Wednesday, 18 December 2024
विवाहात वधुवर परस्परांना ठरलेल्या मुहूर्तावर वरमाला अर्पण करतात , आणि आपण 'लग्न लागलं' असं म्हणतो ।पण वास्तविक हि परंपरा नाहीये ।वरमाला किंवा जयमाला हा संस्कार गांधर्व विवाह आणि स्वयंवर विवाह यातील एक भाग आहे ।आपण जो करतो त्याला ब्राह्म विवाह म्हणतात ।प्रेम विवाहाला गांधर्व किंवा स्वयंवर नाही म्हणता येणार ।कारण गांधर्व पद्धतीमध्ये अन्य विधी नसतात , केवळ वरमाला असते । आणि स्वयंवर हे राजन्य वर्गातील क्षत्रिय कन्यांपुरता मर्यादित प्रकार होता जिथे वर सुद्धा समान वर्णाचा असायचा ।हा विवाह प्रायः राज्यविस्तार आणि सौमनस्यासाठी व्हायचा ।जे वर निवड करण्यासाठी वधुसमोर असत ते वधुपित्याने आधीच निवडलेले असत ।आता त्यातील एक वधूला निवडायचा असे ।त्यात जर वधूला आवडेल त्या पुरुषाच्या गळ्यात तिने माळ घातली तर ती वरमाला आणि वधु जिंकण्यासाठी जो पण असतो तो पूर्ण केल्यावर जेता पुरुष वधूच्या गळ्यात घालायचा ती जयमाला ।ब्राह्म विवाह विधीत परस्पर माला समर्पणाचा विधी नसून 'गुडजीरक' हा विधी आहे ।वधु आणि वर हातात तांदूळ, जिरं, गूळ ओंजळीत घेऊन उभे राहतात , आणि मुहूर्तावर अंतःपट बाजूला झाला कि ओंजळीतील सर्व वस्तू परस्परांच्या डोक्यावर आरोपण करतात (ओततात/सोडतात,, whatever) ।आजच्या काळात शास्त्राची माहिती असलेली शिवाय त्यावर निष्ठादेखील असलेली जी कुटुंबं आहेत त्यांच्या घरी विवाहात या पद्धतीने लग्न लागते ।त्यानंतर जनरीत म्हणून माला आदानप्रदान पण होते ।पण वैयक्तिक मला असं वाटतं कि हे वरमालेचं प्रकरण बंद व्हायला हवं । तसं झालं तर बराच अनाचार थांबेल ।म्हणजे वरमाला असुदे ,,, छान वाटते ,,, पण वरमाला म्हणजे 'लग्न लागलं' हे समीकरण बदललं पाहिजे ।दक्षिणेत काही शास्त्रनिष्ठ कुटुंबांमध्ये अशी पद्धत आहे कि जिरं आणि गूळ एकत्र कुटून त्याची चटणी केली जाते आणि ती विड्याच्या पानावर ठेऊन वधुवरांच्या हातात देतात । आणि मुहूर्तावर अंतःपट बाजूला झाला कि दोघे एकमेकांच्या डोक्यावर ते पान थापतात ,, एकमेकांच्या टाळूवर ते नीट पुसून विड्याची पाने टाकून देतात ।आणि मग जनरीत म्हणून वरमाला असते ।गुडजीरकाचा भौतिक लाभ काय यावर आयुर्वेदिक क्षेत्रातील जाणकार अधिक सांगू शकतील ।ग्रंथोल्लेखात हे पदार्थ आयुर्वृद्धीकारक आहेत ।महाराष्ट्रात गुडजीरक कोरडं असतं ,, आणि दक्षिणेत त्याची चटणी असते ।अशाच प्रकारे विधी करायला आपण अभ्यस्त झालो तर आपल्यालाही त्याच्या मागचा कार्यकारण भाव लक्षात येऊ लागेल ।लेखासह ग्रंथवचनाचे पान पण जोडलेले आहे ।विवाह संबंधात जे अधिकृत ग्रंथ आहेत त्यात संपूर्ण विवाह विधीत वरमाला हा उल्लेख नाही ।पुष्पमाला हा उल्लेख आहे ।पण त्याचा मुहूर्ताशी संबंध नाही ।पुष्पमाला धारण कन्यादान झाल्यानंतर आहे ।गार्ग्यगोत्रोत्पन्नः दाबकेउपाख्य सुहाससूनुः सागरशर्मा
Subscribe to:
Posts (Atom)