Monday, 22 August 2022
*श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.* श्रीस्वामीमहाराज श्रीक्षेत्र गुर्लहोसुर येथे आल्यावर श्रीकैवल्याश्रम स्वामीमहाराजांच्या आग्रहावरून एक आठवडाभर म्हणजे जेष्ठ शुध्द दशमीपर्यंत अर्थात दशहरा समाप्ती पर्यंत तेथील श्रीचिदंबरनाथांच्या मंदिरात मुक्काम करून राहिले.यावेळी श्रीसीताराममहाराज श्रीस्वामीमहाराजांच्या बरोबर नव्हते.श्रीस्वामीमहाराज श्रीक्षेत्र नरसोबावाडीहून निघाल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांनी वाडी सोडली.पुढे ते शिरोळ मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूरला गेले.तेथून ते श्रीगोदावरी नदीच्या तीरावरील श्रीक्षेत्र राजूर या गावी एक पर्णकुटी बांधून तेथे दीडवर्ष राहिले. श्रीस्वामीमहाराजांचा मुक्काम श्रीक्षेत्र गुर्लहोसुर येथे असताना श्रीक्षेत्र नरसोबावाडीहुन श्री.परशुरामभट पुजारी वगैरे मंडळी त्यांच्या दर्शनाला आली होती.या सर्व मंडळींनी सर्व प्रकारच्या रोगांच्या व संकटाच्या शमनासाठी काहीतरी मंत्र-स्तोत्र इत्यादि द्यावे अशी प्रार्थना केली.त्यावेळी श्रीस्वामीमहाराजांनी सर्व लोकांच्या प्रार्थनेप्रमाणे सर्वरोगशमनार्थ पुढील" श्रीदत्तस्तवस्तोत्र " त्यांना करून दिले व त्यांना त्या स्तोत्राच्या पठणाचे फल सांगताना ते असे म्हणाले की," जो कोणीही स्त्री-पुरुष शुचिर्भूतपणे या स्तोत्राचे त्रिकाल पठण करील त्याला कोणतीही रोगबाधा होणार नाही." श्रीथोरल्यास्वामीमहाराजांनी संसारतापाने तप्त झालेल्या व घोर संकटात सापडलेल्या साधकभक्तांना प्राप्त संकटातून पार पाडून त्यांना श्रीदत्तप्रीती म्हणजे अप्राकृत भक्ती प्राप्त व्हावी म्हणून ही एक अपूर्व स्तोत्रवल्ली किंवा स्तोत्र महौषधी उपलब्ध करून दिली आहे.भूत, प्रेत, पिशाच्च, पाप, ताप, भीती, दैन्य, दारिद्र्य, ग्रहपिडा, खरूज, कोड, कुष्ठादि त्वचारोग, महामारी, प्लेग, संक्रमणशील रोग, उत्पात, संकटे, बाधा, शत्रूंनी केलेले जारणमारणमोहनादि सर्व प्रकारच्या अनर्थकारक गोष्टी दूर करून जय, लाभ, यश, शांती व सर्व प्रकारची प्रापंचिक सुखे प्राप्त करून देणारे हे अमोघ असे " श्रीदत्तस्तवस्तोत्र " आहे.या स्तोत्राचे माहात्म्य वर्णन करताना करताना कै. ब्रम्हश्री पंडित आत्मारामशास्त्री जेरे यांनी असे म्हटले आहे की," श्रीमद दत्तात्रेयांच्या कलियुगातील अवतारांपैकी श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर झालेल्या तिसऱ्या अवताररूप योगिराज श्रीमदवासुदेवानंदसरस्वती-महाराजांनी केलेले हे " श्रीदत्तस्तवन " रूप अत्युत्तम स्तोत्र आहे.याचे ९ श्लोक आहेत.याच्या नित्य पाठाने किंवा जपाने ऐहिक व पारलौकिक सर्व कामना पूर्ण होऊन तो भक्त श्रीदत्तमहाराजांना अत्यंत प्रिय होतो.श्रीदत्तमहाराज आपणास प्रिय वाटणे व आपण श्रीदत्तमहाराजांना प्रिय होणे या दोन गोष्टीच मनुष्यजन्माचे सार्थक करणाऱ्या आहेत व याच्यासाठीच परब्रम्हपरमात्मा श्रीदत्तांनी आपणास अत्यंत दुर्लभ असा मनुष्यजन्म दिला आहे." " या दोन गोष्टी या स्तोत्रपाठाने व निरंतर जपाने सिध्द होतात असे स्वतः श्रीस्वामीमहाराज म्हणतात.म्हणजे याबद्दल अधिक विचार करण्याचे कारण नाही.येता-जात, बसता-उठता व सोवळ्यात-ओवळ्यात केव्हाही ह्या स्तोत्राचा जप करता येतो व काळाचे सार्थक होते.नाहीतर काळ हा सुर्यरूपाने आपले आयुष्य घेऊन चाललाच आहे.तरी आपले आयुष्य फुकट न जाता आपले सर्वतोपरी कल्याण व्हावे, या करिता विचारी माणसाने या स्तोत्राचा शक्य तितका जप करून आपला उध्दार करून घ्यावा." श्रीस्वामीमहाराज श्रीक्षेत्र गुर्लहोसुर येथे आले आहेत असे कळल्यावर त्यांच्या दर्शनासाठी दररोज शेकडोशे मंडळी सारखी येत होती.त्याचप्रमाणे रोज चार-पाचशेपर्यंत मंडळी भोजनासाठी तेथे असत यावरून तेथील गर्दीची कल्पना येईल.याठिकाणी दररोज भजन, कीर्तन, पुराण इत्यादी विविध कार्यक्रम सारखे सुरू होते.यावेळीच प्रसिद्ध वेदांती श्री बाबा गर्दे हे श्रीस्वामीमहाराजांच्या सत्संगतीचा लाभ व्हावा या हेतूने मुद्दाम श्रीक्षेत्र गुर्लहोसूर येथे येऊन राहिले होते.या ठिकाणीच परमभक्त श्रीबोठे स्वामींचे व श्रीस्वामीमहाराजांचे श्रीमलप्रभा नदीमध्ये प्रेमालिंगन झाले.त्यामुळे दोघांनाही परमसंतोष झाला.*|| श्री दत्तस्तवस्त्रोत्रम ||*भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||यन्नमस्मरणाद्-दैन्यं पापं तापश्च नश्यति ||भीतिग्रहर्तिदु:स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तं || २ ||दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ||नश्यन्ति अन्येSपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तं || ३ ||संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ||शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तं || ४ ||सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम ||यन्नाम शान्तिदं शीघं दत्तात्रेयं नमामि तं || ५ ||त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम ||यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तं || ६ ||वैयादिकृतम्न्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ||नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तं || ७ ||यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ||य ईश: सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तं || ८ ||जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम ||भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्-दत्तप्रियो भवेत || ९ ||*इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं**दत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम ||*
*मूलपुरुषापासून अशौच कमी करण्याचे विधान*.मूलपुरुषापासून सात पिढी पर्यंत सपिण्ड, ते १४ पर्यंत सोदक, १५ ते २१ पर्यंत सगोत्र अशी गणना आहे. सपिंडाना ८० दिवस, सोदकाना ३ दिवस सगोत्राना ६ दिवस अशौच असून २६ व्या नंतर केवळ सरमानमात्र आहे. *८ ते १४ पर्यंत अशौच कमी करण्याचे विधान*८व्या पिढीतील पुरुष दुसऱ्या ८ व्या पिढीतील पुरुषाचे अशौच ३ दिवस पाळावे. त्याचे विधान - आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य मम मूलपुरुषतः प्रवृत्त सात पौरुष- सापिण्ड्य कारण दशाहाशौच- निवृत्तिद्वारा सोदकत्वप्रयुक्त त्रिरात्राशौच परिपालनाथ नदी स्नानं देवताप्रार्थनां पुनर्नदी स्नान मई करिष्ये ।असे संकल्प सोडून नदी स्नान करून मन्दिरात येवून देवा पुढे मी या पुढे तीन दिवस अशौच पाळतो असे प्रार्थना करून पुनः नदीस्तान करणे. *१४ ते २१ पिढी पर्यंत अशौच करण्याचे विधान*१५ पिढीतला मनुष्य दुसऱ्या १५ पिढीतील मनुष्याचेअशौच 3 दिवस पाळावे. त्याचे विधान -आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य मम मूलपुरुषतः प्रवृत्त- समानोदकत्व प्रत्युवल कारणक त्रिरात्रा शौच निवृत्तिद्वारा सगोत्रत्वप्रयुक्त एकरात्रा - गौच परिपालनार्थ नदीस्त्रानं, देवताप्रार्थनां पुनर्नदी स्नानमहं करिष्ये । -असे संकल्प करून नदी स्नान, देवता प्रार्थना २ पुनः नदी स्नान करून (यापुढे मी ३ दिवस अशौच पाळतो असे प्रार्थना करून) संपविणे.२६ च्या नंतर चा पुरुष- मम मूलपुरुषतः प्रवृत्त सगोत्रत्व - कारणक एकरात्रौ शौचनिवृत्तिद्वारा अवस्मरण निमित्तक स्मरणा शौच परिपालनाय स्थानमात्र करिष्ये असा संकल्प करून नदी स्नानादि करणे. संबन्धराजेश्वरशास्त्री धारवाड
Subscribe to:
Posts (Atom)