलं तर निसर्ग ते शरीर नष्ट करणारच असतो. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा स्मशानात गेलो, आईच्या अस्थी संकलनासाठी. खाली वाकून तिच्या अस्थी अलगद उचलून एका तांब्याच्या कलशात ठेवताना मला खूप भरून येत होतं. ज्या प्रेमाने आम्ही भावंडं तिच्या गालावरून हात फिरवायचे, त्याच मायेने आणि हळुवारपणे आम्ही त्या अस्थी आणि थोडीशी रक्षा कलशात भरली. उरलेली सर्व राख आम्ही कुंकळ्ळीच्या पवित्र आणि वीरप्रसवा साळ नदीत विसर्जित केली. काही काळ प्रवाहावर तरंगून ती राख हळूहळू पाण्यात विरत गेली. त्यानंतर आम्ही तिच्या अस्थी कारवारच्या काली नदीत विसर्जित केल्या. कारवार आईचं जन्मगाव. काली नदी आईला खूप आवडायची. जिथे काली नदीचं गोडं पाणी सागराशी एकरूप होतं तिथेच तिच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या. जीवाचं ब्रह्मात विलीन होणं, अस्तित्वाचं अव्यक्तात विलीन होणं ह्याचंच जणू प्रतीक असलेली ती जागा होती. ते पहिले तीन दिवस आणि त्यानंतरचे सात दिवस अशौचाचे होते, शोकाचे आणि सामाजिक निवृत्तीचे. ना नवे कपडे, ना देवपूजा, ना चमचमीत जेवण, फक्त विरहाच्या शांततेत डुंबलेलं घर आणि एकत्र बसून आईच्या आठवणी काढणारे आम्ही कुटुंबीय. कोणी शोक प्रदर्शनासाठी येई तेव्हाही त्याच आठवणी निघत, आमचं दुःख हळूहळू हलकं होत होतं. प्रत्येक दिवशी आईच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही तिलोदक अर्पण करत होतो. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसापर्यंत मृत व्यक्तीचा आत्मा पितृलोकात जात नसतो. तो अजूनही पृथ्वी लोकातच भटकत असतो धूसर अवस्थेत, गोंधळलेल्या मनस्थितीत. तिलोदक आत्म्याला दिशा देतं, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी.दहाव्या दिवशी, पुरोहितांना घेऊन आम्ही पुन्हा स्मशानात गेलो. धर्मशास्त्राप्रमाणे आता आईची पुढच्या प्रवासाची तयारी झाली होती. आता ती केवळ ‘आई’ राहिलेली नव्हती — ती आता आमची पूर्वज बनणार होती. आमच्या पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण करत तांदूळ आणि तिळाचे दहा पिंड तयार केले. ते सूक्ष्म शरीराचे प्रतीक होते. त्या पिंडांसोबत दर्भाच्या लहानश्या छत्र्या आणि ज्योती अर्पण केल्या गेल्या, दिवसा सावलीसाठी, रात्री प्रकाशासाठी. पुरोहितांनी जेव्हा त्या दर्भाच्या छोट्या मशाली तुपात भिजवून प्रज्वलित केल्या तेव्हा त्यांचा उजेड आमच्याही दुःखाचा अंधार हळूहळू नष्ट करत होता. हिंदू धर्मात कोणीही एकटा जात नाही. प्रत्येक आत्मा मृत्यूनंतर कुलपरंपरेत पूर्वज म्हणून सामील केला जातो. हिंदू धर्म संस्कृतीचा अविरत प्रवाह मानतो.अकराव्या दिवशी पुरोहितांनी येऊन घरी होम घातला आणि आमचं घर आणि आम्ही मृत्यूनंतरच्या अशौचातून परत शुद्ध झालो. पंचगव्य शिंपडून घर पवित्र केलं गेलं. आम्हीही सर्वजण एकेक थेंब प्यायलो. आता आम्हीही इतके दिवस थांबवून ठेवलेल्या आयुष्याच्या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी तयार होतो. बाराव्या दिवशी सपिंडीकरण होते. अंत्येष्टी संस्कारातला सर्वांत शेवटचा आणि निर्णायक विधी. आईचा पिंड आणि आमची आजी, पणजी, आणि शेणजी यांचे पिंड भावाने विधीपूर्वक एकत्र केले. धर्मानुसार आता आमची आई पितृ झाली होती. आता ती फक्त आमची आई नव्हती, आता ती आमच्या संपूर्ण कुळाची मार्गदर्शिका होती. आता ती आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांची पूर्वज बनली होती. हा निरोप नव्हता. ही होती नवीन नात्याची जाणीव. आमच्या कुलपरंपरेच्या अविरत वाहणाऱ्या प्रवाहात माझी आई एक नवी लाट बनून विलीन झाली होती. त्यानंतर आला शेवटचा विधी, शुभस्वीकार. अशौचाचा, दुःखाचा काळ आता संपला होता. आता आम्ही पुन्हा आयुष्याला आनंदाने सामोरे जायला मोकळे होतो. इतके दिवस दहन संस्कार करताना वापरलेला कोरा सुती पंचा नेसून सर्व विधी करणाऱ्या माझ्या भावाने आता ते कपडे सोडून रंगीत रेशमी कद परिधान केला, कपाळावर शुभसूचक कुंकुमटिळक लावला आणि हवन केलं. आईच्या द्वादशश्राद्धाला आमचे आप्तेष्ट जमले होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. बारा दिवसांच्या संयम आणि शोकानंतरचं पहिलं एकत्रित जेवण. जेवताना आईच्या आठवणी निघाल्या, तिच्या विनोदांची उजळणी झाली, तिच्या मायेच्या स्पर्शाची सर्वानी आवर्जून आठवण काढली. आमच्या मनावरचं दुःखाचं, शोकाचं सावट हळूहळू दूर होत होतं. ह्या बारा दिवसांच्या प्रवासात मला जाणवलं की हिंदू धर्म जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. बारा दिवस मनसोक्त शोक करू देतो. आपली कर्मकांडे म्हणजे दुःखाचा नीट, शास्त्रोक्त निचरा करायचा एक फॉर्मुला आहे. आपले विधी केवळ धार्मिक नाहीयेत तर मानसशास्त्रीयदृष्ट्या फार अचूक आणि सूक्ष्म विचार करून आपल्या पूर्वसुरींनी रचलेले आहेत.साधे मंत्र उच्चारतानाही अतिशय विचार करून शब्द योजले गेले आहेत. देवांना आहुती दिली जाते तेव्हा ‘स्वाहा’ म्हटलं जातं.पितरांना काही अर्पण केलं की ‘स्वधा’ हा शब्द उच्चारतात तर प्रेतात्म्याला बोलावताना पुरोहित म्हणतात — ‘उपतिष्ठत’. शब्द बदलतात. अर्थ बदलतो. ध्वनी स्पंदन बदलतं. यज्ञोपवीताची दिशा सुद्धा बदलते. देवकार्य करताना ते डाव्या खांद्यावर असतं — सव्य. पितृकार्य करताना उजव्या खांद्यावर — अपसव्य. ते करत असताना कर्ता वर्तमान क्षणात पूर्ण उपस्थित असतो, त्याच्या शोकाचे रूपांतर कर्मात होते. त्याचे दुःख तिळातिळाने कमी होत जाते. हिंदू अंत्यसंस्कार फक्त मृत व्यक्तीसाठी कधीच नसतात. ते मागे राहिलेल्या शोकमग्न कुटुंबासाठीही तितकेच महत्वाचे असतात. ते शोकाला एक आकार देतात. त्याला व्यक्त होऊ देतात. त्याला आदराने हात जोडतात आणि मग, हळूहळू, शोकाचं रूपांतर संस्कारात करतात.आपले ऋषी मृत्यूला घाबरत नव्हते. त्यांनी मृत्यू समजून घेतला होता. मृत्यूनंतरच्या शोकातून जीवनाकडे कसा प्रवास करायचा ह्याचा नकाशा त्यांनी ह्या कर्मकांडांद्वारे तयार केला होता. पाण्याचा माठ का फोडायचा? पिंड का तयार करायचा? यज्ञोपवीताची दिशा का बदलते? ह्या सगळ्याला उत्तर आहे. शोकाचेही एक व्याकरण आहे जे आपल्या पूर्वसुरींना ठाऊक होते. — शेफाली वैद्य
Friday, 6 June 2025
दशदाने ः-गो.भू.तिल.हिरण्य.आज्य.वस्त्र.धान्य.गुळ.चांदी.लवणअष्टदाने: - आमान्न.उदकुंभ.गोदान.वस्त्र.भू. शय्या.छत्री. आसनचतुर्दश विशेष दाने:-आमान्न. उदक. चप्पल. कमंडलू. छत्री.वस्त्र.काठी.लोहदंड. बॅटरी(विजेरी. कंदील)दिपदान.तांबूल.चंदन.पुष्प.तिलअन्य विशेष दानेसिद्धस्थाली (पातेली )शाल. कंबल.तिलपात्र.पंखा.तुलसीपत्र.गोपीचंदन.कापूर.आरसा.हळद.कापूस.आसन. शालग्राम.बाणलिंग.माला.पुस्तक.यज्ञोपवितवृषोत्सर्ग ( ३ आमान्ने)
Wednesday, 18 December 2024
विवाहात वधुवर परस्परांना ठरलेल्या मुहूर्तावर वरमाला अर्पण करतात , आणि आपण 'लग्न लागलं' असं म्हणतो ।पण वास्तविक हि परंपरा नाहीये ।वरमाला किंवा जयमाला हा संस्कार गांधर्व विवाह आणि स्वयंवर विवाह यातील एक भाग आहे ।आपण जो करतो त्याला ब्राह्म विवाह म्हणतात ।प्रेम विवाहाला गांधर्व किंवा स्वयंवर नाही म्हणता येणार ।कारण गांधर्व पद्धतीमध्ये अन्य विधी नसतात , केवळ वरमाला असते । आणि स्वयंवर हे राजन्य वर्गातील क्षत्रिय कन्यांपुरता मर्यादित प्रकार होता जिथे वर सुद्धा समान वर्णाचा असायचा ।हा विवाह प्रायः राज्यविस्तार आणि सौमनस्यासाठी व्हायचा ।जे वर निवड करण्यासाठी वधुसमोर असत ते वधुपित्याने आधीच निवडलेले असत ।आता त्यातील एक वधूला निवडायचा असे ।त्यात जर वधूला आवडेल त्या पुरुषाच्या गळ्यात तिने माळ घातली तर ती वरमाला आणि वधु जिंकण्यासाठी जो पण असतो तो पूर्ण केल्यावर जेता पुरुष वधूच्या गळ्यात घालायचा ती जयमाला ।ब्राह्म विवाह विधीत परस्पर माला समर्पणाचा विधी नसून 'गुडजीरक' हा विधी आहे ।वधु आणि वर हातात तांदूळ, जिरं, गूळ ओंजळीत घेऊन उभे राहतात , आणि मुहूर्तावर अंतःपट बाजूला झाला कि ओंजळीतील सर्व वस्तू परस्परांच्या डोक्यावर आरोपण करतात (ओततात/सोडतात,, whatever) ।आजच्या काळात शास्त्राची माहिती असलेली शिवाय त्यावर निष्ठादेखील असलेली जी कुटुंबं आहेत त्यांच्या घरी विवाहात या पद्धतीने लग्न लागते ।त्यानंतर जनरीत म्हणून माला आदानप्रदान पण होते ।पण वैयक्तिक मला असं वाटतं कि हे वरमालेचं प्रकरण बंद व्हायला हवं । तसं झालं तर बराच अनाचार थांबेल ।म्हणजे वरमाला असुदे ,,, छान वाटते ,,, पण वरमाला म्हणजे 'लग्न लागलं' हे समीकरण बदललं पाहिजे ।दक्षिणेत काही शास्त्रनिष्ठ कुटुंबांमध्ये अशी पद्धत आहे कि जिरं आणि गूळ एकत्र कुटून त्याची चटणी केली जाते आणि ती विड्याच्या पानावर ठेऊन वधुवरांच्या हातात देतात । आणि मुहूर्तावर अंतःपट बाजूला झाला कि दोघे एकमेकांच्या डोक्यावर ते पान थापतात ,, एकमेकांच्या टाळूवर ते नीट पुसून विड्याची पाने टाकून देतात ।आणि मग जनरीत म्हणून वरमाला असते ।गुडजीरकाचा भौतिक लाभ काय यावर आयुर्वेदिक क्षेत्रातील जाणकार अधिक सांगू शकतील ।ग्रंथोल्लेखात हे पदार्थ आयुर्वृद्धीकारक आहेत ।महाराष्ट्रात गुडजीरक कोरडं असतं ,, आणि दक्षिणेत त्याची चटणी असते ।अशाच प्रकारे विधी करायला आपण अभ्यस्त झालो तर आपल्यालाही त्याच्या मागचा कार्यकारण भाव लक्षात येऊ लागेल ।लेखासह ग्रंथवचनाचे पान पण जोडलेले आहे ।विवाह संबंधात जे अधिकृत ग्रंथ आहेत त्यात संपूर्ण विवाह विधीत वरमाला हा उल्लेख नाही ।पुष्पमाला हा उल्लेख आहे ।पण त्याचा मुहूर्ताशी संबंध नाही ।पुष्पमाला धारण कन्यादान झाल्यानंतर आहे ।गार्ग्यगोत्रोत्पन्नः दाबकेउपाख्य सुहाससूनुः सागरशर्मा
Thursday, 17 October 2024
विषकन्या योग व वैधव्य योग कुंभ विवाह याबद्दलची माहितीविषकन्या योगसूर्य भौमिर्किवारेषुमिथी भद्राशतभियम् । आश्लेषा कृत्तिका नामे मत्र ज्ञाता विषांगना ।।१।।सूर्य, मंगळ, शनिवार हे वार असून भद्रातिथी (२,७,१२) असेल त्याप्रमाणे कृत्तिका, आश्लेषा, मुळ, शततारका नक्षत्र जर असल्यास अशा समयी पूर्ण योग असतांना एखादया मुलीचा जन्म झाल्यास विषकन्या योग होतो.(खुलासा = वार, तिथी, नक्षत्र असे तीन मिळूनच विषकन्या योग होता.)जर्नुलग्ने रिपुक्षेत्रे सांस्थित: पापखेचर: । द्विसास्मापि योगेsस्मिन सन्जाता विषकन्या ।।२।।जन्म लग्नात शत्रुक्षेत्री पापग्रह असेल त्याचप्रमाणे त्यासंबंधी प्रथम श्लोकांप्रमाणे कोणतेही दोन योग होत असल्यास ती कन्या विषकन्या योगी होते. (खुलासा = वरील विधानाला अनुसरून त्याला जोडून वार, तिथी, नक्षत्र ह्या तीन पैकी दोन योग होणे आवश्यक आहे)लग्ने शनिचरो यस्या सूतेर्को नवमे कुंज । विषायव्या सापि नौद्वाहया त्रिविध विषकन्या ।।३।।ज्या मुलीच्या लग्नी शनी असून पंचम भावात सूर्य असेल त्याचप्रमाणे नवम स्थानाम मंगळ असेल तर ती कन्या विषकन्या होऊ शकते. त्यावरील प्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या होऊ शकते. त्यावरीलप्रमाणे तीन प्रकारचे विषकन्या योग सांगितलेले आहेत. गुजरात व राजस्थानात वरील आशयासंबंधी एका दंतकथेच्या म्हणीचा अर्थ पुढे देत आहे.विषकन्या योगात जन्मलेली कन्या जिवंत रहात नाही. जरी जन्म झाल्यास अल्पायुषी असते. नाहीतर पुर्ण कुंटुबाला नष्ट करते किंवा पीडा देते. विवाह संस्कारचे वेळी (हवनकुंडाला फेरे घेतांना ) वराला नष्ट करते. जरी विवाह झाल्यास प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णु, महेश येतात. अर्थात विषकन्येचा विवाह नेहमी कष्टमय होत असतो. जर अशा मुलीच्या कुंडलीत अशा प्रकारचे योग असल्यास त्याचा परिहार हा ''कुंभविवाह' ने खचितच दूर होतो.वैधव्य योग १) ज्या मुलीच्या कुंडलीमध्ये सप्तम भावात मंगळ पापग्रहांसह युक्त असेल किंवा पापग्रह सप्तम भावात मंगळ त्यास पूर्ण दृष्टीने पहात असेल तर अशी कन्या तरूणावस्थेत पोहोचण्यापूर्वीच बालविधवा होते. २) चंद्रापासून सामवे किंवा आठवे स्थानी पापग्रह असल्यास किंवा मेष अथवा वृश्चिक या दोघे राशीना राहू आठवे किंवा बाराव्या स्थानी असल्यास अशी कन्या निश्चित विधवा होते. (खुलासा = हा योग फक्त वृषभ, कन्या, धनु, हा लग्नालाच लागु पडतो)३) मकर लग्न असल्यास त्याच्या सप्तम भागात कर्कराशी गत सुर्य-मंगळाबरोबर असल्यास अथवा चंद्र पापग्रह पीडीत असल्यास वरील योग बनतो. अशी स्त्रीसुध्दा विवाहानंतर मध्यावस्थेत विधवा होते.४) लग्न तसेच सप्तम या दोन्ही भावात पापग्रह असल्यास स्त्रीसुध्दा विवाहोत्तर काळात वैधव्य प्राप्त होते.५) सप्तम स्थानात पापग्रह असुन तसेच चंद्र षष्ठ किंवा सप्तमात असल्यास विवाहानंतर वयाच्या मध्यात वैधव्य प्राप्त होते.६) जर अष्टमाधिपती सप्तम भावात असून सप्तमेषाला जर पापग्रह पहात असेल तसेच सप्तमभाव पापग्रह पीडीत असेल तर नववधू लवकरच विधवा होते.७) षष्ठ व अष्टम स्थानाचे अधिपती जर षष्ठ किंवा बाराव्या भावात पापग्रहाबरोबर असून सप्तम भावावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृद्वटी नसल्यास नववधुस सुध्दा लवकर वैधव्य प्राप्त होते. ८) लग्नापासून सप्तम, अष्टम स्थानाचे स्वामी पापग्रह पीडीत असून जर ते सहा किंवा बाराव्या स्थानी जरी असल्यास निश्चितच वैधव्य योग होतो.यदिलग्नगत: कुरस्तमाम् सप्तमग: कुंज । विषेयम् मरणम् पुंसाम ।।१।।यदि लग्नतश्चस्तस्मात् सप्तम/ कुंज: । मृत्यु विज्ञानीयान ।।२।। (नारद)वरील दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे की, जर मुलीचा जन्म लग्नामध्ये सप्तमेश पापी असेल किंवा पापदृष्ट असेल अथवा पापग्रहयुक्त असून अनिष्टकारी (६,८,१२) स्थानात असेल किंवा शत्रुगृही असेल तर पतिसुखास हानी करतो. त्याचप्रमाणे लग्नामध्ये आणि त्यापासून सप्तमस्थानी मंगळ असेल अथवा लग्नात चंद्र असून त्याच्या सप्तमात मंगळ असल्यास पतिसुखास हानी करतो.लग्ने व्ययेच पाताले जामित्रेचाष्टमे कुंज: । कन्या भर्तुविनाशाय भर्ता विनाशकृंत ।।अर्थात कुंडलीमध्ये लग्नात (प्रथम), चतुर्थात, सप्तमात, अष्टमात व व्ययात (बारावे) ह्यापैकी एका स्थानात मंगळ असल्यास पति सुखास हानी करतो (खुलासा = वरील ह्या श्लोकात मंगळाचा ऐकेरीच पध्दतीने विचार केलेला आहे. ह्या मंगळाचा विचार करतांना त्याच्या सर्व बाकी घटकांचा विचार प्रथम जरूर करावा.)विषकन्या भंग योगषुमेपे ता शुभेस्ते विषारखान ।सप्तम स्थानात स्वत: सप्तमेशात विराजमान असुन जरी तो पापग्रह दृष्ट असला तरीही तो शुभ ग्रहाबरोबर असेल तर विषकन्या योग भंग पावतो. सप्तमस्थानात हे पतिचे स्थान असल्याने त्यावरुन पति सुखाचा विचार होतो ही गोष्ट सदैव लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, सप्तमात शुभग्रह असल्यास किंवा सप्तमावर शुभग्रह पहात असल्यास त्याच्या प्रभावाने पतिसुखात निश्चितच वाढ होईल.ह्या विषयासंबंधी श्री. कल्याण वर्मा यांनी त्यांच्या सारावलीत असे म्हटले आहे.वैधत्व निधने चिन्त्यं, शरीर जन्मलग्नत: । सप्तमे पति पंचमे प्रसवस्था ।।(सारावली स्त्री जातक)पुरुषांच्या अष्टम भावावरून ''विधुरता'' तसेच स्त्रीयांच्या अष्टम भावावरून ''वैधव्यता'' चा विचार केला जातो. सप्तमावरुन स्थिती, संपदा, वैभव तसेच पतिच्या सौभाग्याचा विचार होतो. पंचमावरून मुला-मुलीचा स्थितीचा विचार दिसतो. त्यासाठी येथे पण पति सौभाग्य सुख हेतु स्त्रीच्या भावाला अनन्यसाधारण प्राधान्य दिलेले आहे.विषकन्या योग व वैधव्य योग ह्यावर परिहार विधान ह्या सर्व प्रकारच्या वैधव्य दोषाच्या निवृत्ती हेतू धर्मशास्त्र असे सांगते.सावित्र्यादिव्रतं कृंत्य वैधव्यदिनिवृत्तये । अश्वत्थादिभिद्वाह्या दधानां चिजीवने ।।१।।बाल वैधव्ययोगे तु कुंभादुपतिमादिभि: । कृंत्वा तत: पश्चात कंन्योहयेति चापरे ।।२।।वटसावित्री व्रतकथा, अश्वस्थ (पिपळ) वृक्षाशी लग्न, तसेच कुंभ विवाह जर पहिले नंतर अन्य कोणाशी (पुरूष) विवाह केला तर कुंभ विवाहाने असलेला वैधव्य योग नाहीसा होतो.त्याच्रप्रमाणे ''हेमाद्री व्रमखंड'' यामध्ये ''वैधव्य - योग नाशक सावित्रीव्रत'' असे सांगितलेले आहे की, सावित्र्यदिव्रतादिनी भक्तव्या कुर्वन्ति या: स्त्रिया । सौभागयंच सुहत्वंच भवेत् तासां सुसंगति: ।।ज्या मुलीच्या कुंडलीत विधवायोग असल्यास तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडून एकांतात ''सावित्री व्रत'' किंवा ''पिपंळव्रत'' करवून नंतर दिर्घाय वरा वराबरोबर विवाह करावा.नारी वा विधवा पुत्रीपुत्र विवर्जिता । सभर्तुका सुपुत्रा वा कुर्याद व्र तभिंद शुभम ।।(स्कंद पुराण )वरील व्रत हे सुध्दा सौभाग्यवती, विधवा, कुमारी, वृध्दा सुपुत्रविति किंवा पांझोटी ह्या सर्व स्त्रीयांन हे व्रत करण्यासारखे आहे.दुसरे असेच व्रत (ज्ञानभास्कर) ह्या ग्रंथात सांगितलेले आहे. त्यास ''वैधव्य हर अश्वत्थव्रत'' असे नाव आहे. यामध्ये मुलींच्या आई - वडिलांनी आपल्या मुलीकडुन सुमुहूर्तावर ठरवून रंगीत वस्त्र परिधान करून ब्राम्हणाकडुन संकल्प आई-वडिलांद्वारे करावा. हे व्रत महिनाभराचे आहे. हे व्रत विशेषत: चैत्र वद्य तृतीया किंवा आश्विन वद्य तृतीया ते आगामी वद्य तृतिये पर्यंत हे व्रत चालू ठेवावे. यामध्ये बांबूच्या टोपलीमध्ये सुवर्णमयी (सोन्याची) शिवपार्वतीची मुर्ती यथोचित पूजन करून त्यांना ते दान करावे. ही पुजा रोज पिपंळाच्या झाडाखालीच झाली पाहिजे. जर पिपंळाचे झाड नसल्यास शमी अथवा बोराचे झाडाखाली केली तरी चालेले. अशा प्रकारे प्रतिदिनी महिन्यापर्यंत केल्यास पूर्ण पतिसौख्य प्राप्त होते.वैधव्यहर कंर्कटीव्रत ''व्रतराज या ग्रंथामध्ये हे एक आणखी व्रत सांगितलेले आहे. सुर्य जेव्हा राशीत प्रवेश केल्यानंतर मुलीने स्नान करून अथवा (तांदूळ) चे अष्टदल करून सोन्याची कर्कटी (काकडी)ची स्थापना करून मनोभावे षोडशोपचार पुजन करावे. विधिवत व्रत करून अकरा काकडी (ऋतुकाळातील काकडी) सहीत सुवर्ण कर्कटी (काकडी)चे दान ब्राम्हणभोजन करावे. या व्रताने वैधव्य योगाची शांती होते.त्याचप्रमाणे ''मार्कण्डेय पुराण'' ह्या पुराणात ''कुंभविवाह'', ''विष्णूविवाह'' हे तील परिहार व्रत दिलेले आहे. ह्या तीनही विवाहांमध्ये ''गणपतिपुजन'', ''मातृकापूजन, ''वर्सोधारापूजन'', ''नांदीश्राध्द'', ''सुवर्णमयी विष्णुपूजन'', ''होमहवादि'' करवून पुढे कर्मे करावे.अर्क विवाह :- ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''विषकन्या योग'' आणि वैधव्य योग असतो. त्याचप्रमाणे पुरूषांच्या कुंडलीत ही ''विषपुत्र योग'' व ''विधुर योग'' ही असतो. ज्याप्रमाणे स्त्रीयांच्या कुंडलीत ''वैधव्य योग'' पहातो. त्याचप्रमाणे तेच नियम पुरुषांच्या कुंडलीत ''विधुर योग'' पहावा. जर एखाद्या पुरूषाचा विवाह एका पेक्षा जास्त विवाह होऊनही जर पत्निसुख प्राप्त होत नसेल तर अशा पुरुषाला अर्क (रूई)च्या झाडासोबत विवाह करवून त्यानंतर दुसर्या कन्येशी विवाह करावा. कुंभविवाहाच्या प्रमाणे हा ''अर्क विवाह'' पण शास्त्रसंमत सप्तमभावाचे जन्मदोष व अरिष्ट निवारणाचा उत्तमोत्तम परिहार आहे.मुहूर्त काल विचारआदित्य दिवसे वापि हरपक्षे वा शनिश्वरे ।।''अर्क विवाह'' हा रविवारी, शनिवारी किंवा हस्त नक्षत्रावर तसेच शुभ दिवशी हा विधी करावा.मन्वर्थ संजीविनी समुहवरून राम भाउ हलबे गुरुजीं कडून संकलित
Subscribe to:
Posts (Atom)