Sunday, 12 March 2023

मंगल कामना व शांतीपाठशरणं त्वां गतो नाथ संसारार्णवतारक| दिश:पश्य अध:पश्य व्याधिभ्योरक्ष नित्यश:| प्रसीद स्वस्य राष्ट्रस्य राज्ञ:सर्वबलस्यच | गर्भिणीनां च वृद्धांना व्रीहिणां च गवां तथा || ब्राम्हणानां च सततं शातिं करु शुभं करु || अन्नं कुरु सुवृष्टिं च सुभिक्षमभयं तथा | राष्ट्रं प्रवर्द्धंतु विभो शांति र्भवतु नित्यश: ||देवानां ब्राम्हणानां च भक्तानां कन्यकासु च | पशूंना सर्वभूतानां शांतिर्भवतु नित्यश: || संसार सागरातून उद्धार करणाऱ्या प्रभो आम्ही आपणास शरण आलो आहोत आपण प्रसन्न व्हावे आपली दिव्य रक्षा दृष्टी चतुदीक् बनली आहे आधी व्याधी पासून आपण आमचे रक्षण सदैव करता आमचे राष्ट्र शासन त्रिविध प्रकारचे सैन्यबळ यावर आपली विजयिनी वरददृष्टी सतत असावी गाई गर्भिणी स्त्रिया वृद्ध जन अशक्त दिन हीन विद्वान ब्राह्मण यावर आपली शुभ दृष्टी अनुग्रह दृष्टी सतत असावी आपण यांच्यावर प्रसन्न असावे आमच्या देशातील धनधान्य समृद्ध करावे आपण सर्वत्र सुवृष्टी करावी पर्याप्त अन्न व सुभिक्ष यांना प्रदान करावे आमची अन्न भंडारे भरावीत सर्वतः अभयदान असावे विभो आपण आमच्या राष्ट्राचे संवर्धन करावे सर्वत्र विश्वात शुभ शांती पसरावी देव ब्राह्मण भक्त संत महात्मे कन्या पशुपक्षी आणि समस्त जीव सदैव शांती प्राप्त करून घेवोत. सर्वत्र सर्वजण सुखाने समाधानाने नांदावेत.महादेव गोविंद गाडगीळ तळवणे सावंतवाडी

Friday, 10 March 2023

*ब्राह्मणदक्षिणा व शास्त्र**मुहूर्ते समतीते तु,**भवेत् शतगुणा च सा |**त्रिरात्रे तद् दशगुणा,**सप्ताहे द्विगुणा मता ||**मासे लक्षगुणा प्रोक्ता,**ब्राह्मणानां च वर्धते |**संवत्सर व्यतीते तु,**त्रिकोटिगुणा भवेत् ||**कर्मं तद् यजमानानां,**सर्वञ्च निष्फलं भवेत् |**सब्रह्मस्व अपहारी च,**न कर्मार्हो शुचिर् नर: ||*अर्थात, ब्राह्मणांची दक्षिणा हवनाची पूर्णाहुति झाल्यावर एका मुहूर्ताच्या (२४ मिनिटाच्या) आत दिली पाहिजे, अन्यथा मुहूर्त निघून गेल्यावर शतपटीने वाढते. आणि तीन रात्री निघून गेल्यावर एक हजार पट, सप्ताहानंतर दोन हजार पट, महिन्यानंतर एक लाख पट, आणि संवत्सर निघून गेल्यावर तीन करोड पट दक्षिणा यजमानाने दिली पाहिजे. जर याप्रकारे न दिली तर त्याचे कर्म निष्फल होते, व त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते. त्याच्या हाताने केले जाणारे हव्य-कव्य देवता व पितर कधीच प्राप्त करत नाही. म्हणून ब्राह्मणांची दक्षिणा लवकरात लवकर दिली पाहिजे. हे शास्त्रप्रमाण आहे.म्हणून चाणक्य म्हणतात, *"नास्ति यज्ञसमो रिपु:"* अर्थात यज्ञादि कर्म विधिने सम्पन्न झाल्यावर लाभ, अन्यथा सर्वात जास्त हानीपर असते. गीतेतही भगवंतांनी स्वयं सांगितले आहे,*विधिहीनं असृष्टान्नं,**मन्त्रहीनं अदक्षिणं |**श्रद्धाविरहितं यज्ञं,**तामसं परिचक्षते ||*अयोग्य विधिने बनवलेले भोजन जसे परिणामात नुकसान करते, तसेच ब्राह्मणाने सांगितलेले मन्त्र दक्षिणा न दिल्यावर नुकसान करते.शास्त्र सांगते कि लोखंडाचे फुटाणे किंवा तुकडे देखील व्यक्ति पचवू शकतो परन्तु ब्राह्मणांच्या धनाला पचवू शकत नाही. कोणत्याही उपायाने ब्राह्मणांचे धन घेणारा नेहेमी दु:खच प्राप्त करतो. यावर महाभारतात एक कथानक आले आहे.महाभारत युद्ध चालू होते, युद्धमैदानात वाघासारखे हिंसक जीव योद्ध्यांचे गरमगरम रक्त पीत होते. एवढ्यातच धृष्टद्युम्नाने तलवारीने पुत्रशोकाने दु:खी निःशस्त्र द्रोणाचार्यांची मान कापली. द्रोणाचार्याचे गरमगरम रक्त पिण्यासाठी एक वाघीण पळतपळत येते, तेंव्हा वाघ वाघिणीला म्हणतो, प्रिये, *"विप्र-रक्तोsअयं गलद् दगलद् दहति"*अर्थात, ते ब्राह्मणाचे रक्त आहे, ते पिउ नको, ते शरीराला दहन करुन (गाळून गाळून) नष्ट करेल तेंव्हा त्या वाघिणीने देखील ब्राह्मण द्रोणाचार्याचे रक्तपान केले नाही.ऋषिमुनिंचे कररुपात रक्त घेतल्यानेच रावणकुळाचा संहार झाला, म्हणूनच जीवनात कधीही ब्राह्मणांचे द्रव्य अपहरण कोणत्याही रुपात करु नये.*वित्तशाट्ठ्यं न कुर्वीत,**सति द्रव्ये फलप्रदम |*अनुष्ठान, पाठ-पूजन केल्यावर ब्राह्मणांना उचित दक्षिणा दिली पाहिजे, आणि दक्षिणे-अतिरिक्त त्यांच्या येण्याजाण्याचे भाडेही वेगळे दिले पाहिजे. त्यानंतर विनम्रतेने ब्राह्मणांना वचनाद्वारे देखील सन्तुष्ट करत आशीर्वाद घेतला पाहिजे. असे केल्यावर ब्राह्मण मुखाने नाही तर हृदयाने आशीर्वाद देतो, आणि तेंव्हा यजमानाचे कल्याण होते.*यत्र भुंड्क्ते द्विजः तस्मात्,**तत्र भुंड्क्ते हरि: स्वयम् ||*ज्याच्या घरात अशा प्रकारे श्रद्धेने ब्राह्मणभोजन होते, तिथे ब्राह्मणरुपात स्वयं भगवानच भोजन करतात.